शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

घर घेता का घर ?

By admin | Updated: May 9, 2016 02:51 IST

नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकरांच्या ‘कोणी घर देता का घर’ या आर्त सवालात किंचितसा बदल करून ‘घर घेता का घर’ असे म्हणण्याची वेळ देशातील बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे

नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकरांच्या ‘कोणी घर देता का घर’ या आर्त सवालात किंचितसा बदल करून ‘घर घेता का घर’ असे म्हणण्याची वेळ देशातील बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे. कारण, घरांच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के तर व्यावसायिक जागांच्या विक्रीत ३५ ते ४० टक्के घसरण झाली आहे. उद्योग व वाणिज्य क्षेत्रांतील नामांकित संस्था ‘असोचेम’ने जाहीर केलेल्या अहवालानुसार राजधानी दिल्लीत अडीच लाख म्हणजे बांधकाम झालेल्या घरांपैकी सुमारे ३५ टक्के घरे विक्रीअभावी पडून आहेत, तर त्यापाठोपाठ मुंबई महानगराचा नंबर लागतो. तेथे सुमारे एक लाख घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभी आहेत. दिल्ली, मुंबईचेच काय, राज्यातील पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्येही हीच स्थिती पाहावयास मिळत असून, केवळ भू-विकासक अथवा बांधकाम व्यावसायिकांच्याच दृष्टीने नव्हे तर, या व्यवसायाशी निगडीत सर्वच घटकांसाठी ती चिंतेचीच म्हणता येणारी आहे. नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने गावाकडून शहराकडे स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढल्याने मोठ्या शहरांतील बांधकाम व्यवसाय भरभराटीस आला आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नईप्रमाणेच हैदराबाद, अहमदाबाद, पुण्यासारखी शहरे अस्ताव्यस्त वाढत आहेत. या शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणे महागडे ठरत असल्याने साधारण नोकरवर्गही कर्ज काढून स्वत:चे घर विकत घेऊ पाहतो. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी बँकांनीही मोठा हातभार लावल्याने गृहनिर्माण व्यवसायाने जोर धरला होता. परंतु, गेल्या काही दिवसांत किमती कमी करून व बँकांचे व्याजदर घटूनही गृह खरेदी थंडावल्याने या क्षेत्रातील तेजीचा फुगा फुटला आहे. ज्यांनी मोठी गुंतवणूक करून या क्षेत्रात पाऊल ठेवले त्यांना आज गुंतवणुकीची रक्कम काढणेही जिकिरीचे झाले आहे. या घर खरेदीतील घसरणीचा परिणाम गृहबांधणीशी संबंधित उत्पादनांसह कामगार क्षेत्रावरही अपरिहार्यपणे घडून येत आहे. गृहबांधणी क्षेत्रात सुमारे एक कोटीपेक्षा अधिक कामगार असून, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने काही जणांना गावाकडे परतणे भाग पडत आहे. म्हणायला ही परिस्थिती ‘चलो गाव की ओर’ या संकल्पनेला पूरक ठरणारीच आहे. परंतु शहरात हाताला काम नाही म्हणून गावाकडे परतणाऱ्या लोंढ्याला तेथे तरी काय काम मिळेल हा प्रश्नच आहे. केवळ व्यावसायिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिक पातळीवरही परिणाम करणारी ही बाब आहे.