शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सबसे उँची प्रेमसगाई

By admin | Updated: June 9, 2016 05:00 IST

ज्ञान आणि प्रेम अधोरेखित करण्यासाठी भक्तिमय वर्षाव करणारा उत्सव म्हणजेच ज्ञानोत्सव

ज्ञानातून बोध अंकुरायला हवा, बोधातून आनंद उमलायला हवा, आनंदातून उत्सव जन्मायला हवा आणि उत्सवातून परमोच्च आनंद प्रस्फोटित व्हायला हवा, या उन्नत हेतूने पिंपरी-चिंचवडमधील चिरंजीव पीठ कार्यरत आहे. ज्ञानयुक्तआणि देवभोळे असे दोन प्रकारचे संप्रदाय आपल्याकडे दिसून येतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या ‘शब्दें वाटूं धन जनलोंका..’ या न्यायाने अक्षर संचित, प्रकाशित साहित्याचे लोकार्पण करणे आणि विचारमंथनातून डोळस अध्यात्म लोकांसमोर मांडण्यासाठीचा प्रयत्न गेली तीन वर्षे सातत्याने होत आहे. ज्ञान आणि प्रेम अधोरेखित करण्यासाठी भक्तिमय वर्षाव करणारा उत्सव म्हणजेच ज्ञानोत्सव. हा उत्सव पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरू लागला आहे. गाणं हे आनंदासाठी आणि आनंदाने शिकण्यासाठी असते. आनंदरहित अवस्थेत संगीतातील रागही तना-मनाला स्पर्श करीत नाहीत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कलाधर्म आणि सत्कर्माप्रति रुची वाढविणे, कला आणि कलाकार मोठे करणे अर्थात माणुसपण मोठे करण्याच्या भावभूमिकेतून काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच चिरंजीव पीठाचे प्रमुख आणि लेखक, कवी, संगीतकार, विचारवंत, संशोधक, गायक पंडित राजू सवार होत. लौकिकार्थाने सगाई म्हणजेच विवाह असा अर्थ रूढ आहे, परंतु ज्ञानाकडून-प्रेमाकडे नेणारा ‘प्रेमभावाचा नवा सेतू’ पंडितजींनी निर्माण केला आहे; अर्थातच प्रेमसगाई असे त्याचे नाव आहे. ज्ञान-प्रेम-भक्तिपूर्ण आणि अपूर्व अशी ‘सबसे उँची प्रेमसगाई’ होय. चिरंजीव पीठाचे कार्य ज्ञानधर्म वाढविणारे आहे. या ज्ञानोत्सवात आजवर जिनशासनसौरभ डॉ. मंजूश्रीजीमहाराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कविवर्य प्रवीण दवणे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. र. ना. शुक्ल, शिक्षणतज्ज्ञ वसंत नुलकर यांनी आपल्या अनुभवविश्वाचे दर्शन घडविले आहे. सामाजिक जाणिवा समृद्ध करून सर्जनशील समाजाच्या निर्मितीसाठी एखादा दीपस्तंभ असणारी ही माणसं होत. या वर्षीच्या उत्सवात शिवशाहिरांसह ज्येष्ठ संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे अमूल्य विचार रसिकांंना ऐकण्यास मिळाले. त्यातून समाजमनाच्या संवेदनांचा, सुख-दु:खाचा अचूक वेध घेण्यात आला. त्यांनी दिलेले ज्ञानयुक्त प्रेम हे जीवन समृद्ध करणारे आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गिरीश कुलकर्णी, अरुणा ढेरे यांनी कर्मरूपी विठ्ठलाचे सगुण साकार रूपाचे दर्शन घडविले. ज्याचा त्याचा विठ्ठल वेगळाच असतो, असा भाव वक्त्यांनी दृढ केला, तर डॉ. बावस्करांनी माणसांचे जगणे, त्यांची दु:खे, संवेदनांचा कल्लोळ कसा असतो, याचे दर्शन घडवित श्रोत्यांना अंतर्मुख करून सोडले. ‘माणसाने आयुष्य असे जगावे की मृत्यूलाही दु:ख होऊ नये,’ अशी जीवननिष्ठा त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाली. तर ‘चांगल्या-वाईटाचा जमा-खर्च मांडत राहा, सुखा-समाधानाने जगा,’ असा संदेशही तेंडुलकर यांनी दिला. ज्ञानोत्सवाचा कळसाध्याय पंडितजींच्या ‘सबसे उँची प्रेमसगाई’ने गाठला. त्यातून स्वर्गीय श्रवणसुखाची अनुभूती मिळाली. संतांच्या विविध भजनांना शास्त्रीय संगीताचा बाज, त्या रचनांमधील भक्ती आणि प्रेमभावाचे रहस्य उलगडत ज्ञानाकडून- प्रेमाकडे नेणारी ही मैफल अविस्मरणीय ठरली. कलावंत आणि रसिक एकरूप झाला, की परमोच्च आत्मानंदाची अनुभूती मिळते, याची प्रचिती आली. ज्ञानोत्सवाच्या रूपाने आत्मसुखाचा वर्षाव झाला. हा ज्ञानयज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ या समर्पित भावनेतून चिरंजीव पीठाचे किशोर धूत, राजीव जोगळेकर, रमेश जोशी, सर्वोत्तम जोशी हे कार्यरत आहेत. ज्ञानोत्सवाची ही अनोखी, अनुपम आनंदयात्रा अखंडपणे सुरू राहावी, असा भाव रसिकजनांच्या मनातून व्यक्त होत असतो. अज्ञानाकडून- ज्ञानाकडे, ज्ञानाकडून-प्रेमाकडे नेणाऱ्या या उत्सवातील ‘प्रेमभावाची अवीट गोडी’ चिरस्मरणात राहणारी आहे. >ज्ञान आणि प्रेम अधोरेखित करण्यासाठी भक्तिमय वर्षाव करणारा उत्सव म्हणजेच ज्ञानोत्सव. हा उत्सव पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरू लागला आहे. - विजय बाविस्कर