शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हतबल दारूबंदी कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:30 IST

दारूचे व्यसन निश्चितच वाईट आहे. पण केवळ दारूबंदीचा कायदा केल्याने ही समस्या दूर होऊ शकते काय? विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत दारूबंदी लागू केल्यानंतर आज जे चित्र आहे

दारूचे व्यसन निश्चितच वाईट आहे. पण केवळ दारूबंदीचा कायदा केल्याने ही समस्या दूर होऊ शकते काय? विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत दारूबंदी लागू केल्यानंतर आज जे चित्र आहे ते पाहून तरी या समस्येचे समाधान केवळ कायद्यात नाही हे स्पष्ट होते. ‘जे कायदे अंमलात आणता येत नाहीत ते करू नयेत’ असे थोर संशोधक आईन्स्टाईन यांनी म्हटले होते. त्याची प्रचिती या तीन जिल्ह्यांत दिसून येत आहे. दारूबंदीआधी या जिल्ह्यांत जेवढी दारू विकली जायची त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हा व्यवसाय आजच्या घडीला तेथे फोफावला आहे. बंदीच्या कायद्यामुळे शासकीय रेकॉर्डवर हा फुुगलेला आकडा दिसून येत नाही पण आज तेथे जो आतबट्याचा व्यवहार सुरू आहे त्यात कोट्यवधीची काळी उलाढाल सुरू असल्याचे वास्तव आहे. चंद्रपुरात दारूबंदी लागू होऊन दीडएक वर्षे लोटली पण आज हवी तेवढी दारू, हवी तेव्हा आणि हव्या त्या ठिकाणी सहज उपलब्ध होते. खरं वाटणार नाही पण एक फोन केला की, अर्ध्या तासात पाहिजे तेवढी दारूतुम्हाला सहज उपलब्ध होते. फरक एवढाच की, आधी ज्या किमतीत ती मिळायची त्याच्या जवळपास दीडपट किंमत तुम्हाला जास्ती द्यावी लागते. या चोरीच्या धद्यांच्या जोरावर अनेकजण लक्षाधीश झाले आहेत. तसेच हा चोरीचा मामला बिनधोक चालावा म्हणून पोलीस आणि संबंधित विभागाचे काही अधिकारी जी ‘मेहनत’ घेतात त्याचा मेहनताना चुकविण्यातही मोठ्या रकमेची उलाढाल होत असते. शिवाय या व्यवहारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो तो भाग वेगळाच. हा आपल्या सदोष व्यवस्थेचा भाग म्हटले तरी या व्यवहारातले सर्वात भीषण वास्तव पुढे येते ते आजच्या तरूण पिढीच्या उद्ध्वस्त भविष्याचे. दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी गरीब, बेकार तरुणांना हाताशी धरले जाते. दिवसाकाठी बºयापैकी पैसा मिळत असल्याने शाळा, महाविद्यालयांत शिकणारे तरुणही या काळ्या व्यवसायाकडे आकर्षित होताना दिसत आहेत. दारूची चोरटी वाहतूक करणे हा मोठा गुन्हा आहे. या गुन्ह्यात अडकलेले तरुण पुढे गुन्हेगार ठरतील. त्यांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होईल. कायदा करताना या व इतर अनेक बाबींकडे शासनाने दुर्लक्ष केलेले दिसते. कायदा अमलात आणतानाच दारूबंदीविषयक लोकशिक्षणाची गरज असते त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. दारूबंदीची मागणी अनेक थरातून करण्यात येते. त्यात समाजसेवी संस्था असतात. शिक्षक, पालक असतात. पण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समाजात जी जागरूकता निर्माण करावी लागते त्या कामात मात्र ही मंडळी पुढाकार घेताना दिसून येत नाही. त्यामुळेच कायदाही मग हतबल ठरतो.