शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अन्नाची प्रचंड नासाडी होत असल्यानं लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे ठरवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:46 IST

लोकांनी काय खावे आणि किती खावे हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर ना सरकार निर्बंध आणू शकते ना न्यायालये त्याबाबत कोणते दिशानिर्देश देऊ शकतात.

लोकांनी काय खावे आणि किती खावे हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर ना सरकार निर्बंध आणू शकते ना न्यायालये त्याबाबत कोणते दिशानिर्देश देऊ शकतात. पण आज देशात किंबहुना जगभरातच अन्नाची जी प्रचंड नासाडी होत आहे ती पाहू जाता लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे सांगण्याची वेळ आली आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. अन्नाची नासाडी हा संपूर्ण जगाच्या चिंतेचा विषय राहिला आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था नियमितपणे सर्वेक्षण करून आपल्या अहवालातून अन्न नासाडीबद्दल चिंता करीत असतात. पण कुठेही याबाबत जागृती झाल्याचे दिसून येत नाही. नागपुरात यासंदर्भात नुकत्याच झालेल्या एका पाहणीत रोज सात लाख टन अन्न वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ३० लाखांच्या या शहरात रोज एवढ्या अन्नाची नासाडी होत असेल तर संपूर्ण भारताची स्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येतो. २०१५ मध्ये झालेल्या एका पाहणीत आपल्या देशात दरवर्षी एक लाख कोटी रुपयांच्या अन्नाची नासाडी होत असल्याचे निष्पन्न झाले. युरोप आणि उत्तर अमेरिका अन्न नासाडीत आघाडीवर असले तरी भारतासारख्या विकसनशील देशात, जेथे लाखो लोक उपासमार किंवा एकवेळच्या जेवणावर जगतात, लाखो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत तेथे अशी अन्ननासाडी होणे हा मोठा सामाजिक गुन्हा मानला पाहिजे. आज देशाची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागते दुसरीकडे लाखो टन अन्न नाल्यात फेकले जाते. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे. लग्नकार्य, पार्ट्या, सार्वजनिक उत्सव, पारिवारिक समारंभ, हॉटेलिंग ही या नासाडीची प्रमुख केंद्रे आहेत. पूर्वी लग्नकार्यात खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही पंगती उठायच्या. जेवणाचा आग्रहही व्हायचा पण पत्रावळीत उरलेले अन्न मांडवासमोर जमलेल्या गरिबांना वाटले जायचे. गावाबाहेरच्या कुडाच्या झोपड्यात राहणारे सारे जणू लग्नाला यायचे. या निमित्ताने गरीब गोडधोड खाऊन तृप्त व्हायचे. वधू-वराला तोंडभरून आशीर्वाद द्यायचे. पण आताशा पंगत हा प्रकार लोकांना मागास वाटू लागला. पंगतीत अन्न वाया जाते अशी सबब पुढे करून लोकांनी बुफे संस्कृती डोक्यावर घेतली. पण झाले उलटेच. पंगतीच्या तुलनेत बुफेमध्ये कितीतरी पटीने जास्त खाद्यान्नाची नासाडी होऊ लागली. उच्चभ्रू लोकांचे ठीक पण सर्वसामान्यांत अजूनही बुफे रुळला नाही ही वस्तुस्थिती आहे. प्लेटमध्ये सुरुवातीलाच भरपूर पदार्थ घ्यावेत आणि भूक शमली की उरलेले अन्न टाकून द्यावे, असे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्थितीही वेगळी नाही. लोकांत हॉटेलिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. संपूर्ण फॅमिली घेऊन हॉटेलात खाणे आता स्टेटस सिम्बॉल बनले आहे. अर्थात कुणी कुठे खावे हा पुन्हा ज्याच्या, त्याच्या ऐपतीचा प्रश्न आहे. पण हॉटेलात भरमसाट पदार्थ मागवून नंतर अर्धेअधिक जिन्नस तसेच टाकून उठणेही प्रतिष्ठेचे मानले जात आहे. हे उरलेले अन्न एकतर नाल्यात फेकून दिले जाते किंवा त्याची कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. ‘आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रह्म’ मानले जाते. आजही आपली वृद्ध मंडळी ताटातील सर्व पदार्थांचा एक घास बाजूला काढून त्याला नमन केल्यावरच जेवायला सुरुवात करतात. आजची ही अन्ननासाडी या परंपरेला छेद देणारी तर आहेच पण रोज अर्धपोटी झोपणाºया गोरगरिबांची आणि सकस आहाराअभावी कुपोषणाला बळी पडणाºया देशातील लक्षावधी बालकांची क्रूर चेष्टा नव्हे का?

टॅग्स :foodअन्न