शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिक्षण कसे नेऊ घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 02:34 IST

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’, असे बऱ्याचदा गमतीने बोलले जाते. परंतु यातील गमतीचा भाग जर वगळला तर बहुतांश वेळा त्यात तथ्य आढळते.

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’, असे बऱ्याचदा गमतीने बोलले जाते. परंतु यातील गमतीचा भाग जर वगळला तर बहुतांश वेळा त्यात तथ्य आढळते. सरकारी दरबारात कोणतेही काम असो वा शासनस्तरावरील आदेश, त्याची अंमलबजावणी तात्काळ होईलच याची शाश्वती नसते. शासनाने घेतलेल्या निर्णयांची यादी दिवसेंदिवस लांबलचक होत जाते, मात्र त्यातील किती निर्णयांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत आहे याची शहानिशा करण्याच्या भानगडीत कुणी पडताना दिसत नाही. राज्यातील मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ६ फेब्रुवारी १९८७ रोजी मुलींना पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत केले. पाच वर्षांनंतर सुधारित अध्यादेशही काढण्यात आला. आदेश, अध्यादेश एकामागून एक निघत राहिले, मात्र मोफत शिक्षणाच्या गंगेतील ओंजळभर पाणीदेखील मुलींपर्यंत पोहचले नाही. शासनाचा अध्यादेश केवळ नावापुरताच उरल्याचा अनुभव राज्यातील पालकवर्ग दरवर्षी घेत आला आहे. मुलींकडून दरवेळी फी आकारल्याशिवाय त्यांचा शाळा-महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होत नसतो. पुन्हा अमुक निधी, तमुक निधीच्या नावाखाली शिक्षण संस्थांकडून अवाजवी डोनेशन आकारले जाते ते वेगळेच. तरीदेखील नाईलाज म्हणून सोशिक पालकवर्ग मुकाट्याने पैसे देऊन आपापल्या परीने मुलींच्या शिक्षणाची गरज भागवित आले आहेत. बारावीपर्यंतच्या मुलींचे शिक्षण मोफत करण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडत नसताना छात्रभारती विद्यार्थी संघटना पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यासाठी तीन वर्षांपासून शासनाशी संघर्ष करीत आली आहे. परंतु आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी बिकट अवस्था मुलींच्या शिक्षणाची झाल्याचे दिसून येते. असेच चित्र कायम राहिले तर उद्या ‘आम्ही मुली सांगू परोपरी, शिक्षण नेऊ घरोघरी’ असे मुली कोणत्या तोंडाने म्हणतील? दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी प्यावे, अशा एका अनुभवाची प्रचिती काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात घेण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्तीच्या अनुषंगाने येत आहेच. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तारूढ पक्ष वगळता विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्यावर तत्त्वत: निकषांसह कर्जमुक्तीची घोषणा झाली. आता काल-परवाच पंजाबमधील शासनाने मुलींना पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला तर पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या राज्याची शान तरी राखली जाईल. पण होईल का तसे? कारण आपल्याकडे मागितल्याखेरीज द्यायचे नाही असाच अलिखित नियम आहे.