शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

ही आपली बुद्धिमत्ता, की आपला मूर्खपणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2023 10:07 IST

कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्याच बुद्धिमत्तेची निर्मिती आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणारे आपण किती मूर्ख आहोत याची काळजी आपल्याला वाटायला नको?

- डॉ. एस. एस. मंठा

चॅट जीपीटीच्या काळात आपल्या बुद्धिमत्तेला खरोखर काही महत्त्व उरले आहे काय? आपण शिकतो कसे हे आता पुन्हा नव्याने ठरवण्याची वेळ आली आहे काय? या उसन्या बुद्धिमत्तेचे गुलाम किंवा स्वयंचलित यंत्रे तर आपण होणार नाही? कृत्रिम बुद्धिमत्ता एक दिवस आपल्यावर राज्य तर करणार नाही...? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत यात शंका नाही. परंतु, या प्रश्नांना समर्पक उत्तरे आहेत काय? एजर डिक्स्ट्रा या डच शास्त्रज्ञाने एकदा म्हटले होते ‘संगणक विचार करील की नाही हा प्रश्न पाणबुडी तरंगेल की नाही या प्रश्नापेक्षा जास्त रोचक ठरेल.’ हे लक्षात घेता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्ता यांच्यात मुळात फरक आहे तो त्यामागचा हेतू, परिवर्तनीयता, सर्जनशीलता, भावनिक क्षमता, माहितीची प्रक्रिया आणि समजून घेण्याची पद्धत यातला. कृत्रिम बुद्धिमत्तेने लक्षणीय आगेकूच केली असली तरीही काही बाबतीत ती मागे पडते. विशेषत: संदर्भानुसार समजून घेणे, सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता यात मानवी बुद्धिमत्ता पुढे आहे.

मानवी असो वा कृत्रिम, बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपली बुद्धिमत्ता बहुआयामी, त्याचबरोबर गुंतागुंतीचीही असते. बोधाची क्षमता, त्याचबरोबर प्रश्न सोडवणे, निर्णय घेणे, अनुभवातून शिकणे, नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे, भाषेचे आकलन या सगळ्या बाबतीत ज्ञानाचे उपयोजन, आकलन प्रक्रिया आणि संपादन या सगळ्यांची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्ध्यांक हा एक आकडा असतो. व्यक्तीची बोधनक्षमता इतरांच्या तुलनेत किती आहे, हे हा आकडा सांगतो आणि त्यावर गुणसूत्रे, परिवेश, शिक्षण, व्यक्तिगत अनुभव या गोष्टींचा प्रभाव पडतो.

आपण मानवी बुद्धिमत्ता मोजतो कशी? तर त्याच्या विविध पद्धती आहेत. उदाहरणार्थ बोधन, शैक्षणिक कामगिरी, मन आणि बुद्धीचे व्यापार, तसेच एकंदर कामगिरीवर आधारित हे मोजमाप होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे असे मापन करता येईल काय? होय, करता येईल; परंतु, त्यासाठी गुण आणि संख्यात्मक मूल्यमापन करावे लागेल. अचूकता, नेमकेपणा, वर्गवारी, प्रतिगमनात्मक काम, आशयधारणेचे प्रमाण, लागणारा वेळ, लक्षात राहणे या बाबींचा विचार त्यात होईल. नैतिक तसेच सामाजिक परिणाम लक्षात घेणे, खासगीपणाचा भंग होईल काय? पूर्वग्रह वाढीस लागतील काय? नोकऱ्या जातील किंवा कसे हेही मापनाचे महत्त्वाचे निकष आहेत. विशिष्ट हेतू आणि कामांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली गेली असली तरी बऱ्याचदा ती मर्यादित लक्ष्य समोर ठेवून वापरली जाते.

आकलनाच्या स्तरावर ती बरीच मानवी बुद्धिमत्तेला समांतर जाते. आपण ज्या सर्जनशीलतेने, लवचिकतेने पुष्कळ वेळा काम करतो तेवढ्या पातळीवर जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता काम करेल काय? यावर ठाम असे होकारार्थी उत्तर येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता काही प्रमाणात सर्जनशीलता दाखवील. माहितीचे विश्लेषण, नमुने ओळखणे अशा प्रकारे सर्जनशीलता वापरून प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत ती उपयोगी पडेल. कृत्रिम बुद्धिमत्तेत अल्गोरिदम्स वापरली जातात, संगीत रचना इतकेच नव्हे, तर काव्यनिर्मितीसाठीही तिचा वापर झाला आहे; परंतु अशी निर्मिती ही केवळ अस्तित्वात असलेली उदाहरणे आणि माहिती याच्या आधारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची निष्पत्ती असते. त्यात स्वतंत्र, मूलगामी असा विचार नसतो. येथे मानवी बुद्धिमत्तेचे महत्त्व लक्षात येईल. 

कृत्रिम बुद्धिमत्ता खूप मोठ्या प्रमाणावर माहितीचे विश्लेषण अगदी झटपट करू शकेल. परंतु, तेवढेच ती करील. जसा मानवी बुद्धिमत्तेचा गैरवापर करता येऊ शकतो, तसाच कृत्रिम बुद्धिमत्तेचाही करता येईल. मात्र, त्यात नुकसान पोहोचवण्याची क्षमता पुष्कळ जास्त असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेने खोटी परीक्षणे करवून घेता येतील. सार्वजनिक संवादात कारस्थाने रचून चुकीची माहिती पसरविली जाईल. स्वयंचलित शस्त्रांमध्ये तसेच ड्रोन्समध्ये ही बुद्धिमत्ता वापरून हाहाकार माजवता येईल. त्यातील विरोधाभासाची गोष्ट ही की कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्याच बुद्धिमत्तेची निर्मिती आहे. आपली बुद्धिमत्ता बाजूला ठेवा; कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणारे आपण किती मूर्ख आहोत याची काळजी आपल्याला वाटायला नको?

टॅग्स :technologyतंत्रज्ञान