शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘त्यांचं’ भावविश्व आणि आपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:24 IST

मन्मथच्या आत्महत्येनंतर प्रत्येक पालक आतून हादरून गेला. मुलांना सांभाळायचं कसं आणि पालकत्वाची भूमिका, याविषयी सोशल मीडियातून बरेचसं उथळपणे व काही प्रमाणात गांभीर्याने लिहिलंदेखील गेलं.

मन्मथच्या आत्महत्येनंतर प्रत्येक पालक आतून हादरून गेला. मुलांना सांभाळायचं कसं आणि पालकत्वाची भूमिका, याविषयी सोशल मीडियातून बरेचसं उथळपणे व काही प्रमाणात गांभीर्याने लिहिलंदेखील गेलं. मन्मथ या तरुण मुलाच्या आत्महत्येने आधुनिकीकरणाच्या जगात सतत धावणारा माणूस आतून हादरलाय आणि भांबवलाय, हे बाकी खरं. या धक्क्यातून सावरतोय न सावरतोय तोच मनप्रीत या कोवळ्या वयातील मुलाने आत्महत्या केल्याने अवघा देश हादरून गेलेला आहे. ब्ल्यू व्हेल नावाच्या एका गेमने हा बळी घेतला, हे तर आणखीनच धक्कादायक आहे. तंत्रज्ञानाच्या आणि आभासी जगाच्या किती आहारी आपण जाऊ शकतो, हे दाखवून देणारी ही धोक्याची पहिलीवहिली भयावह झलक आहे. रशियात जन्माला आलेल्या आणि जगभरात धुमाकूळ घातलेल्या या खेळाने आजवर १३० बळी घेतल्याची धक्कादायक माहिती आता उघड होत आहे. त्याचा निर्माता तुरुंगात असला तरीही असे जीवघेणे आणि विकृत मनोवृत्तीचे खेळ आजही खुलेआम सुरू राहतातच कसे, हा खरा कळीचा मुद्दा आहे. यापूर्वी पोकेमॉनसारखा असाच एक टुकार गेम आलेला होता आणि लोक वेड्यासारखे त्याच्या मागे लागलेले होते. ब्ल्यू व्हेल ही गेमची आवृत्ती त्यापेक्षा अधिक धोकादायक मानायला हवी. कारण यात ५० दिवसांच्या त्या काळात तुम्हाला पूर्णपणे नैराश्यात झोकून देण्याची क्षमता या खेळात आहे. त्याची लास्ट स्टेज म्हणजे आत्महत्येचे चॅलेंज आहे. या घटनेकडे केवळ वरवर पाहून चालणार नाही. त्याचा अन्वयार्थ नीट समजून घेत आपल्याला यापुढील काळात पावले टाकावी लागणार आहेत. नात्यांमध्ये कमी होत चाललेला संवाद आणि आभासी जगाचे लहान वयापासून वाढते आकर्षण या बाबी लक्षात घेतल्या तर आपल्याला ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे लक्षात घेत सजग राहावे लागणार आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत असताना मुलांच्या हाती मोबाईल येणारच नाही असे होणार नाही; पण ते काय पाहतात आणि त्याचा त्यांच्या मनोवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो हे सजगतेने पाहणे, हे मात्र पालक म्हणून कर्तव्य आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळे भावविश्व निर्माण होत असते. नव्या पिढीच्या त्या भावविश्वाशी आपण कितपत एकरूप होऊ शकतो हा खरा प्रश्न आहे. अन्यथा मनप्रीतसारख्या आणखी एका कोवळ्या जीवाचा विकृतीने बळी घेतल्यानंतर हळहळण्यापलीकडे आपण काहीही करू शकणार नाही.