शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

शिक्षण कसे नेऊ घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 02:34 IST

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’, असे बऱ्याचदा गमतीने बोलले जाते. परंतु यातील गमतीचा भाग जर वगळला तर बहुतांश वेळा त्यात तथ्य आढळते.

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’, असे बऱ्याचदा गमतीने बोलले जाते. परंतु यातील गमतीचा भाग जर वगळला तर बहुतांश वेळा त्यात तथ्य आढळते. सरकारी दरबारात कोणतेही काम असो वा शासनस्तरावरील आदेश, त्याची अंमलबजावणी तात्काळ होईलच याची शाश्वती नसते. शासनाने घेतलेल्या निर्णयांची यादी दिवसेंदिवस लांबलचक होत जाते, मात्र त्यातील किती निर्णयांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत आहे याची शहानिशा करण्याच्या भानगडीत कुणी पडताना दिसत नाही. राज्यातील मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ६ फेब्रुवारी १९८७ रोजी मुलींना पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत केले. पाच वर्षांनंतर सुधारित अध्यादेशही काढण्यात आला. आदेश, अध्यादेश एकामागून एक निघत राहिले, मात्र मोफत शिक्षणाच्या गंगेतील ओंजळभर पाणीदेखील मुलींपर्यंत पोहचले नाही. शासनाचा अध्यादेश केवळ नावापुरताच उरल्याचा अनुभव राज्यातील पालकवर्ग दरवर्षी घेत आला आहे. मुलींकडून दरवेळी फी आकारल्याशिवाय त्यांचा शाळा-महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होत नसतो. पुन्हा अमुक निधी, तमुक निधीच्या नावाखाली शिक्षण संस्थांकडून अवाजवी डोनेशन आकारले जाते ते वेगळेच. तरीदेखील नाईलाज म्हणून सोशिक पालकवर्ग मुकाट्याने पैसे देऊन आपापल्या परीने मुलींच्या शिक्षणाची गरज भागवित आले आहेत. बारावीपर्यंतच्या मुलींचे शिक्षण मोफत करण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडत नसताना छात्रभारती विद्यार्थी संघटना पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यासाठी तीन वर्षांपासून शासनाशी संघर्ष करीत आली आहे. परंतु आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी बिकट अवस्था मुलींच्या शिक्षणाची झाल्याचे दिसून येते. असेच चित्र कायम राहिले तर उद्या ‘आम्ही मुली सांगू परोपरी, शिक्षण नेऊ घरोघरी’ असे मुली कोणत्या तोंडाने म्हणतील? दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी प्यावे, अशा एका अनुभवाची प्रचिती काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात घेण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्तीच्या अनुषंगाने येत आहेच. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तारूढ पक्ष वगळता विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्यावर तत्त्वत: निकषांसह कर्जमुक्तीची घोषणा झाली. आता काल-परवाच पंजाबमधील शासनाने मुलींना पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला तर पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या राज्याची शान तरी राखली जाईल. पण होईल का तसे? कारण आपल्याकडे मागितल्याखेरीज द्यायचे नाही असाच अलिखित नियम आहे.