शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

किती चौकशा?

By admin | Updated: July 9, 2016 03:09 IST

बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका उपाहारगृहात गेल्या सप्ताहात ज्या सहा आततायी तरुणांनी अतिरेकी हल्ला करुन २८जणांची हत्त्या केली, त्या सहापैकी दोघानी त्यांच्यावर

बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका उपाहारगृहात गेल्या सप्ताहात ज्या सहा आततायी तरुणांनी अतिरेकी हल्ला करुन २८जणांची हत्त्या केली, त्या सहापैकी दोघानी त्यांच्यावर डॉ.झाकीर नाईक यांच्या प्रवचनांचा प्रभाव असल्याचे सांगितल्यावरुन आता भारत सरकारने नाईक यांच्या भाषणांची आणि प्रवचनांची चौकशी सुरु केली आहे. पण कोणत्या व कोणकोणत्या भाषणांची चौकशी करणार हा प्रश्नच आहे. त्यातल्या त्यात जहाल आणि धर्माधर्मात तेढ उत्पन्न होईल अशी भाषणे हुडकून कदाचित नाईक यांच्यावर संपूर्ण देशातच भाषणबंदी लागूही केली जाईल पण त्यातून काय निष्पन्न होणार? डॉ.झाकीर नाईक यांची अनेक भाषणे आणि सवाल-जबाब यू ट्यूबवर आजही उपलब्ध आहेत व ती तशीच राहाणार आहेत. त्यांची पारायणे करणारे लोकही आहेत. परिणामी कॅनडा आणि इंग्लंडप्रमाणे उद्या भारतातही त्यांच्यावर भाषणबंदी लागू केली तर नाईक आणि त्यांच्या चाहत्यांवर काही फरक पडेल असे समजणे वास्तवाला सोडून होईल. शिक्षणाने वैद्यकीय पदवीधर असलेल्या नाईक यांची ‘पीस’ नावाची एक स्वतंत्र खासगी वाहिनी आहे पण तिच्यावरुन ते ‘पीस’ म्हणजे शांततेची शिकवण देण्याऐवजी तेढ निर्माण करणारी शिकवण देतात असा त्यांच्यावर वहीम आहे. मुंबईतील डोंगरी भागात त्यांनी १९९१सालीच इस्लामीक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली असून तिच्यामार्फत ते इस्लामचा प्रचर करतात. पण विलक्षण बाब म्हणजे मुंबई आणि देशतील इस्लाम धर्मातील शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथातील धर्मगुरु नाईक यांना इस्लामविरोधी मानतात तर नाईक यांचे चाहते या दोन्ही पंथातील धर्मगुरुंवर टीका करतात. खुद्द नाईक इसिस या संघटनेला इस्लामविरोधी मानतात. सामान्यत: मूलतत्त्ववादी हिन्दू आणि मुस्लिम परस्परांच्या धर्मावर टीका करतात पण डॉ.नाईक मात्र इस्लामखेरीज अन्य कोणत्याही धर्माला जगात अस्तित्वच नाही अशी मांडणी करतात व त्यामुळेच त्यांच्यावर बंदी लागू करण्यासाठी काही देश पुढे आले आहेत. ते आपल्या प्रवचनांमधून बायबल आणि हिन्दू धर्मग्रंथांबरोबरच बौद्ध, जैन आदि धर्मातील काही दाखले देत असतात पण तो एकूण प्रकार श्रोत्यांना ‘मेस्मराईज’ म्हणजे मंत्रमुग्ध करणारा असतो. साहजिकच ज्यांचा या कोणत्याही धर्माच्या तत्वज्ञानाशी परिचय नसतो, ते चटकन प्रभावाखाली येतात. सध्या ते परदेश दौऱ्यावर असून पुढील सप्ताहात परतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांची चौकशी करणार आहे. ढाक्यात अतिरेकी हल्ला केलेल्या तरुणांनी त्यांच्यावर आपल्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे जरी म्हटले असले तरी आपण हत्त्या करण्यासाठी कोणालाही प्रवृत्त करीत नाही असे नाईक यांचे म्हणणे आहे. तथापि जेव्हां जगाच्या पाठीवर इस्लामखेरीज अन्य कोणत्याही धर्माला अस्तित्वच नाही असे म्हटले जाते तेव्हां त्याचा अविवेकी आणि अविचारी तरुणांवर जो परिणाम घडून येऊ शकतो त्याची जबाबदारी मात्र झाकीर नाईक स्वीकारु इच्छित नाहीत. नाईक यांच्या वाहिनीवर संपुआ सरकारने बंदी लागू केली असता ती मोदी सरकारने का उठवली असा प्रश्न आता काँग्रेसने या संदर्भात विचारला आहे.