शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आणखी किती बळी

By admin | Updated: September 2, 2016 02:53 IST

हल्ली सररास कायदा मोडण्याची भाषा केली जाते. कायद्यातूनही पळवाटा काढता येतात, असे म्हणत कायद्याची लक्तरे अनेकदा वेशीवर टांगली जातात. असेच करता करता

हल्ली सररास कायदा मोडण्याची भाषा केली जाते. कायद्यातूनही पळवाटा काढता येतात, असे म्हणत कायद्याची लक्तरे अनेकदा वेशीवर टांगली जातात. असेच करता करता एक दिवस ‘आपल्या’पैकीच एक जण पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. वरळीतल्या इवल्याशा पोलीस क्वाटर्समध्ये वास्तव्यास असलेले विलास शिंदे बुधवारच्या घटनेनंतर शहीद झालेही असतील. पण यापुढे असे किती पोलीस ‘आपण’ शहीद करणार आहोत; हा प्रश्न यानिमित्ताने मन सुन्न करणारा आहे. विलास शिंदे यांची चूक काय? तर त्यांनी केवळ हेल्मेट न घातलेल्या तरुणाला अडवले. आणि याचा राग मनात धरून तरुणाने आपल्या भावाच्या मदतीने शिंदे यांच्या डोक्यावर दांडा मारला. या हल्ल्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शिंदे यांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने शिंदे यांच्या कुटुंबीयांना देऊ केलेल्या २५ लाखांच्या मदतीने ही जखम नक्कीच भरून येणारी नाही. कारण यापूर्वी भिवंडी असो वा ठाणे; येथे वाहतूक पोलिसांना झालेल्या मारहाणीनंतरही राज्य सरकार यासंबंधात काहीच कार्यवाही करू शकलेले नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. विलास शिंदे यांच्यासारखे अनेक वाहतूक पोलीस आपल्याला विविध नाक्यांवर भेटतात. आणि जर हेल्मेट घातले नसेल तर आपण त्यांना चुकवण्यात कसे माहीर झालो आहोत? याचे दाखले अनेक जण देत असतात. मात्र शिंदे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पोलीस कार्यरत आहेत, म्हणून आपण सुखासुखी झोपतो. दिवसाचे चोवीस तास ही माणसं वाहतूक नाक्यावर ताटकळत उभी असतात. ही माणसं ज्या घरात, ज्या इमारतीमध्ये वास्तव्य करतात तेथील बांधकामांना कधीच तडे गेलेले आहेत. कुठलीही पोलीस वसाहत असो. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. धड पगार नाही, धड घर नाही आणि निवृत्त झाल्यानंतरचे आयुष्य कसे असेल? याची शाश्वती नाही. तरीही कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस तुम्हा-आम्हाला दुचाकी चालवताना हेल्मेटची सक्ती करतात. कारण तुमचा जीव, तुमच्याच कुटुंबासाठी हवा आहे. मशीद बंदर आणि मोहम्मद अली रोडवर वाहतूक पोलीस असूनही नसल्यासारखे असतात. कारण येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करायची म्हटले, तरी वादाला सामोरे जावे लागते. जे. जे. फ्लायओव्हरबाबत फारसे काही निराळे नाही. ही माणसं तुम्हाला आम्हाला फार काही वेगळे सांगत नाहीत. नियमांचं पालन करा, एवढाच आग्रह ते धरत असतात. तथापि, हेल्मेट न घालणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम मोडण्यात पटाईत असलेल्या ‘पुणे’करांवर जोवर विनोद होत राहतील, तोवर विलास शिंदे यांच्या शहीद होण्याला कोणताही अर्थ प्राप्त होणार नाही.