शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

अन्नाची प्रचंड नासाडी होत असल्यानं लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे ठरवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:46 IST

लोकांनी काय खावे आणि किती खावे हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर ना सरकार निर्बंध आणू शकते ना न्यायालये त्याबाबत कोणते दिशानिर्देश देऊ शकतात.

लोकांनी काय खावे आणि किती खावे हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर ना सरकार निर्बंध आणू शकते ना न्यायालये त्याबाबत कोणते दिशानिर्देश देऊ शकतात. पण आज देशात किंबहुना जगभरातच अन्नाची जी प्रचंड नासाडी होत आहे ती पाहू जाता लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे सांगण्याची वेळ आली आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. अन्नाची नासाडी हा संपूर्ण जगाच्या चिंतेचा विषय राहिला आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था नियमितपणे सर्वेक्षण करून आपल्या अहवालातून अन्न नासाडीबद्दल चिंता करीत असतात. पण कुठेही याबाबत जागृती झाल्याचे दिसून येत नाही. नागपुरात यासंदर्भात नुकत्याच झालेल्या एका पाहणीत रोज सात लाख टन अन्न वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ३० लाखांच्या या शहरात रोज एवढ्या अन्नाची नासाडी होत असेल तर संपूर्ण भारताची स्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येतो. २०१५ मध्ये झालेल्या एका पाहणीत आपल्या देशात दरवर्षी एक लाख कोटी रुपयांच्या अन्नाची नासाडी होत असल्याचे निष्पन्न झाले. युरोप आणि उत्तर अमेरिका अन्न नासाडीत आघाडीवर असले तरी भारतासारख्या विकसनशील देशात, जेथे लाखो लोक उपासमार किंवा एकवेळच्या जेवणावर जगतात, लाखो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत तेथे अशी अन्ननासाडी होणे हा मोठा सामाजिक गुन्हा मानला पाहिजे. आज देशाची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागते दुसरीकडे लाखो टन अन्न नाल्यात फेकले जाते. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे. लग्नकार्य, पार्ट्या, सार्वजनिक उत्सव, पारिवारिक समारंभ, हॉटेलिंग ही या नासाडीची प्रमुख केंद्रे आहेत. पूर्वी लग्नकार्यात खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही पंगती उठायच्या. जेवणाचा आग्रहही व्हायचा पण पत्रावळीत उरलेले अन्न मांडवासमोर जमलेल्या गरिबांना वाटले जायचे. गावाबाहेरच्या कुडाच्या झोपड्यात राहणारे सारे जणू लग्नाला यायचे. या निमित्ताने गरीब गोडधोड खाऊन तृप्त व्हायचे. वधू-वराला तोंडभरून आशीर्वाद द्यायचे. पण आताशा पंगत हा प्रकार लोकांना मागास वाटू लागला. पंगतीत अन्न वाया जाते अशी सबब पुढे करून लोकांनी बुफे संस्कृती डोक्यावर घेतली. पण झाले उलटेच. पंगतीच्या तुलनेत बुफेमध्ये कितीतरी पटीने जास्त खाद्यान्नाची नासाडी होऊ लागली. उच्चभ्रू लोकांचे ठीक पण सर्वसामान्यांत अजूनही बुफे रुळला नाही ही वस्तुस्थिती आहे. प्लेटमध्ये सुरुवातीलाच भरपूर पदार्थ घ्यावेत आणि भूक शमली की उरलेले अन्न टाकून द्यावे, असे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्थितीही वेगळी नाही. लोकांत हॉटेलिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. संपूर्ण फॅमिली घेऊन हॉटेलात खाणे आता स्टेटस सिम्बॉल बनले आहे. अर्थात कुणी कुठे खावे हा पुन्हा ज्याच्या, त्याच्या ऐपतीचा प्रश्न आहे. पण हॉटेलात भरमसाट पदार्थ मागवून नंतर अर्धेअधिक जिन्नस तसेच टाकून उठणेही प्रतिष्ठेचे मानले जात आहे. हे उरलेले अन्न एकतर नाल्यात फेकून दिले जाते किंवा त्याची कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. ‘आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रह्म’ मानले जाते. आजही आपली वृद्ध मंडळी ताटातील सर्व पदार्थांचा एक घास बाजूला काढून त्याला नमन केल्यावरच जेवायला सुरुवात करतात. आजची ही अन्ननासाडी या परंपरेला छेद देणारी तर आहेच पण रोज अर्धपोटी झोपणाºया गोरगरिबांची आणि सकस आहाराअभावी कुपोषणाला बळी पडणाºया देशातील लक्षावधी बालकांची क्रूर चेष्टा नव्हे का?

टॅग्स :foodअन्न