शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण कसे नेऊ घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 02:34 IST

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’, असे बऱ्याचदा गमतीने बोलले जाते. परंतु यातील गमतीचा भाग जर वगळला तर बहुतांश वेळा त्यात तथ्य आढळते.

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’, असे बऱ्याचदा गमतीने बोलले जाते. परंतु यातील गमतीचा भाग जर वगळला तर बहुतांश वेळा त्यात तथ्य आढळते. सरकारी दरबारात कोणतेही काम असो वा शासनस्तरावरील आदेश, त्याची अंमलबजावणी तात्काळ होईलच याची शाश्वती नसते. शासनाने घेतलेल्या निर्णयांची यादी दिवसेंदिवस लांबलचक होत जाते, मात्र त्यातील किती निर्णयांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत आहे याची शहानिशा करण्याच्या भानगडीत कुणी पडताना दिसत नाही. राज्यातील मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ६ फेब्रुवारी १९८७ रोजी मुलींना पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत केले. पाच वर्षांनंतर सुधारित अध्यादेशही काढण्यात आला. आदेश, अध्यादेश एकामागून एक निघत राहिले, मात्र मोफत शिक्षणाच्या गंगेतील ओंजळभर पाणीदेखील मुलींपर्यंत पोहचले नाही. शासनाचा अध्यादेश केवळ नावापुरताच उरल्याचा अनुभव राज्यातील पालकवर्ग दरवर्षी घेत आला आहे. मुलींकडून दरवेळी फी आकारल्याशिवाय त्यांचा शाळा-महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होत नसतो. पुन्हा अमुक निधी, तमुक निधीच्या नावाखाली शिक्षण संस्थांकडून अवाजवी डोनेशन आकारले जाते ते वेगळेच. तरीदेखील नाईलाज म्हणून सोशिक पालकवर्ग मुकाट्याने पैसे देऊन आपापल्या परीने मुलींच्या शिक्षणाची गरज भागवित आले आहेत. बारावीपर्यंतच्या मुलींचे शिक्षण मोफत करण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडत नसताना छात्रभारती विद्यार्थी संघटना पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यासाठी तीन वर्षांपासून शासनाशी संघर्ष करीत आली आहे. परंतु आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी बिकट अवस्था मुलींच्या शिक्षणाची झाल्याचे दिसून येते. असेच चित्र कायम राहिले तर उद्या ‘आम्ही मुली सांगू परोपरी, शिक्षण नेऊ घरोघरी’ असे मुली कोणत्या तोंडाने म्हणतील? दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी प्यावे, अशा एका अनुभवाची प्रचिती काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात घेण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्तीच्या अनुषंगाने येत आहेच. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तारूढ पक्ष वगळता विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्यावर तत्त्वत: निकषांसह कर्जमुक्तीची घोषणा झाली. आता काल-परवाच पंजाबमधील शासनाने मुलींना पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला तर पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या राज्याची शान तरी राखली जाईल. पण होईल का तसे? कारण आपल्याकडे मागितल्याखेरीज द्यायचे नाही असाच अलिखित नियम आहे.