शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

वरातीमागून घोडे!

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला यंदा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी लक्षणे आहेत. त्यादृष्टीने केवळ पाणीकपात करून भागले नाही तर प्रसंगी पाण्याचे रेशनिंगदेखील करण्याचा एक विचार चर्चिला जात आहे

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला यंदा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी लक्षणे आहेत. त्यादृष्टीने केवळ पाणीकपात करून भागले नाही तर प्रसंगी पाण्याचे रेशनिंगदेखील करण्याचा एक विचार चर्चिला जात आहे. यापुढे शेतीलाही पाणी न देता आहे ते केवळ पिण्यासाठी राखून ठेवले जाईल, असे राज्य सरकारचे विविध मंत्री जाहीरपणे सांगत आहेत. अशा वेळी केवळ पाण्याचा विचार केला तर नाशिकक्षेत्री भरलेल्या कुंभमेळ्यातील साधू-संतांच्या स्नानासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग घेण्याची गरज काय, हा प्रश्न अत्यंत तार्किक आणि सयुक्तिक ठरतो. तथापि, ‘साधू-संत येती घरा, तोचि माझा दिवाळी दसरा’ हे वचन ग्राह्य धरले आणि गरिबातला गरीब माणूसही दिवाळीसारखा सण भले त्याच्या ऐपतीनुसार साजरा करीत असतो हे वास्तव ध्यानी घेतले, तर मग शाहीस्नानासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग समर्थनीय ठरतो. अर्थात या वाद आणि प्रतिवादात कोणतीही एक बाजू हार मानणे अशक्य असल्याने धरणातील पाण्याच्या विसर्गास प्रतिबंध केला जावा, ही जनहित याचिका उच्च न्यायालयाने स्वीकृत केली हे बरेच झाले. पण सदर याचिकेची सुनावणी न्यायालय आज करणार आहे. यंदाच्या पर्वकाळातील दुसरे शाहीस्नान कालच पार पडले. त्यासाठी पाणी सोडूनही झाले. आता तिसरे स्नान लगेचच येत्या शुक्रवारी होईल आणि त्यानंतर नाशकातील सिंहस्थ आणि विशेषत: शाहीस्नान हा विषय बारा वर्षांसाठी बंद होऊन जाईल. म्हणजे उच्च न्यायालयाला सदर विषयाची जर तातडी जाणवली होती तर दुसऱ्या शाहीस्नानाच्या अगोदरच जो काही व्हायचा तो निवाडा झाला असता तर ते योग्य ठरले असते. पण तरीही बारा वर्षांतून एकदाच येणाऱ्या पाहुण्यांसाठी नाशिक आणि महाराष्ट्र साधे अंघोळीचे पाणीही उपलब्ध करून देऊ शकत नाही असे लांच्छन लागू नये म्हणून राज्य सरकारने अगोदरपासूनच शाहीस्नानासाठी गंगापूर धरणात पाच टीएमसी (तीन नव्हे) पाणी राखून ठेवले होते. योगायोगाने महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे मंत्रीच या कुंभमेळ्याची जबाबदारी पार पाडीत आहेत. (प्रदूषित) गोदावरीतील स्नान हा भले काहींच्या नजरेत कुचेष्टेचा विषय असला, तरी जेव्हा लाखो लोक स्नानासाठी एकत्र येतात, तेव्हा लोकनियुक्त सरकारला त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.