शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आभामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:07 IST

प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.

प्रा. डॉ. संदीप ताटेवार|पदार्थविज्ञानाच्या शास्त्रानुसार प्रत्येक पदार्थ आपल्यापासून शक्ती परावर्तित करीत असतो. वैश्विक शक्तीसुद्धा आपल्यामध्ये अंतर्भूत असते. त्यामुळे प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.प्रकाशाचे वलय प्रत्येक माणसाभोवती निर्माण होत असते, यालाच आभामंडळ, प्रभावमंडळ किंवा औरा असे म्हटल्या जाते. आभामंडळचा उल्लेख शास्त्र पुराणातही केल्या गेला आहे. आपले आभामंडळ आपल्यासोबत २४ तास असते. आपले आभामंडळ हे विविध रंगांनी व त्याच्या प्रखरतेने, आकाराने बनले असते व त्याची जाडीसुद्धा कमी जास्त असते. संत महात्मा यांच्या आभामंडळची जाडी काही किलोमीटर व साधारण माणसाच्या आभामंडळची जाडी काही इंचापर्यंत असू शकते. प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व भावनिक अवस्थेनुसार आभामंडळ बदलत असते. आपल्या या चार अवस्था जेवढ्या पवित्र होत जातात तेवढ्या प्रमाणात आपले आभामंडळ चांगले होत जात असते. आभामंडळ म्हणजे आपल्याभोवती निर्माण झालेले एक सुरक्षा कवच होय कारण जेवढे आपले आभामंडळ चांगले व जास्त जाडीचे तेवढा आपल्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी प्रमाणात पडत असतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत जात असते. आपल्या आभामंडळाचा फोटो कीर्लीयान फोटोग्राफीद्वारे घेता येऊ शकतो.आजकाल तर साध्या फोटोवरून सुद्धा आधुनिक स्वॉफ्टवेअरद्वारे आभामंडळचा फोटो घेता येतो. जेव्हा आपण आजारी, दु:खी, निराश, हिंसक, क्रोधी, मत्सरी, नकारात्मक असतो त्यावेळेस आपले आभामंडळ चांगले नसते. मात्र जेव्हा आपण आनंदी, उत्साही, सकारात्मक, प्रेमळ, आध्यात्मिक असतो तेव्हा त्यामध्ये शक्तीचा प्रवाह सुरळीत आढळतो व आभामंडळ चांगले होते.आभामंडळाच्या फोटोच्या अभ्यासावरून आपली शक्ती शरीराच्या कोणत्या अवयवात खंडित झालेली आहे व भविष्यात आपल्याला होणाऱ्या आजाराचे निदान करता येते. रेकी या उपचार पद्धतीत आभामंडळ शुद्ध करून उपचार केला जातो .प्राणायाम, ध्यानधारणा, सत्संग, योग अभ्यास यासारख्या उपायांनी आपली आध्यात्मिक शक्ती वाढवून आपले आभामंडळ चांगले करता येते. म्हणूनच आपल्या व्यावहारिक जीवनात अध्यात्माला अनन्य साधारण महत्त्व आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक