शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा हिंदुत्व!

By admin | Updated: February 1, 2017 05:38 IST

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तारूढ झाले, ते प्रामुख्याने विकासाच्या स्वप्नांच्या बळावर ! त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यानंतरही

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तारूढ झाले, ते प्रामुख्याने विकासाच्या स्वप्नांच्या बळावर ! त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यानंतरही मोदींचा भर राहिला तो विकासावरच! स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारांनी विकासासाठी काहीही केले नाही आणि आता मी विकास करून दाखवतो, ही मोदींनी केलेली मांडणी मतदारांना भावली. त्यामुळेच परंपरागतरीत्या भाजपाचे समर्थक नसलेल्या मतदारांनीही भाजपाच्या पारड्यात भरभरून दान टाकले आणि त्याचीच परिणती २०१४मधील लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या काही विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपाला भरघोस यश लाभण्यात झाली. आता लवकरच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचे चित्र कसे असेल याची चुणूक या विधानसभा निवडणुकींच्या निकालांमधून दिसेल, असा राजकीय पंडितांचा कयास आहे. त्यामुळे या निवडणुकींना, विशेषत: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला, प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान मोदींनी लखनौमधील पहिल्या प्रचारसभेत विकासावरच भर दिला होता; मात्र गेल्या शनिवारी भाजपाने जारी केलेला जाहीरनामा आणि रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केलेले विचार लक्षात घेतले, तर भाजपा पुन्हा एकदा विकासाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या विचारधारेकडे वळत आहे की काय, अशी शंका येते. राममंदिर, कत्तलखान्यांवर बंदी, तलाक, पश्चिम उत्तर प्रदेशमधून झालेले हिंदूंचे कथित स्थलांतर, हे मुद्दे दुसरे काय दर्शवतात? हे मुद्दे उपस्थित करण्यामागे धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्याशिवाय दुसरा कोणता उद्देश असू शकतो? अर्थात हे मुद्दे हिंदुत्ववाचक म्हणून नव्हेत, तर सामाजिक मुद्दे म्हणून सादर करण्याची मखलाशी शाह यांनी केली आहे. हिंदुत्ववादी भावनांना साद घालण्यासाठी गोवंश कत्तल हा संघ परिवाराचा पूर्वापार चालत आलेला आवडता मुद्दा आहे; पण यांत्रिक कत्तलखान्यांमुळे शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन हिरावल्या जाते, अशी मांडणी करून अमित शाह यांनी यावेळी त्याला सामाजिक मुलामा देण्याचा प्रयत्न केला आहे. गत काही काळापासून भाजपाच्या कार्यक्रम पत्रिकेतून राममंदिराचा मुद्दा बाहेर पडला होता. यावेळी त्याला पुन्हा जाहीरनाम्यात स्थान मिळाले आहे. एकीकडे निवडणुकीतील पक्षाचा चेहरा असलेले नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात राममंदिराचा उच्चारही करीत नाहीत आणि दुसरीकडे पक्षाच्या जाहीरनाम्यातून राममंदिर पुन्हा डोकावते, ही वस्तुस्थिती केवळ विकासाच्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपात उरला नसल्याचे द्योतक मानायचे का? विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्यामुळे विकासाला हिंदुत्वाची जोड देण्याची गरज भाजपाला भासली, असा निष्कर्ष जर कुणी काढत असेल, तर तो चुकीचा म्हणता येणार नाही.