शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

वरातीमागून घोडे!

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला यंदा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी लक्षणे आहेत. त्यादृष्टीने केवळ पाणीकपात करून भागले नाही तर प्रसंगी पाण्याचे रेशनिंगदेखील करण्याचा एक विचार चर्चिला जात आहे

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला यंदा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी लक्षणे आहेत. त्यादृष्टीने केवळ पाणीकपात करून भागले नाही तर प्रसंगी पाण्याचे रेशनिंगदेखील करण्याचा एक विचार चर्चिला जात आहे. यापुढे शेतीलाही पाणी न देता आहे ते केवळ पिण्यासाठी राखून ठेवले जाईल, असे राज्य सरकारचे विविध मंत्री जाहीरपणे सांगत आहेत. अशा वेळी केवळ पाण्याचा विचार केला तर नाशिकक्षेत्री भरलेल्या कुंभमेळ्यातील साधू-संतांच्या स्नानासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग घेण्याची गरज काय, हा प्रश्न अत्यंत तार्किक आणि सयुक्तिक ठरतो. तथापि, ‘साधू-संत येती घरा, तोचि माझा दिवाळी दसरा’ हे वचन ग्राह्य धरले आणि गरिबातला गरीब माणूसही दिवाळीसारखा सण भले त्याच्या ऐपतीनुसार साजरा करीत असतो हे वास्तव ध्यानी घेतले, तर मग शाहीस्नानासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग समर्थनीय ठरतो. अर्थात या वाद आणि प्रतिवादात कोणतीही एक बाजू हार मानणे अशक्य असल्याने धरणातील पाण्याच्या विसर्गास प्रतिबंध केला जावा, ही जनहित याचिका उच्च न्यायालयाने स्वीकृत केली हे बरेच झाले. पण सदर याचिकेची सुनावणी न्यायालय आज करणार आहे. यंदाच्या पर्वकाळातील दुसरे शाहीस्नान कालच पार पडले. त्यासाठी पाणी सोडूनही झाले. आता तिसरे स्नान लगेचच येत्या शुक्रवारी होईल आणि त्यानंतर नाशकातील सिंहस्थ आणि विशेषत: शाहीस्नान हा विषय बारा वर्षांसाठी बंद होऊन जाईल. म्हणजे उच्च न्यायालयाला सदर विषयाची जर तातडी जाणवली होती तर दुसऱ्या शाहीस्नानाच्या अगोदरच जो काही व्हायचा तो निवाडा झाला असता तर ते योग्य ठरले असते. पण तरीही बारा वर्षांतून एकदाच येणाऱ्या पाहुण्यांसाठी नाशिक आणि महाराष्ट्र साधे अंघोळीचे पाणीही उपलब्ध करून देऊ शकत नाही असे लांच्छन लागू नये म्हणून राज्य सरकारने अगोदरपासूनच शाहीस्नानासाठी गंगापूर धरणात पाच टीएमसी (तीन नव्हे) पाणी राखून ठेवले होते. योगायोगाने महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे मंत्रीच या कुंभमेळ्याची जबाबदारी पार पाडीत आहेत. (प्रदूषित) गोदावरीतील स्नान हा भले काहींच्या नजरेत कुचेष्टेचा विषय असला, तरी जेव्हा लाखो लोक स्नानासाठी एकत्र येतात, तेव्हा लोकनियुक्त सरकारला त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.