शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

अरे व्वा...अर्थसंकल्प की काल्पनिक जुमल्यांचे नवे भेंडोळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:47 IST

लोकसभेच्या खच्चून भरलेल्या सभागृहात, अर्थसंकल्प वाचताना अर्थमंत्री जेटली म्हणाले, यंदाचा अर्थसंकल्प भारतीय शेतकºयांना समृध्द करणारा आहे तसेच जगातली सर्वात मोठी आरोग्य सुविधा प्रदान करणारा आहे. शेतक-यांना आपल्या शेतमालाचे मूल्य (स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार?) उत्पादन खर्चाच्या दीडपट देण्याचे अभिवचन अर्थसंकल्पात आहे तर देशातल्या १० कोटी कुटुंबांचा पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा, देशातल्या ५० कोटी लोकांना लाभ मिळवून देणार आहे. ऐकताना सुखद वाटणा-या या घोषणांमधे खरेपणाचा लवलेश किती? नेहमीप्रमाणे हा आकडेवारीचा खेळ आहे की, जनतेसमोर फेकलेले चुनावी जुमल्यांचे भेंडोळे?

- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)लोकसभेच्या खच्चून भरलेल्या सभागृहात, अर्थसंकल्प वाचताना अर्थमंत्री जेटली म्हणाले, यंदाचा अर्थसंकल्प भारतीय शेतकºयांना समृध्द करणारा आहे तसेच जगातली सर्वात मोठी आरोग्य सुविधा प्रदान करणारा आहे. शेतक-यांना आपल्या शेतमालाचे मूल्य (स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार?) उत्पादन खर्चाच्या दीडपट देण्याचे अभिवचन अर्थसंकल्पात आहे तर देशातल्या १० कोटी कुटुंबांचा पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा, देशातल्या ५० कोटी लोकांना लाभ मिळवून देणार आहे. ऐकताना सुखद वाटणा-या या घोषणांमधे खरेपणाचा लवलेश किती? नेहमीप्रमाणे हा आकडेवारीचा खेळ आहे की, जनतेसमोर फेकलेले चुनावी जुमल्यांचे भेंडोळे?अर्थमंत्र्यांच्या घोषणांच्या तपशिलांचे विच्छेदन करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही कृषी उत्पादन व कृषी मूल्य आयोगाची वेबसाईट उघडली. पिकांचा प्रतिवर्षाचा उत्पादन खर्च व त्याला मिळणाºया किमान हमी भावाचा डेटा या वेबसाईटवर उपलब्ध असतो. हाच आयोग पिकांचे हमीभावही ठरवतो. उत्पादन खर्चाचे दोन प्रकार वेबसाईटवर पहायला मिळाले. पहिल्या पिकाचा केवळ उत्पादन खर्च आणि दुसरा शेतमालाच्या विक्रीपर्यंत मोजलेल्या रकमेसह पिकाचा आर्थिक उत्पादन खर्च. त्यात कर्जाचे व्याज, कमिशन, शेतसारा, कर, बाजार समिती शुल्क, वाहतूक इत्यादींचाही समावेश आहे.शेतकºयांना प्रत्यक्षात जो भाव मिळतो, त्याच्या स्पष्टीकरणासाठी एक उदाहरणच या निमित्ताने देणे उचित ठरेल. फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एफसीआय) प्रतिवर्षी शेतकºयांचा गहू, तांदूळ खरेदी करते. एफसीआयच्या वेबसाईटनुसार २०१४/१५ साली गव्हाचा उत्पादन खर्च होता प्रतिक्विंटल २०१५ रुपये, २०१५/१६ साली २१२७ रुपये अन् २०१७/१८ साली २४०८ रुपये. प्रत्यक्षात गहू उत्पादक शेतकºयांना एफसीआयकडून गतवर्षी भाव मिळाला १७३५ रुपये प्रति क्विंटल. याचा अर्थ मोदी सरकारच्या राजवटीत शेतकºयांना स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार एकदाही हमीभाव मिळालेला नाही. गव्हाचा प्रति क्विंटल केवळ उत्पादन खर्च आहे १२५६ रुपये व आर्थिक उत्पादन खर्च आहे २३४५ रुपये प्रति क्विंटल. दोन्ही प्रकारचे खर्च लक्षात घेतले तर १७३५ रुपये प्रतिक्विंटल ही रक्कम कोणत्याही खर्चाच्या दीडपट नाही. शेतकºयांना खरोखर दीडपट भाव द्यायचा झाला तर केवळ उत्पादन खर्चाच्या प्रमाणात तो १८८४ रुपये व आर्थिक उत्पादन खर्चाच्या प्रमाणात तो ३५१७ रुपये प्रति क्विंटल असायला हवा. अर्थमंत्री जेटलींनी तरीही अर्थसंकल्पाच्या भाषणात ठोकून दिले की बहुतांश रब्बी पिकांचे हमीभाव उत्पादन खर्चाच्या दीडपट निश्चित करण्यात आले आहेत. मग सरकारी वेबसाईटवरची उपरोक्त आकडेवारी खोटी की अर्थसंकल्पाचे वाचन करताना अर्थमंत्री सर्रास चुकीची विधाने करीत होते?बजेट सादर होताच संसदेच्या परिसरात माजी कृषी मंत्री शरद पवारांना गाठले. त्यांना विचारले, हमीभावाच्या आकडेवारीत नेमके गौडबंगाल काय? ते म्हणाले ‘हा आकड्यांचा काल्पनिक खेळ आहे. प्रत्यक्षात शेतमाल या भावाने खरेदी कोण करणार? अर्थमंत्री ते सांगत नाहीत.’ यावेळी पवारांनी आणखी नवीच माहिती दिली. ‘भारतात फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया ही संस्था फक्त पंजाब अन् हरियाणात गहू आणि तांदूळ खरेदी करते. देशाच्या अन्य भागात एफसीआयकडे शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा व व्यवस्था नाही. धान्याची खरेदी तथा विक्रीची व्यवस्था देशभर राज्यांकडे आहे कारण तिथे स्थानिक संस्थांचे जाळे असते. शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव त्या बाजारपेठेत कसा मिळणार? त्याची खरेदी कोण करणार? अर्थमंत्र्यांच्या भाषणात याचा कोणताही खुलासा नाही.’ बजेटनंतर पत्रकारांशी याच विषयावर बोलताना अर्थमंत्री जेटली म्हणाले, ‘आधारभूत किमतीच्या खाली जर शेतकºयांना उत्पादन विकावे लागले तर एक निश्चित रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. मध्य प्रदेशच्या भावांतर योजनेचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. नीती आयोग त्यातून नक्कीच मध्यममार्ग शोधून काढील’. अर्थमंत्र्यांचे उत्तर ऐकल्यावर वाटले, ‘शेतकरी पुन्हा वाºयावरच आहे कारण सारे काही जर तरच’.अर्थमंत्री म्हणतात भारतातल्या दहा कोटी कुटुंबांना पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळणार. जगाच्या पाठीवरची ही सर्वात मोठी आरोग्य सुविधा योजना आहे. प्रत्येक कुटुंबात पाच व्यक्तींसाठी, प्रतिव्यक्ती दोन हजार रुपयांचा हप्ता धरला तरी अर्थसंकल्पात किमान एक लाख कोटींची तरतूद असायला हवी प्रत्यक्षात यंदा तरतूद किती तर फक्त दोन हजार कोटी रुपये. उरलेला पैसा कोण देणार? मोदी सरकारचे निकटवर्ती उद्योगपती की विम्याचे हप्ते गोळा करून गरजूंना ठेंगा दाखवणाºया त्यांच्या विमा कंपन्या? याच योजनेच्या उत्तरार्धात अर्थमंत्र्यांनी प्रत्येक तीन लोकसभा मतदारसंघांमागे एक नवे रुग्णालय सुरू करण्याचे स्वप्न दाखवले आहे. हे स्वप्न पूर्ण कधी होणार? १०/१५ वर्षात प्रत्येक अर्थसंकल्पात एम्सच्या धर्तीवर विविध राज्यात नवी एम्स रुग्णालये सुरू करण्याच्या घोषणा झाल्या. यापैकी किती एम्स प्रत्यक्षात उभे राहिले? नवे रोजगार, नव्या नोकºयांबाबत अर्थसंकल्पात कोणतीही खास तरतूद नाही. चार दिवसांपूर्वी अचानक एक बातमी आली की पाच वर्षांपासून रिक्त असलेल्या सरकारी नोकºया कायमस्वरूपी रद्द करण्याचे सरकारने ठरवले आहे. एकट्या केंद्र सरकारमध्ये अशा नोकºयांची संख्या ४ लाख १२ हजार आहे. महाराष्ट्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने एक परिपत्रक नुकतेच जारी केले की, प्रत्येक विभागाने ३० टक्के नोकरकपातीसह प्रस्ताव पाठवावेत. ही बातमी २ डिसेंबर १७ रोजी आली. महाराष्ट्रात सुमारे १९ लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्यातले ३० टक्के म्हणजे ५ ते ६ लाख कमी झाले तर विचार करा, नेमके काय होईल? कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देणे सरकारला शक्य नाही म्हणून राज्य सरकारने आता डिजिटायझेशन, कॉम्प्युटरीकरण व सरकारी काम कंत्राटी पध्दतीने आऊट सोअर्स करण्याचा मनसुबा रचलाय, अशी चर्चा आहे. बिचारे तरुण बेरोजगार स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपले तारुण्य पणाला लावत आहेत. सरकारी नोकºयांची स्वप्ने पाहणाºया तरुण पिढीची ही शुध्द फसवणूक नाही काय?२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प अखेर विविध प्रकारच्या जुमल्यांचे भेंडोळेच ठरला आहे. त्यात ना भविष्याच्या मार्गक्रमणाविषयी कोणतीही दिशा आहे ना कल्पकता!

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पArun Jaitleyअरूण जेटली