शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आभामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:07 IST

प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.

प्रा. डॉ. संदीप ताटेवार|पदार्थविज्ञानाच्या शास्त्रानुसार प्रत्येक पदार्थ आपल्यापासून शक्ती परावर्तित करीत असतो. वैश्विक शक्तीसुद्धा आपल्यामध्ये अंतर्भूत असते. त्यामुळे प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.प्रकाशाचे वलय प्रत्येक माणसाभोवती निर्माण होत असते, यालाच आभामंडळ, प्रभावमंडळ किंवा औरा असे म्हटल्या जाते. आभामंडळचा उल्लेख शास्त्र पुराणातही केल्या गेला आहे. आपले आभामंडळ आपल्यासोबत २४ तास असते. आपले आभामंडळ हे विविध रंगांनी व त्याच्या प्रखरतेने, आकाराने बनले असते व त्याची जाडीसुद्धा कमी जास्त असते. संत महात्मा यांच्या आभामंडळची जाडी काही किलोमीटर व साधारण माणसाच्या आभामंडळची जाडी काही इंचापर्यंत असू शकते. प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व भावनिक अवस्थेनुसार आभामंडळ बदलत असते. आपल्या या चार अवस्था जेवढ्या पवित्र होत जातात तेवढ्या प्रमाणात आपले आभामंडळ चांगले होत जात असते. आभामंडळ म्हणजे आपल्याभोवती निर्माण झालेले एक सुरक्षा कवच होय कारण जेवढे आपले आभामंडळ चांगले व जास्त जाडीचे तेवढा आपल्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी प्रमाणात पडत असतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत जात असते. आपल्या आभामंडळाचा फोटो कीर्लीयान फोटोग्राफीद्वारे घेता येऊ शकतो.आजकाल तर साध्या फोटोवरून सुद्धा आधुनिक स्वॉफ्टवेअरद्वारे आभामंडळचा फोटो घेता येतो. जेव्हा आपण आजारी, दु:खी, निराश, हिंसक, क्रोधी, मत्सरी, नकारात्मक असतो त्यावेळेस आपले आभामंडळ चांगले नसते. मात्र जेव्हा आपण आनंदी, उत्साही, सकारात्मक, प्रेमळ, आध्यात्मिक असतो तेव्हा त्यामध्ये शक्तीचा प्रवाह सुरळीत आढळतो व आभामंडळ चांगले होते.आभामंडळाच्या फोटोच्या अभ्यासावरून आपली शक्ती शरीराच्या कोणत्या अवयवात खंडित झालेली आहे व भविष्यात आपल्याला होणाऱ्या आजाराचे निदान करता येते. रेकी या उपचार पद्धतीत आभामंडळ शुद्ध करून उपचार केला जातो .प्राणायाम, ध्यानधारणा, सत्संग, योग अभ्यास यासारख्या उपायांनी आपली आध्यात्मिक शक्ती वाढवून आपले आभामंडळ चांगले करता येते. म्हणूनच आपल्या व्यावहारिक जीवनात अध्यात्माला अनन्य साधारण महत्त्व आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक