शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनुष्यधर्माचा विसर... माणसे मारायची यात कोणती संवेदनशीलता वा अनुकंपेची भावना असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:34 IST

अमेरिकेच्या ट्रम्पला त्यांच्या देशात नव्याने येणारे मेक्सिकन नकोत आणि आधी आलेले मेक्सिकनही देशाबाहेर घालवायचे आहे.

माणसे आपली भूमी वा देश सहजासहजी सोडायला तयार होत नाहीत. पण आपला देश वा भूमी आपल्याला न्याय देत नसेल वा जगवायलाच अकार्यक्षम असेल तर माणसांनी काय करायचे असते? कोरड्या व निपजाऊ जमिनी आणि रोजगार न देणारे देश त्यांनी सोडायचे की देशभक्तीच्या नावाने त्यातच पाय घासून मरायचे? त्यातून आपले समाज दिवसेंदिवस जास्तीचे एकारलेले धर्मांध, जात्यंध व वर्णांध होत असतील आणि त्यातील बहुसंख्यांक लोक अल्पसंख्याकांना देशाबाहेर घालवायला तयार झाले असतील तर दुबळ्या वर्गाने कुठे जायचे असते? म. गांधी म्हणत शक्तिशाली वर्गाने, देशाने, सरकारने व राजकारणाने नेहमी दुबळ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. परंतु आताचे जगभराचे राज्यकर्ते या शिकवणीच्या नेमके उलट वागत आहेत आणि त्यात पूर्व-पश्चिम असा भेद करण्यातही अर्थ उरला नाही.

अमेरिकेच्या ट्रम्पला त्यांच्या देशात नव्याने येणारे मेक्सिकन नकोत आणि आधी आलेले मेक्सिकनही देशाबाहेर घालवायचे आहे. त्यांची झळ लागली तर ते अमेरिकेत आलेल्या चिनी, भारतीय, पाकिस्तानी व इतर देशातील विद्यार्थी व नोकरदारांनाही हाकलतील व त्यांच्या जागा स्वदेशी लोकांना देतील. वर त्याचे समर्थन ते ‘भूमिपुत्रांचे हक्क’ म्हणूनही करू शकतील. फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांतही आता कृष्णवर्णीय नागरिकांना देशाबाहेर घालविण्याची चळवळ सुरू झाली आहे. तेथील हिंसाचार व हाणामाऱ्यांमध्ये मुख्य कारणही तेच आहे. इकडे म्यानमारच्या बौद्धांना रोहिंगे घालवायचे किंवा मारायचे आहेत.

याआधी श्रीलंकेच्या सिंहली बहुसंख्येने तेथील तामीळ अल्पसंख्याकांविरुद्ध हेच केले. सगळ्या दक्षिण मध्य आशियात शिया विरुद्ध सुन्नी किंवा कडवे विरुद्ध उदारमतवादी यांच्यात सुरू असलेली युद्धे याच पातळीवर आली आहेत. भारतातील अरुणाचल व आसामात फार पूर्वी आलेल्या अल्पसंख्य मुस्लिमांना देशाबाहेर घालविण्याची प्रतिज्ञाच अमित शहा यांनी केली आहे. मुंबईत हिंदी भाषिक नकोत, बिहारी नकोत, दक्षिण भारतीय नकोत या चळवळी होऊन गेल्या. त्या संपल्या मात्र नाहीत. भूमिपुत्रांना न्याय ही बाब खरी आहे. मात्र, माणुसकीला न्याय ही त्याहून मोठी व श्रेष्ठ बाब आहे. देश म्हणजे सर्वसमावेशकता असे जे म्हटले जाते ते सा-या जगाबाबतही खरे आहे. यातला मुख्य प्रश्न घालवून दिलेल्या दरिद्री व उपाशी स्त्री-पुरुषांनी जायचे कुठे हा आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने त्यासाठी उभारलेल्या निर्वासितांच्या छावण्या भरल्या आहेत. त्यात प्राथमिक सोयीही नाहीत, अन्न अपुरे व पाण्याचा अभाव आहे. स्वदेश आश्रय देत नाही आणि विदेश जागा देत नाही, अशा या मोठ्या जनसंख्येच्या विश्वात आपल्याकडील फूटपाथवर जगणाऱ्यांचे जीणे असे आहे. निर्वासितांच्या अशा छावण्यांची जी चित्रे दूरचित्रवाहिन्यांवर दाखविली जातात ती अंत:करणाचा ठाव घेणारी आहेत. रस्त्यात, समुद्राकाठी व जंगलात मरून पडलेली मुले एकविसाव्या जगाला पाहावी लागणे हा काळाचा विकास दाखविणारा प्रकार नसून माणुसकीचा -हास दाखविणारे वास्तव आहे. समृद्धी व संपत्ती असणारे देशही असे वागत असतील आणि ‘माणूस’ या प्राण्याला अन्नपाण्यावाचून तडफडत मरायला लावीत असतील तर दरिद्री देशांनी काय करायचे असते? त्यातून ज्यांना हाकलायचे त्यांनी, या संपन्नांची व समृद्ध वर्गांची वर्षानुवर्षे सेवा केली असते.

अमेरिकेची समृद्धी कृष्णवर्णीय गुलामांच्या श्रमातून आली आहे. फ्रान्स व युरोपही आशिया व आफ्रिका खंडावर वसाहतवाद लादून श्रीमंत झाला आहे. ज्यांनी समृद्धी दिली व ज्यांनी ख-या अर्थाने समाजाला श्रीमंती दिली त्यांच्याबाबत समाज असे अमानुष वागत असतील तर तो साधा कृतघ्नपणा नाही, ते माणुसकीचे विस्मरण आहे. बुद्ध, येशू, महावीर, गांधी, लिंकन यांच्या शिकवणीकडे आपण पाठ फिरविली असल्याचे सांगणारे हे चित्र आहे आणि ते जागतिक आहे. जनावरे पोसायची आणि पाळायची आणि माणसे मारायची यात कोणती संवेदनशीलता वा अनुकंपेची भावना असते? माणसांविषयीचा दुष्टावा हा समाजाच्या सुसंस्कृत होण्याचे लक्षण बनला काय? की त्या सा-या चांगल्या प्रवृतींशी आपण आपले नातेच तोडून घेतले आहेत?

टॅग्स :AmericaअमेरिकाMigrationस्थलांतरण