शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

उठता बसता झोडपणारा निसर्ग कसा सावरायचा?

By किरण अग्रवाल | Updated: April 30, 2023 10:54 IST

Unseasonal Rain : भर उन्हाळ्यात अवकाळी बरसलेल्या लागोपाठच्या गारांच्या पावसाने बळीराजाची उरली-सुरली स्वप्नेही मातीत मिळविली आहेत

- किरण अग्रवाल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मश्गुल असलेल्या नेत्यांनी या बाजार समित्यांचे सदस्य असलेल्या बळीराजाच्या डोळ्यात अवकाळी पावसाच्या फटक्याने जे अश्रू आले आहेत, ते पुसण्यासाठी तातडीने शेतीच्या बांधावर जायला हवे, अन्यथा नुकसानग्रस्तांच्या वेदना व विवंचनांतून नेत्यांच्या राजकीय स्वप्नांवरच पाणी फिरल्याखेरीज राहणार नाही.

भर उन्हाळ्यात अवकाळी बरसलेल्या लागोपाठच्या गारांच्या पावसाने बळीराजाची उरली-सुरली स्वप्नेही मातीत मिळविली आहेत. मात्र निसर्गाने मारल्यावर सरकारने तारण्याची भाबडी अपेक्षा असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्याच राजकारणात मश्गुल असल्याने यासंबंधीची हताशता अधिक बोचरी बनणे स्वाभाविक ठरले आहे.

 

मनुष्याने आपल्या भौतिक सुखाच्या नादात निसर्गालाच ओरबाडून काढल्यामुळे आता निसर्गाचेच चक्र बिघडून असा काही असमतोल निर्माण झालेला आहे की त्यात बळीराजा नागवला जात आहे. यंदा तसे पीक पाणी जोमात होते. पण अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अगोदरच पाणी आणून ठेवले. त्यात या आठवड्यात पुन्हा चार-पाच दिवस गारपिटीचा असा काही तडाखा बसला की होत्याचे नव्हते झाले. अकोला जिल्ह्याच्या पातुर व बार्शीटाकळी परिसरात तर चक्क लिंबू एवढ्या गारा बरसल्या. अनेक ठिकाणी इतक्या गारा साचल्या की जणू आपण सिमला - काश्मिरात असल्याचा भास व्हावा. हजारो हेक्टर शेतजमीन बाधित झाली. संपूर्ण पश्चिम वऱ्हाडात कमी अधिक फरकाने असेच चित्र बघावयास मिळत आहे.

महत्त्वाचे म्हणजे अनेकांकडे कांदा काढणीला आला आहे तर हरभरा खळ्यात पडला आहे, तो भिजून गेला. लिंबू, आंब्यासारखी फळवर्गीय झाडे झडून गेलीत. एकीकडे बारदाना अभावी नाफेडची खरेदी खोळंबली असल्याने शेत शिवारात पडून असलेला माल शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर चिंब भिजला. काही ठिकाणी वाड्या वस्तीवरील घरांचे टीनपत्रे उडून अनेकांचा संसार उघड्यावर आला. या स्थितीत नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासन तातडीने कामाला लागले आहे. पण आपल्या राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा कैवार प्रदर्शवणारे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी आहेत कुठे, हे दुर्बीण घेऊन शोधण्याची वेळ आली आहे.

 

सध्या राज्य स्तरावरील राजकीय स्थिती काहीशी अस्थिर व संभ्रमाची बनली आहे. आमदार अपात्रते प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले असून, त्यातून होणाऱ्या संभाव्य उलथापालथीत आपले काय? याची चिंता बहुतेकांना लागली आहे. त्यातच जागोजागी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होत असून आपापले सुभे सांभाळण्यासाठी सारेच राजकीय नेते त्यात व्यस्त आहेत. अवकाळीचा फटका बसलेल्या बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या बांधावर जाण्याइतका वेळ आहे कुणाकडे? होऊ घातलेल्या निवडणुका पाहता, राजकीय आघाड्यांवर सक्रियता आली आहे खरी; परंतु ती राजकीय आरोप-प्रत्यारोप व आंदोलनांपलीकडे जाताना दिसत नाही. अशात शेतीच्या बांधावर जाऊन चिखल तुडविणारे व पांढऱ्या डगल्यांवर माती लावून घेणारे कसे आढळणार? नाही म्हणायला काही अपवाद आहेतही, पण ज्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आधार जाणवतो अशा मान्यवरांच्या भेटी अभावानेच होताना दिसतात. अवकाळी पावसाच्या फटक्याचे दुःख अधिक बोचरे ठरत आहे ते त्यामुळेच.

दुर्दैव असे की, एकीकडे निसर्गाचा मार बसत असताना दुसरीकडे रासायनिक खतांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. राज्याचे कृषिमंत्री मारे या किमती लवकरच नियंत्रणात येतील, असे सांगत आहेत. परंतु ते कधी? हंगाम आटोपून गेल्यावर का, असा प्रश्न आहे. बारदानाअभावी नाफेडच्या खरेदीचा झिम्मा सर्वच ठिकाणी अद्यापही सुरूच आहे तो कधी थांबणार? तुटपुंजी का असेना, किमान झालेला खर्च भरून काढणारी नुकसान भरपाई कधी हाती पडणार, असे असंख्य प्रश्न बळीराजाला अस्वस्थ करीत असताना राजकारणी मात्र बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये फुगड्या खेळत आहेत.

सारांशात, अलीकडे वारंवार बसणारा अवकाळीचा फटका पाहता निसर्गाच्या असमतोलाची कारणे शोधून पर्यावरण सावरण्यासाठी तर प्रयत्न व्हायलाच हवेत, पण या अवकाळीने बळीराजाच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्यासाठी सर्व कामे बाजूला सारून स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेताच्या बांधावर पोहोचणे अपेक्षित आहे. अन्यथा डोळ्यातील अश्रूंचा पूर निवडणुकीतील मतपेट्यांची गणिते बिघडवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.