शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

हतबल दारूबंदी कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:30 IST

दारूचे व्यसन निश्चितच वाईट आहे. पण केवळ दारूबंदीचा कायदा केल्याने ही समस्या दूर होऊ शकते काय? विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत दारूबंदी लागू केल्यानंतर आज जे चित्र आहे

दारूचे व्यसन निश्चितच वाईट आहे. पण केवळ दारूबंदीचा कायदा केल्याने ही समस्या दूर होऊ शकते काय? विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत दारूबंदी लागू केल्यानंतर आज जे चित्र आहे ते पाहून तरी या समस्येचे समाधान केवळ कायद्यात नाही हे स्पष्ट होते. ‘जे कायदे अंमलात आणता येत नाहीत ते करू नयेत’ असे थोर संशोधक आईन्स्टाईन यांनी म्हटले होते. त्याची प्रचिती या तीन जिल्ह्यांत दिसून येत आहे. दारूबंदीआधी या जिल्ह्यांत जेवढी दारू विकली जायची त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हा व्यवसाय आजच्या घडीला तेथे फोफावला आहे. बंदीच्या कायद्यामुळे शासकीय रेकॉर्डवर हा फुुगलेला आकडा दिसून येत नाही पण आज तेथे जो आतबट्याचा व्यवहार सुरू आहे त्यात कोट्यवधीची काळी उलाढाल सुरू असल्याचे वास्तव आहे. चंद्रपुरात दारूबंदी लागू होऊन दीडएक वर्षे लोटली पण आज हवी तेवढी दारू, हवी तेव्हा आणि हव्या त्या ठिकाणी सहज उपलब्ध होते. खरं वाटणार नाही पण एक फोन केला की, अर्ध्या तासात पाहिजे तेवढी दारूतुम्हाला सहज उपलब्ध होते. फरक एवढाच की, आधी ज्या किमतीत ती मिळायची त्याच्या जवळपास दीडपट किंमत तुम्हाला जास्ती द्यावी लागते. या चोरीच्या धद्यांच्या जोरावर अनेकजण लक्षाधीश झाले आहेत. तसेच हा चोरीचा मामला बिनधोक चालावा म्हणून पोलीस आणि संबंधित विभागाचे काही अधिकारी जी ‘मेहनत’ घेतात त्याचा मेहनताना चुकविण्यातही मोठ्या रकमेची उलाढाल होत असते. शिवाय या व्यवहारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो तो भाग वेगळाच. हा आपल्या सदोष व्यवस्थेचा भाग म्हटले तरी या व्यवहारातले सर्वात भीषण वास्तव पुढे येते ते आजच्या तरूण पिढीच्या उद्ध्वस्त भविष्याचे. दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी गरीब, बेकार तरुणांना हाताशी धरले जाते. दिवसाकाठी बºयापैकी पैसा मिळत असल्याने शाळा, महाविद्यालयांत शिकणारे तरुणही या काळ्या व्यवसायाकडे आकर्षित होताना दिसत आहेत. दारूची चोरटी वाहतूक करणे हा मोठा गुन्हा आहे. या गुन्ह्यात अडकलेले तरुण पुढे गुन्हेगार ठरतील. त्यांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होईल. कायदा करताना या व इतर अनेक बाबींकडे शासनाने दुर्लक्ष केलेले दिसते. कायदा अमलात आणतानाच दारूबंदीविषयक लोकशिक्षणाची गरज असते त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. दारूबंदीची मागणी अनेक थरातून करण्यात येते. त्यात समाजसेवी संस्था असतात. शिक्षक, पालक असतात. पण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समाजात जी जागरूकता निर्माण करावी लागते त्या कामात मात्र ही मंडळी पुढाकार घेताना दिसून येत नाही. त्यामुळेच कायदाही मग हतबल ठरतो.