शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती बळी

By admin | Updated: September 2, 2016 02:53 IST

हल्ली सररास कायदा मोडण्याची भाषा केली जाते. कायद्यातूनही पळवाटा काढता येतात, असे म्हणत कायद्याची लक्तरे अनेकदा वेशीवर टांगली जातात. असेच करता करता

हल्ली सररास कायदा मोडण्याची भाषा केली जाते. कायद्यातूनही पळवाटा काढता येतात, असे म्हणत कायद्याची लक्तरे अनेकदा वेशीवर टांगली जातात. असेच करता करता एक दिवस ‘आपल्या’पैकीच एक जण पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. वरळीतल्या इवल्याशा पोलीस क्वाटर्समध्ये वास्तव्यास असलेले विलास शिंदे बुधवारच्या घटनेनंतर शहीद झालेही असतील. पण यापुढे असे किती पोलीस ‘आपण’ शहीद करणार आहोत; हा प्रश्न यानिमित्ताने मन सुन्न करणारा आहे. विलास शिंदे यांची चूक काय? तर त्यांनी केवळ हेल्मेट न घातलेल्या तरुणाला अडवले. आणि याचा राग मनात धरून तरुणाने आपल्या भावाच्या मदतीने शिंदे यांच्या डोक्यावर दांडा मारला. या हल्ल्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शिंदे यांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने शिंदे यांच्या कुटुंबीयांना देऊ केलेल्या २५ लाखांच्या मदतीने ही जखम नक्कीच भरून येणारी नाही. कारण यापूर्वी भिवंडी असो वा ठाणे; येथे वाहतूक पोलिसांना झालेल्या मारहाणीनंतरही राज्य सरकार यासंबंधात काहीच कार्यवाही करू शकलेले नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. विलास शिंदे यांच्यासारखे अनेक वाहतूक पोलीस आपल्याला विविध नाक्यांवर भेटतात. आणि जर हेल्मेट घातले नसेल तर आपण त्यांना चुकवण्यात कसे माहीर झालो आहोत? याचे दाखले अनेक जण देत असतात. मात्र शिंदे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पोलीस कार्यरत आहेत, म्हणून आपण सुखासुखी झोपतो. दिवसाचे चोवीस तास ही माणसं वाहतूक नाक्यावर ताटकळत उभी असतात. ही माणसं ज्या घरात, ज्या इमारतीमध्ये वास्तव्य करतात तेथील बांधकामांना कधीच तडे गेलेले आहेत. कुठलीही पोलीस वसाहत असो. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. धड पगार नाही, धड घर नाही आणि निवृत्त झाल्यानंतरचे आयुष्य कसे असेल? याची शाश्वती नाही. तरीही कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस तुम्हा-आम्हाला दुचाकी चालवताना हेल्मेटची सक्ती करतात. कारण तुमचा जीव, तुमच्याच कुटुंबासाठी हवा आहे. मशीद बंदर आणि मोहम्मद अली रोडवर वाहतूक पोलीस असूनही नसल्यासारखे असतात. कारण येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करायची म्हटले, तरी वादाला सामोरे जावे लागते. जे. जे. फ्लायओव्हरबाबत फारसे काही निराळे नाही. ही माणसं तुम्हाला आम्हाला फार काही वेगळे सांगत नाहीत. नियमांचं पालन करा, एवढाच आग्रह ते धरत असतात. तथापि, हेल्मेट न घालणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम मोडण्यात पटाईत असलेल्या ‘पुणे’करांवर जोवर विनोद होत राहतील, तोवर विलास शिंदे यांच्या शहीद होण्याला कोणताही अर्थ प्राप्त होणार नाही.