शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यधर्माचा विसर... माणसे मारायची यात कोणती संवेदनशीलता वा अनुकंपेची भावना असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:34 IST

अमेरिकेच्या ट्रम्पला त्यांच्या देशात नव्याने येणारे मेक्सिकन नकोत आणि आधी आलेले मेक्सिकनही देशाबाहेर घालवायचे आहे.

माणसे आपली भूमी वा देश सहजासहजी सोडायला तयार होत नाहीत. पण आपला देश वा भूमी आपल्याला न्याय देत नसेल वा जगवायलाच अकार्यक्षम असेल तर माणसांनी काय करायचे असते? कोरड्या व निपजाऊ जमिनी आणि रोजगार न देणारे देश त्यांनी सोडायचे की देशभक्तीच्या नावाने त्यातच पाय घासून मरायचे? त्यातून आपले समाज दिवसेंदिवस जास्तीचे एकारलेले धर्मांध, जात्यंध व वर्णांध होत असतील आणि त्यातील बहुसंख्यांक लोक अल्पसंख्याकांना देशाबाहेर घालवायला तयार झाले असतील तर दुबळ्या वर्गाने कुठे जायचे असते? म. गांधी म्हणत शक्तिशाली वर्गाने, देशाने, सरकारने व राजकारणाने नेहमी दुबळ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. परंतु आताचे जगभराचे राज्यकर्ते या शिकवणीच्या नेमके उलट वागत आहेत आणि त्यात पूर्व-पश्चिम असा भेद करण्यातही अर्थ उरला नाही.

अमेरिकेच्या ट्रम्पला त्यांच्या देशात नव्याने येणारे मेक्सिकन नकोत आणि आधी आलेले मेक्सिकनही देशाबाहेर घालवायचे आहे. त्यांची झळ लागली तर ते अमेरिकेत आलेल्या चिनी, भारतीय, पाकिस्तानी व इतर देशातील विद्यार्थी व नोकरदारांनाही हाकलतील व त्यांच्या जागा स्वदेशी लोकांना देतील. वर त्याचे समर्थन ते ‘भूमिपुत्रांचे हक्क’ म्हणूनही करू शकतील. फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांतही आता कृष्णवर्णीय नागरिकांना देशाबाहेर घालविण्याची चळवळ सुरू झाली आहे. तेथील हिंसाचार व हाणामाऱ्यांमध्ये मुख्य कारणही तेच आहे. इकडे म्यानमारच्या बौद्धांना रोहिंगे घालवायचे किंवा मारायचे आहेत.

याआधी श्रीलंकेच्या सिंहली बहुसंख्येने तेथील तामीळ अल्पसंख्याकांविरुद्ध हेच केले. सगळ्या दक्षिण मध्य आशियात शिया विरुद्ध सुन्नी किंवा कडवे विरुद्ध उदारमतवादी यांच्यात सुरू असलेली युद्धे याच पातळीवर आली आहेत. भारतातील अरुणाचल व आसामात फार पूर्वी आलेल्या अल्पसंख्य मुस्लिमांना देशाबाहेर घालविण्याची प्रतिज्ञाच अमित शहा यांनी केली आहे. मुंबईत हिंदी भाषिक नकोत, बिहारी नकोत, दक्षिण भारतीय नकोत या चळवळी होऊन गेल्या. त्या संपल्या मात्र नाहीत. भूमिपुत्रांना न्याय ही बाब खरी आहे. मात्र, माणुसकीला न्याय ही त्याहून मोठी व श्रेष्ठ बाब आहे. देश म्हणजे सर्वसमावेशकता असे जे म्हटले जाते ते सा-या जगाबाबतही खरे आहे. यातला मुख्य प्रश्न घालवून दिलेल्या दरिद्री व उपाशी स्त्री-पुरुषांनी जायचे कुठे हा आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने त्यासाठी उभारलेल्या निर्वासितांच्या छावण्या भरल्या आहेत. त्यात प्राथमिक सोयीही नाहीत, अन्न अपुरे व पाण्याचा अभाव आहे. स्वदेश आश्रय देत नाही आणि विदेश जागा देत नाही, अशा या मोठ्या जनसंख्येच्या विश्वात आपल्याकडील फूटपाथवर जगणाऱ्यांचे जीणे असे आहे. निर्वासितांच्या अशा छावण्यांची जी चित्रे दूरचित्रवाहिन्यांवर दाखविली जातात ती अंत:करणाचा ठाव घेणारी आहेत. रस्त्यात, समुद्राकाठी व जंगलात मरून पडलेली मुले एकविसाव्या जगाला पाहावी लागणे हा काळाचा विकास दाखविणारा प्रकार नसून माणुसकीचा -हास दाखविणारे वास्तव आहे. समृद्धी व संपत्ती असणारे देशही असे वागत असतील आणि ‘माणूस’ या प्राण्याला अन्नपाण्यावाचून तडफडत मरायला लावीत असतील तर दरिद्री देशांनी काय करायचे असते? त्यातून ज्यांना हाकलायचे त्यांनी, या संपन्नांची व समृद्ध वर्गांची वर्षानुवर्षे सेवा केली असते.

अमेरिकेची समृद्धी कृष्णवर्णीय गुलामांच्या श्रमातून आली आहे. फ्रान्स व युरोपही आशिया व आफ्रिका खंडावर वसाहतवाद लादून श्रीमंत झाला आहे. ज्यांनी समृद्धी दिली व ज्यांनी ख-या अर्थाने समाजाला श्रीमंती दिली त्यांच्याबाबत समाज असे अमानुष वागत असतील तर तो साधा कृतघ्नपणा नाही, ते माणुसकीचे विस्मरण आहे. बुद्ध, येशू, महावीर, गांधी, लिंकन यांच्या शिकवणीकडे आपण पाठ फिरविली असल्याचे सांगणारे हे चित्र आहे आणि ते जागतिक आहे. जनावरे पोसायची आणि पाळायची आणि माणसे मारायची यात कोणती संवेदनशीलता वा अनुकंपेची भावना असते? माणसांविषयीचा दुष्टावा हा समाजाच्या सुसंस्कृत होण्याचे लक्षण बनला काय? की त्या सा-या चांगल्या प्रवृतींशी आपण आपले नातेच तोडून घेतले आहेत?

टॅग्स :AmericaअमेरिकाMigrationस्थलांतरण