शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षे; पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2024 07:49 IST

शतकी वर्षात पाऊल ठेवत असलेल्या संघाने हिंदुंचे प्रभावशाली, आक्रमक संघटन उभे करताना ते अतिरेकी, अविवेकी होणार नाही, याची तेवढीच दक्षता घेतली.

जगातील अत्यंत प्रभावी संघटनांपैकी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आजच्या विजयादशमीपासून सुरू होत आहे. क्रांतिकारकांसोबत स्वातंत्र्यलढ्यात उतरलेले आणि पुढे काँग्रेसमध्ये राहूनही तितक्याच तन्मयतेने राष्ट्रकार्य केलेले डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्वातंत्र्यासाठी लढतानाच मुळात आपल्या देशाला  मुघलांच्या, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात का राहावे लागले, याचे चिंतन केले. या चिंतनातून हिंदुंना संघटित करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 

गेल्या दहा दशकांत संघ जगभर पोहोचला. केवळ सात स्वयंसेवकांच्या साथीने नागपुरात पहिली संघशाखा सुरू झाली, आज संघ सातासमुद्रापलीकडे विस्तारला आहे. शतकी प्रवासात या  संघटनेने टीकेचे, हेटाळणीचे अनेक वार झेलले. मनुवादी, ब्राह्मणवादी, जातीयवादी म्हणून संघाला हिणवणारे कमी नव्हतेच, पण समर्पित भावनेने अविचल, अविरत कार्यरत राहणाऱ्या हजारो, लाखो स्वयंसेवकांच्या साथीने संघाची दमदार वाटचाल सुरूच राहिली. डॉ. हेडगेवार यांच्या आधी हिंदुत्त्वाचा विचार अनेकांनी मांडला होता. पण, डॉक्टरांनी आपल्या विचाराला कृतीचे सातत्य असलेल्या संघशाखांची मजबूत जोड दिली. हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा मिलाफ त्यांनी घडवून आणला आणि  हिंदुंना आत्मभान दिले. या देशातील हिंदू संघटित आणि सशक्त होऊ शकतो, हे सिद्ध करून दाखविणारे डॉ. हेडगेवार हे द्रष्टे नेते होते. हे संघटन टिकवायचे असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रात त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि त्याला विधायक कार्याची जोड दिली पाहिजे. या विचारातून मग संघ परिवारात एकेक करून तब्बल ३२ प्रभावशाली संघटना सक्षमपणे उभ्या झाल्या. त्यापैकीच एक असलेला भारतीय जनता पक्ष गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेत आहे. 

आजवर अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे दोन संघप्रचारकच पंतप्रधान झाले. आज समाजाचे एकही क्षेत्र असे नाही, की जिथे संघ विचारातून निर्माण झालेल्या संघटनांचा दबदबा नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येनंतर पहिल्यांदा, १९७५च्या आणीबाणीमध्ये दुसऱ्यांदा आणि १९९२मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडली गेल्यानंतर एकदा अशी तीनवेळा संघावर बंदी आली. मात्र, त्यातून संघ संपला तर नाहीच उलट उत्तरोत्तर मोठा होत गेला. संघ आडमुठा आहे; बदल स्वीकारत नाही, अशी टीका केली जाते. पण, काळाच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करत संघाने लहान-मोठे बदल स्वत:मध्ये घडवून आणले. गणवेश बदलला, हे किरकोळ झाले. पण ‘बंच ऑफ थॉट’मध्ये श्री. गोळवलकर गुरुजी यांनी लिहिलेले ‘मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट हे हिंदुंचे सर्वांत मोठे शत्रू आहेत’ हे वाक्य आणि त्यानुषंगाने केलेले विवेचन संघाकडून जाहीरपणे काढले गेले. 

आपल्या पूर्वसुरींचे अंधानुकरण केले जाणार नाही, हा मोठा संदेश त्यातून दिला गेला. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, प्रा. राजेंद्रसिंह उपाख्य रज्जूभैया, के. सी. सुदर्शन आणि आताचे डॉ. मोहन भागवत या सर्व सरसंघचालकांनी संघविस्तारात वेगवेगळ्या पद्धतीने अमूल्य योगदान दिले.  रा. स्व. संघाची खरी शक्ती कशामध्ये आहे? याची वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात. पण, संघाच्या अभ्यासकांची मते एकत्र केली तर तीन शक्तिकेंद्रे ही नक्कीच सामायिक दिसतील. एक म्हणजे संघाचा स्वयंसेवक, संघ शाखा आणि विनावेतन, विनाअपेक्षेने देशभर, जगभर कार्यरत असलेले संघ प्रचारक. लाखो स्वयंसेवकांचे पाय आजही संघशाखेकडे वळतात, हे विलक्षण आहे. 

जगातल्या इतर कोणत्याही संघटनेला हे इतका दीर्घकाळ जमलेले नाही. संघाने स्वयंसेवकांना अर्थसहाय्य वगैरे कधीही केले नाही. उलट लाखो स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला गुरु मानत त्याच्या चरणी आजवर गुरुदक्षिणा वाहिली आहे. देशावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा संघ स्वयंसेवकांनी तन-मन-धनाने अजोड असे सेवाकार्य केले.  प्रचारकांची यंत्रणा तर अद्वितीयच आहे. विशीतले, तिशीतले असंख्य कर्तृत्ववान, हुशार तरुण आपले अख्खे आयुष्य प्रचारक म्हणून संघाला देतात. वैयक्तिक, खासगी आयुष्याला मूठमाती देऊन राष्ट्रकार्यासाठी आसेतूहिमाचल कुठेही जातात; स्वत:ला झोकून देतात. संघाने देशकार्यासाठी घालून दिलेली ही विलक्षण अशी व्यवस्था आहे. 

शतकी वर्षात पाऊल ठेवत असलेल्या संघाने हिंदुंचे प्रभावशाली, आक्रमक संघटन उभे करताना ते अतिरेकी, अविवेकी होणार नाही, याची तेवढीच दक्षता घेतली. शंभरीत प्रवेश करत असलेला संघ पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल, असा विश्वास आजवरच्या संघकार्याने नक्कीच दिला आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय