शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
4
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
6
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
7
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
8
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
9
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
10
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
11
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
12
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
13
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
14
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
15
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
16
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
17
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
18
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
19
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
20
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल

सबसे उँची प्रेमसगाई

By admin | Updated: June 9, 2016 05:00 IST

ज्ञान आणि प्रेम अधोरेखित करण्यासाठी भक्तिमय वर्षाव करणारा उत्सव म्हणजेच ज्ञानोत्सव

ज्ञानातून बोध अंकुरायला हवा, बोधातून आनंद उमलायला हवा, आनंदातून उत्सव जन्मायला हवा आणि उत्सवातून परमोच्च आनंद प्रस्फोटित व्हायला हवा, या उन्नत हेतूने पिंपरी-चिंचवडमधील चिरंजीव पीठ कार्यरत आहे. ज्ञानयुक्तआणि देवभोळे असे दोन प्रकारचे संप्रदाय आपल्याकडे दिसून येतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या ‘शब्दें वाटूं धन जनलोंका..’ या न्यायाने अक्षर संचित, प्रकाशित साहित्याचे लोकार्पण करणे आणि विचारमंथनातून डोळस अध्यात्म लोकांसमोर मांडण्यासाठीचा प्रयत्न गेली तीन वर्षे सातत्याने होत आहे. ज्ञान आणि प्रेम अधोरेखित करण्यासाठी भक्तिमय वर्षाव करणारा उत्सव म्हणजेच ज्ञानोत्सव. हा उत्सव पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरू लागला आहे. गाणं हे आनंदासाठी आणि आनंदाने शिकण्यासाठी असते. आनंदरहित अवस्थेत संगीतातील रागही तना-मनाला स्पर्श करीत नाहीत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कलाधर्म आणि सत्कर्माप्रति रुची वाढविणे, कला आणि कलाकार मोठे करणे अर्थात माणुसपण मोठे करण्याच्या भावभूमिकेतून काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच चिरंजीव पीठाचे प्रमुख आणि लेखक, कवी, संगीतकार, विचारवंत, संशोधक, गायक पंडित राजू सवार होत. लौकिकार्थाने सगाई म्हणजेच विवाह असा अर्थ रूढ आहे, परंतु ज्ञानाकडून-प्रेमाकडे नेणारा ‘प्रेमभावाचा नवा सेतू’ पंडितजींनी निर्माण केला आहे; अर्थातच प्रेमसगाई असे त्याचे नाव आहे. ज्ञान-प्रेम-भक्तिपूर्ण आणि अपूर्व अशी ‘सबसे उँची प्रेमसगाई’ होय. चिरंजीव पीठाचे कार्य ज्ञानधर्म वाढविणारे आहे. या ज्ञानोत्सवात आजवर जिनशासनसौरभ डॉ. मंजूश्रीजीमहाराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कविवर्य प्रवीण दवणे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. र. ना. शुक्ल, शिक्षणतज्ज्ञ वसंत नुलकर यांनी आपल्या अनुभवविश्वाचे दर्शन घडविले आहे. सामाजिक जाणिवा समृद्ध करून सर्जनशील समाजाच्या निर्मितीसाठी एखादा दीपस्तंभ असणारी ही माणसं होत. या वर्षीच्या उत्सवात शिवशाहिरांसह ज्येष्ठ संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे अमूल्य विचार रसिकांंना ऐकण्यास मिळाले. त्यातून समाजमनाच्या संवेदनांचा, सुख-दु:खाचा अचूक वेध घेण्यात आला. त्यांनी दिलेले ज्ञानयुक्त प्रेम हे जीवन समृद्ध करणारे आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गिरीश कुलकर्णी, अरुणा ढेरे यांनी कर्मरूपी विठ्ठलाचे सगुण साकार रूपाचे दर्शन घडविले. ज्याचा त्याचा विठ्ठल वेगळाच असतो, असा भाव वक्त्यांनी दृढ केला, तर डॉ. बावस्करांनी माणसांचे जगणे, त्यांची दु:खे, संवेदनांचा कल्लोळ कसा असतो, याचे दर्शन घडवित श्रोत्यांना अंतर्मुख करून सोडले. ‘माणसाने आयुष्य असे जगावे की मृत्यूलाही दु:ख होऊ नये,’ अशी जीवननिष्ठा त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाली. तर ‘चांगल्या-वाईटाचा जमा-खर्च मांडत राहा, सुखा-समाधानाने जगा,’ असा संदेशही तेंडुलकर यांनी दिला. ज्ञानोत्सवाचा कळसाध्याय पंडितजींच्या ‘सबसे उँची प्रेमसगाई’ने गाठला. त्यातून स्वर्गीय श्रवणसुखाची अनुभूती मिळाली. संतांच्या विविध भजनांना शास्त्रीय संगीताचा बाज, त्या रचनांमधील भक्ती आणि प्रेमभावाचे रहस्य उलगडत ज्ञानाकडून- प्रेमाकडे नेणारी ही मैफल अविस्मरणीय ठरली. कलावंत आणि रसिक एकरूप झाला, की परमोच्च आत्मानंदाची अनुभूती मिळते, याची प्रचिती आली. ज्ञानोत्सवाच्या रूपाने आत्मसुखाचा वर्षाव झाला. हा ज्ञानयज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ या समर्पित भावनेतून चिरंजीव पीठाचे किशोर धूत, राजीव जोगळेकर, रमेश जोशी, सर्वोत्तम जोशी हे कार्यरत आहेत. ज्ञानोत्सवाची ही अनोखी, अनुपम आनंदयात्रा अखंडपणे सुरू राहावी, असा भाव रसिकजनांच्या मनातून व्यक्त होत असतो. अज्ञानाकडून- ज्ञानाकडे, ज्ञानाकडून-प्रेमाकडे नेणाऱ्या या उत्सवातील ‘प्रेमभावाची अवीट गोडी’ चिरस्मरणात राहणारी आहे. >ज्ञान आणि प्रेम अधोरेखित करण्यासाठी भक्तिमय वर्षाव करणारा उत्सव म्हणजेच ज्ञानोत्सव. हा उत्सव पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरू लागला आहे. - विजय बाविस्कर