शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

हा गौप्यस्फोट कसा?

By admin | Updated: April 18, 2016 02:46 IST

केन्द्रातील विद्यमान रालोआ सरकारने अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन काँग्रेसशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करुन तेथील लोकनियुक्त सरकारे बरखास्त केल्याबद्दल

केन्द्रातील विद्यमान रालोआ सरकारने अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन काँग्रेसशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करुन तेथील लोकनियुक्त सरकारे बरखास्त केल्याबद्दल चोहो बाजूंनी टीका होत असताना, काँग्रेस सत्तेत असताना तिची धोरणे आणि तिच्या हालचाली फार काही वेगळ्या नव्हत्या असे जे काही उद्गार माजी कायदा मंत्री हंसराज भरद्वाज यांनी काढले आहेत त्यांना गौप्यस्फोट वगैरे काही म्हणता येणार नाही. त्याची दोन प्रमुख कारणे. नेहरु-गांधी काळापासून भरद्वाज काँग्रेस पक्षाचे निष्ठावान राहिले असले तरी त्यांना पक्षाने वेळोवेळी त्याचे पारितोषिकही दिलेच आहे. संपुआच्या पहिल्या पंचवार्षिकात ते कायदा मंत्री होते पण त्यांना दुसऱ्यांदा तशी संधी दिली गेली नसली तरी राज्यपालपद मात्र दिले गेले होते. राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर मात्र ते सत्तास्पर्शापासून वंचित राहिले. पण समाधानी वृत्ती आणि राजकारणी यांच्यात तसेही नेहमी खडाष्टकच असल्याने आपल्याला डावलले जाते आहे अशी भावना भरद्वाज यांच्या मनात घर करु लागली. तिची वाट मोकळी करुन देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकादेखील केली. त्यांची ताजी टीकादेखील तशाच धाटणीची आहे. सुमारे नऊ वर्षांपूर्वी म्हणजे ते देशाचे कायदा मंत्री असताना तत्कालीन केन्द्र सरकार उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह सरकार बरखास्त करायला निघाले होते पण कायदा मंत्री या नात्याने आपण त्याला सक्त विरोध केला असा दावा भरद्वाज यांनी केला आहे. मुलायम यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते पण त्यांच्या पाठीशी घट्ट बहुमत असल्याने त्यांना बरखास्त करता येणार नाही अशी ठाम भूमिका आपण तेव्हां घेतली होती. पण अरुणाचल आणि उत्तराखंड राज्यांमध्ये खुद्द काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर व विधानसभा अध्यक्षांनी पक्षपातीपणा केल्यानंतर राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यापलीकडे पर्यायच राहिला नव्हता असे विधान करुन भरद्वाज यांनी रालोआच्या निर्णयाचे खुले समर्थनही केले आहे. त्यांनी केलेले वक्तव्य गौप्यस्फोट या श्रेणीत न बसण्याचे दुसरे कारण म्हणजे केन्द्रात नव्याने सत्तारुढ होणाऱ्या पक्षाच्या विचारांशी मेळ न खाणारी राज्ये बरखास्त करण्याचा पायंडा फार पूर्वीच देशात पडला आहे. जे नैतिक नसते, ते वैधही नसते असे काही नाही. परिणामी एखादे लोकनियुक्त राज्य सरकार सबळ कारणांशिवाय बरखास्त करणे जरी अनैतिक मानले जात असले तरी राज्यघटनेने केन्द्र सरकारला जे विशेष अधिकार बहाल केले आहेत, त्यांचा विचार करता बरखास्तीची कृती वा तसा निर्णय करणे सकृतदर्शनी तरी अवैध ठरत नाही. पुढे न्यायालयीन प्रक्रिया सुरु होते तो भाग वेगळा. थोडक्यात, जो पायंडा पाडला गेला आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष सत्तेत आल्यावर त्याचा लाभ उठवित आला आहे ते सांगण्यात कुठला आला आहे गौप्यस्फोट?