शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अन्नाची प्रचंड नासाडी होत असल्यानं लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे ठरवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:46 IST

लोकांनी काय खावे आणि किती खावे हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर ना सरकार निर्बंध आणू शकते ना न्यायालये त्याबाबत कोणते दिशानिर्देश देऊ शकतात.

लोकांनी काय खावे आणि किती खावे हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर ना सरकार निर्बंध आणू शकते ना न्यायालये त्याबाबत कोणते दिशानिर्देश देऊ शकतात. पण आज देशात किंबहुना जगभरातच अन्नाची जी प्रचंड नासाडी होत आहे ती पाहू जाता लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे सांगण्याची वेळ आली आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. अन्नाची नासाडी हा संपूर्ण जगाच्या चिंतेचा विषय राहिला आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था नियमितपणे सर्वेक्षण करून आपल्या अहवालातून अन्न नासाडीबद्दल चिंता करीत असतात. पण कुठेही याबाबत जागृती झाल्याचे दिसून येत नाही. नागपुरात यासंदर्भात नुकत्याच झालेल्या एका पाहणीत रोज सात लाख टन अन्न वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ३० लाखांच्या या शहरात रोज एवढ्या अन्नाची नासाडी होत असेल तर संपूर्ण भारताची स्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येतो. २०१५ मध्ये झालेल्या एका पाहणीत आपल्या देशात दरवर्षी एक लाख कोटी रुपयांच्या अन्नाची नासाडी होत असल्याचे निष्पन्न झाले. युरोप आणि उत्तर अमेरिका अन्न नासाडीत आघाडीवर असले तरी भारतासारख्या विकसनशील देशात, जेथे लाखो लोक उपासमार किंवा एकवेळच्या जेवणावर जगतात, लाखो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत तेथे अशी अन्ननासाडी होणे हा मोठा सामाजिक गुन्हा मानला पाहिजे. आज देशाची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागते दुसरीकडे लाखो टन अन्न नाल्यात फेकले जाते. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे. लग्नकार्य, पार्ट्या, सार्वजनिक उत्सव, पारिवारिक समारंभ, हॉटेलिंग ही या नासाडीची प्रमुख केंद्रे आहेत. पूर्वी लग्नकार्यात खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही पंगती उठायच्या. जेवणाचा आग्रहही व्हायचा पण पत्रावळीत उरलेले अन्न मांडवासमोर जमलेल्या गरिबांना वाटले जायचे. गावाबाहेरच्या कुडाच्या झोपड्यात राहणारे सारे जणू लग्नाला यायचे. या निमित्ताने गरीब गोडधोड खाऊन तृप्त व्हायचे. वधू-वराला तोंडभरून आशीर्वाद द्यायचे. पण आताशा पंगत हा प्रकार लोकांना मागास वाटू लागला. पंगतीत अन्न वाया जाते अशी सबब पुढे करून लोकांनी बुफे संस्कृती डोक्यावर घेतली. पण झाले उलटेच. पंगतीच्या तुलनेत बुफेमध्ये कितीतरी पटीने जास्त खाद्यान्नाची नासाडी होऊ लागली. उच्चभ्रू लोकांचे ठीक पण सर्वसामान्यांत अजूनही बुफे रुळला नाही ही वस्तुस्थिती आहे. प्लेटमध्ये सुरुवातीलाच भरपूर पदार्थ घ्यावेत आणि भूक शमली की उरलेले अन्न टाकून द्यावे, असे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्थितीही वेगळी नाही. लोकांत हॉटेलिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. संपूर्ण फॅमिली घेऊन हॉटेलात खाणे आता स्टेटस सिम्बॉल बनले आहे. अर्थात कुणी कुठे खावे हा पुन्हा ज्याच्या, त्याच्या ऐपतीचा प्रश्न आहे. पण हॉटेलात भरमसाट पदार्थ मागवून नंतर अर्धेअधिक जिन्नस तसेच टाकून उठणेही प्रतिष्ठेचे मानले जात आहे. हे उरलेले अन्न एकतर नाल्यात फेकून दिले जाते किंवा त्याची कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. ‘आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रह्म’ मानले जाते. आजही आपली वृद्ध मंडळी ताटातील सर्व पदार्थांचा एक घास बाजूला काढून त्याला नमन केल्यावरच जेवायला सुरुवात करतात. आजची ही अन्ननासाडी या परंपरेला छेद देणारी तर आहेच पण रोज अर्धपोटी झोपणाºया गोरगरिबांची आणि सकस आहाराअभावी कुपोषणाला बळी पडणाºया देशातील लक्षावधी बालकांची क्रूर चेष्टा नव्हे का?

टॅग्स :foodअन्न