शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

महामार्गाचे नष्टचक्र

By admin | Updated: September 25, 2015 22:25 IST

एखाद्या रस्त्यानेच एखाद्या गावातील प्रत्येक महिलेला विधवा बनविल्याचे आणि आता त्या गावात एकही पुरुष शिल्लक नसल्याचे कुणी सांगितले

एखाद्या रस्त्यानेच एखाद्या गावातील प्रत्येक महिलेला विधवा बनविल्याचे आणि आता त्या गावात एकही पुरुष शिल्लक नसल्याचे कुणी सांगितले, तर विश्वास बसेल? दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे आणि तीदेखील आपल्याच देशातील! आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ जातो. या महामार्गावर पेद्दाकुंता नावाचे गाव आहे. दुर्दैवाने आज तोच महामार्ग पेद्दाकुंतासाठी दु:स्वप्न ठरला आहे! अवघ्या ४० घरांची वस्ती असलेल्या पेद्दाकुंतामधील प्रत्येक वयस्कर पुरुषाचा या महामार्गावरील अपघातांनी बळी घेतला आहे. त्यामुळे आता या गावात आहेत त्या केवळ १८ ते ३६ वर्षे वयाच्या विधवा आणि त्यांची चिल्लीपिल्ली! गावातील सर्वात वयस्कर पुरुष आहे अवघा सहा वर्षे वयाचा एक मुलगा! त्याहूनही भयंकर बाब म्हणजे गावात एकही पुरुष शिल्लक नसल्याचे बघून, शेजारच्या गावांमधील लिंगपिसाटांची गिधाडी दृष्टी पेद्दाकुंताकडे वळली आहे. हे भयावह चित्र म्हणजे तथाकथित विकासाच्या वृक्षाला लागलेले विषारी फळ असल्याच्या प्रतिक्रिया उमटू शकतात; पण देशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्यासाठी विकास प्रकल्पांना पर्यायच नाही. त्यामुळे पेद्दाकुंतासारख्या दु:स्वप्नांची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर विकास प्रकल्प राबविताना सर्व शक्यता विचारात घेऊन काटेकोर नियोजन करावे लागेल आणि अंमलबजावणी करताना नियोजनाला फाटा देण्याची आपली उपजत प्रवृत्तीही बदलावी लागेल. गत काही वर्षांपासून देशात चार, सहा किंवा आठ पदरी महामार्ग बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील मापदंड लावल्यास, या प्रकल्पांच्या नियोजनात अनेक त्रुटी असल्याचे तज्ज्ञांनी वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. पेद्दाकुंता गावातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महामार्ग ओलांडण्याशिवाय पर्यायच नाही. देशाला वेगाने प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर वाहतुकीचा वेग वाढविण्याशिवाय पर्याय नाही; मात्र ते करीत असताना वर्षानुवर्षे संथ आयुष्य जगत आलेल्यांना दुर्लक्षून वा वगळून चालणार नाही, तर त्यांनाही वेगवान जीवनाचे सहप्रवासी बनवावेच लागणार आहे. त्याचबरोबर शहरी सुखसुविधांचा उपभोग घेण्यासाठी, त्यासोबत अपरिहार्यपणे येणाऱ्या वेगवान जीवनाचे नियम समजून घेण्याची आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी, ग्रामीण भागातील जनतेलाही ठेवावी लागणार आहे. हे जर आपल्याला उमजले नाही, तर भविष्याच्या उदरात असे अनेक पेद्दाकुंता आपली प्रतीक्षा करीत असतील!