शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

वरातीमागून घोडे!

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला यंदा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी लक्षणे आहेत. त्यादृष्टीने केवळ पाणीकपात करून भागले नाही तर प्रसंगी पाण्याचे रेशनिंगदेखील करण्याचा एक विचार चर्चिला जात आहे

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला यंदा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी लक्षणे आहेत. त्यादृष्टीने केवळ पाणीकपात करून भागले नाही तर प्रसंगी पाण्याचे रेशनिंगदेखील करण्याचा एक विचार चर्चिला जात आहे. यापुढे शेतीलाही पाणी न देता आहे ते केवळ पिण्यासाठी राखून ठेवले जाईल, असे राज्य सरकारचे विविध मंत्री जाहीरपणे सांगत आहेत. अशा वेळी केवळ पाण्याचा विचार केला तर नाशिकक्षेत्री भरलेल्या कुंभमेळ्यातील साधू-संतांच्या स्नानासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग घेण्याची गरज काय, हा प्रश्न अत्यंत तार्किक आणि सयुक्तिक ठरतो. तथापि, ‘साधू-संत येती घरा, तोचि माझा दिवाळी दसरा’ हे वचन ग्राह्य धरले आणि गरिबातला गरीब माणूसही दिवाळीसारखा सण भले त्याच्या ऐपतीनुसार साजरा करीत असतो हे वास्तव ध्यानी घेतले, तर मग शाहीस्नानासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग समर्थनीय ठरतो. अर्थात या वाद आणि प्रतिवादात कोणतीही एक बाजू हार मानणे अशक्य असल्याने धरणातील पाण्याच्या विसर्गास प्रतिबंध केला जावा, ही जनहित याचिका उच्च न्यायालयाने स्वीकृत केली हे बरेच झाले. पण सदर याचिकेची सुनावणी न्यायालय आज करणार आहे. यंदाच्या पर्वकाळातील दुसरे शाहीस्नान कालच पार पडले. त्यासाठी पाणी सोडूनही झाले. आता तिसरे स्नान लगेचच येत्या शुक्रवारी होईल आणि त्यानंतर नाशकातील सिंहस्थ आणि विशेषत: शाहीस्नान हा विषय बारा वर्षांसाठी बंद होऊन जाईल. म्हणजे उच्च न्यायालयाला सदर विषयाची जर तातडी जाणवली होती तर दुसऱ्या शाहीस्नानाच्या अगोदरच जो काही व्हायचा तो निवाडा झाला असता तर ते योग्य ठरले असते. पण तरीही बारा वर्षांतून एकदाच येणाऱ्या पाहुण्यांसाठी नाशिक आणि महाराष्ट्र साधे अंघोळीचे पाणीही उपलब्ध करून देऊ शकत नाही असे लांच्छन लागू नये म्हणून राज्य सरकारने अगोदरपासूनच शाहीस्नानासाठी गंगापूर धरणात पाच टीएमसी (तीन नव्हे) पाणी राखून ठेवले होते. योगायोगाने महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे मंत्रीच या कुंभमेळ्याची जबाबदारी पार पाडीत आहेत. (प्रदूषित) गोदावरीतील स्नान हा भले काहींच्या नजरेत कुचेष्टेचा विषय असला, तरी जेव्हा लाखो लोक स्नानासाठी एकत्र येतात, तेव्हा लोकनियुक्त सरकारला त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.