शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टानेही कायदा पाळणे अपेक्षित

By admin | Updated: May 17, 2017 04:27 IST

न्यायालयाने आता दिलेले आदेश स्वागतार्ह असले तरी हीच गोष्ट न्यायालयाने आधीच निदान आपल्यापुरती तरी स्वत:हून केली असती तर चांगले झाले असते.

- अजित गोगटेन्यायालयाने आता दिलेले आदेश स्वागतार्ह असले तरी हीच गोष्ट न्यायालयाने आधीच निदान आपल्यापुरती तरी स्वत:हून केली असती तर चांगले झाले असते.तुम्ही घर बांधायला घेतलेत तर त्याचा दरवाजा कोणालाही सहज प्रवेश करता येईल असाच तुम्ही ठेवाल हे उघड आहे. हे गृहस्थाश्रमाचे एक सर्वमान्य तत्त्व आहे. न्यायालयांची दारेही अशीच सर्वांसाठी खुली असावीत, असे अभिप्रेत आहे. यातील दाराचे खुलेपण हे केवळ लौकिक अर्थाने नाही. न्यायालयात न्याय मागण्यास येणाऱ्या पक्षकारांमध्ये अपंगही असतात व त्यांनाही सहजपणे ये-जा करता येईल अशी न्यायालयांच्या इमारतींची व न्यायदालनांची रचना हवी, हे यात अभिप्रेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला या वास्तवाची अलीकडेच जाणीव झाली व आता राज्यातील सर्व न्यायालयांच्या इमारती अपंगस्नेही करण्याचा आदेश दिला गेला आहे. पण जी गोष्ट स्वत:हून व्हायला हवी होती व तशी ती होऊही शकली असती त्यासाठीही लोकांना याचिका करायला लागाव्यात ही शोकांतिका आहे.न्या. गौतम पटेल यांच्यापुढे मध्यंतरी एका दिवाणी दाव्याची सुनावणी होती त्यातील प्रतिवादी ९६ वर्षांची स्त्री होती. ती चाकाच्या खुर्चीशिवाय हिंडू-फिरू शकत नव्हती. तिला न्यायालयात साक्षीसाठी बोलवायचे तर न्यायालयाची अंतर्गत रचना ती चाकाच्या खुर्चीने येऊ शकणार नाही अशी. म्हणजे तिला दोन-चारजणांनी लळालोंबा करून उचलून आणण्याखेरीज पर्याय नाही. चारचौघांच्या समक्ष तिच्या असहायतेचे असे ओंगळवाणे प्रदर्शन होणे मानवी प्रतिष्ठेला कमीपणा आणणारे झाले असते. मनाने संवेदनशील असलेल्या आणि चाकोरीबाहेर जाऊन विचार करणाऱ्या न्या. पटेल यांना याची जाणीव झाली. त्यांनी त्या प्रतिवादी वृद्धेची साक्ष नोंदविण्यासाठी जेथे तिला चाकाच्या खुर्चीसह येता येईल, अशी न्यायदालनात एक दिवसापुरते कोर्ट भरविले. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालयातील सर्व न्यायदालने अपंगस्नेही व्हावीत, असेही त्यांनी प्रशासनास निर्देश दिले. यानंतर महिनाभराने न्या. अभय ओक आणि न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने राज्यातील न्यायालये, प्राधिकरणे, ग्राहक न्यायालये, सहकारी न्यायालये इत्यादींमधील सोई सुविधांचा अभाव व न्यायाधीशांची कमतरता यासंबंधीच्या याचिकांवर निकाल दिला. त्यात त्यांनी राज्यातील सर्व न्यायालयांच्या इमारती अपंगस्नेही कराव्यात, असा आदेश दिला. हे करताना त्यांनी अपंग कल्याण कायद्यावर बोट ठेवले. खरे तर हे करण्यासाठी कोणीतरी जनहित याचिका करण्याची गरज नव्हती. पूर्वीचा अपंग कल्याण कायदा १९९५ मध्ये केला गेला होता. गेल्या वर्षी तोच कायदा पूर्णपणे नव्या स्वरूपात केला गेला. त्यात केवळ न्यायालयेच नव्हेत तर सर्वच सरकारी आणि सार्वजनिक इमारती अपंगस्नेही असाव्यात, अशी तरतूद सुरुवातीपासून आहे. या कायद्याशी संबंधित शेकडो याचिकांवर उच्च न्यायालयात गेल्या २० वर्षांत सुनावणी झालेली आहे. त्यामुळे या कायद्यातील ही तरतूद आणि आपली इमारत त्यानुसार नाही याची न्यायालयास जाणीव आहे. उच्च न्यायालय प्रशासन राज्यातील कनिष्ठ न्यायालयांचे दरवर्षी ‘इन्स्पेक्शन’ करीत असते. यातही डोळे उघडे ठेवले असते तर न्यायालयांच्या इमारती अपंगस्नेही नाहीत व त्या तशा करायला हव्यात याची जाणीव न्यायालय प्रशासनास होऊ शकली असती. पक्षकारांना न्याय मागणे सुलभ व्हावा यासाठी स्थापन झालेले राज्य विधी सेवा प्राधिकरण आहे. मुख्य न्यायाधीश आश्रयदाते तर त्यांच्यानंतरच सेवाज्येष्ठ न्यायमूर्ती या प्राधिकरणाचे पदसिद्ध कार्याध्यक्ष असतात. न्यायालयांच्या इमारती अपंगस्नेही व्हाव्यात यासाठी हे प्राधिकरणही आग्रह धरू शकले असते. पण या तिन्ही पातळींवर उच्च न्यायालय प्रशासनाकडून झालेले दुर्लक्ष एकूणच या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत सरकारी पातळीवर दिसून आलेल्या अनास्थेला साजेसेच आहे. न्यायालयाने आता दिलेले आदेश स्वागतार्ह असले तरी हीच गोष्ट न्यायालयाने आधीच निदान आपल्यापुरती तरी स्वत:हून केली असती तर अधिक चांगले झाले असते. तसे झाले असते तर कायद्याचे पालन आपणही करायचे असते हे उच्च न्यायालयास ठाऊक आहे हे निदान जगजाहीर तरी झाले असते !