शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

आभामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:07 IST

प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.

प्रा. डॉ. संदीप ताटेवार|पदार्थविज्ञानाच्या शास्त्रानुसार प्रत्येक पदार्थ आपल्यापासून शक्ती परावर्तित करीत असतो. वैश्विक शक्तीसुद्धा आपल्यामध्ये अंतर्भूत असते. त्यामुळे प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.प्रकाशाचे वलय प्रत्येक माणसाभोवती निर्माण होत असते, यालाच आभामंडळ, प्रभावमंडळ किंवा औरा असे म्हटल्या जाते. आभामंडळचा उल्लेख शास्त्र पुराणातही केल्या गेला आहे. आपले आभामंडळ आपल्यासोबत २४ तास असते. आपले आभामंडळ हे विविध रंगांनी व त्याच्या प्रखरतेने, आकाराने बनले असते व त्याची जाडीसुद्धा कमी जास्त असते. संत महात्मा यांच्या आभामंडळची जाडी काही किलोमीटर व साधारण माणसाच्या आभामंडळची जाडी काही इंचापर्यंत असू शकते. प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व भावनिक अवस्थेनुसार आभामंडळ बदलत असते. आपल्या या चार अवस्था जेवढ्या पवित्र होत जातात तेवढ्या प्रमाणात आपले आभामंडळ चांगले होत जात असते. आभामंडळ म्हणजे आपल्याभोवती निर्माण झालेले एक सुरक्षा कवच होय कारण जेवढे आपले आभामंडळ चांगले व जास्त जाडीचे तेवढा आपल्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी प्रमाणात पडत असतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत जात असते. आपल्या आभामंडळाचा फोटो कीर्लीयान फोटोग्राफीद्वारे घेता येऊ शकतो.आजकाल तर साध्या फोटोवरून सुद्धा आधुनिक स्वॉफ्टवेअरद्वारे आभामंडळचा फोटो घेता येतो. जेव्हा आपण आजारी, दु:खी, निराश, हिंसक, क्रोधी, मत्सरी, नकारात्मक असतो त्यावेळेस आपले आभामंडळ चांगले नसते. मात्र जेव्हा आपण आनंदी, उत्साही, सकारात्मक, प्रेमळ, आध्यात्मिक असतो तेव्हा त्यामध्ये शक्तीचा प्रवाह सुरळीत आढळतो व आभामंडळ चांगले होते.आभामंडळाच्या फोटोच्या अभ्यासावरून आपली शक्ती शरीराच्या कोणत्या अवयवात खंडित झालेली आहे व भविष्यात आपल्याला होणाऱ्या आजाराचे निदान करता येते. रेकी या उपचार पद्धतीत आभामंडळ शुद्ध करून उपचार केला जातो .प्राणायाम, ध्यानधारणा, सत्संग, योग अभ्यास यासारख्या उपायांनी आपली आध्यात्मिक शक्ती वाढवून आपले आभामंडळ चांगले करता येते. म्हणूनच आपल्या व्यावहारिक जीवनात अध्यात्माला अनन्य साधारण महत्त्व आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक