शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हे सरत्या वर्षा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 01:27 IST

 तू निघालास म्हटल्यानंतर दिलासा वाटतो आहे आज! शंकेची पाल घेऊनच आला होतास तू!

प्रिय २०२०, तुला काळाच्या पटावरील बॅडपॅच समजावं की, समस्त मानव जातीला पडलेलं दु:स्वप्न? यापैकी काहीही म्हटलं तरी तुला फारसा फरक पडणार नाही. तुला जसं वागायचं होतं, तसा वागलास; जे रंग दाखवायचे होते ते दाखवलेस. त्याचे भोग आम्ही भोगतोच आहोत.  तू निघालास म्हटल्यानंतर दिलासा वाटतो आहे आज! शंकेची पाल घेऊनच आला होतास तू!

चीनमध्ये काही तरी घडतंय, अशी कुणकुण तुझ्या आगमनासोबतच लागली होती; पण तुझ्या आगमनाच्या आनंदात आम्ही तिकडं दुर्लक्ष केलं. नव्या वर्षाचं आगमन सुखाची चाहूल देतं. पण इथं भलतंच झालं. खरंतर अशा अनेक संकटांचा सामना आमच्या पूर्वजांनी अगोदरच केला होता आणि आता तर आम्ही अत्याधुनिक साधन सामुग्रीनं सज्ज होतो; पण तरीही तू मात्र आमच्या भ्रमाचा भोपळा फोडलास. अखिल मानव जात किती क:पदार्थ आहे, हे दाखवण्याचा तुझा प्रयत्न होता. तू माणसाला माणसापासून तोडलेस, नाती विसकटून टाकलीस.

गावगाडा उद्‌ध्वस्त केलास. व्यापार, उदीम बसवलास. जणू काही जगरहाटीच थांबवण्याचा प्रयत्न केलास. जगभर स्मशानशांतता पसरवण्याचा प्रयत्न केलास. माणसांना घरात कोंडलं. चेहऱ्याला मास्क लागले. मृतदेहाचे खच पडले. दवाखाने भरून गेले. लॉकडाऊनच्या रूपानं तर संपूर्ण जगानं स्मशानशांततेचा अनुभव घेतला. गावावर मरणकळा उतरली. एक भयाण, भेसूर वातावरण निर्माण झालं. प्रत्येक जण क्षणाक्षणाला कणकणानं मरत होता.  आज हा गेला, उद्या आपण तर नाही, ही धडकी प्रत्येकाच्या मनात होती. जिवंत असताना मरणाचा अनुभव देणारा तू. जगभर तू अक्षरश: तांडव घातलंस. वर्षभरात ना तू कुठले सण साजरे करू दिलेस, ना जल्लोशाची मोकळीक दिलीस. मुलीची पाठवणी आणि सुनेचं स्वागत हे आयुष्यातील परमोच्च आनंदाचे क्षण; पण तुझ्या कृष्णछायेत भीतीच्या सावटाखाली तेही गुदमरले.  ना दिवाळी-दसरा ना नाताळ, सारी मरणकळा.. एवढी तुझी दहशत!

‘अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा’ असं म्हणणारे आम्ही जिवाच्या आकांतानं पाय रेटत हजारो मैल दूर गावाच्या ओढीनं धावत निघालो. त्यात किती जीवांची फरफट झाली. रेल्वे रुळावर रक्ताळलेला भाकरीचा चंद्र पाहून आमची नजर शून्यवत झाली; पण तुला दया आली नाही. सगळं आसमंत उद्‌ध्वस्त होत होतं. अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर होताना उघड्या डोळ्यांनी दिसत होता. तुझ्याशी दोन हात करण्याची जिगीषा जिवंत ठेवत असताना तू मात्र जगभर भस्मासुरासारखा उच्छाद मांडला होतास. मार्कंडेय पुराणातील रक्तबीज असुराशी तुझं साम्य आहे, हे सरत्या वर्षा! या असुरानं कठोर तपश्चर्येच्या जोरावर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं.  वर मिळताच रक्तबीज असुर शक्तिमान बनला आणि त्यानं पृथ्वीवर उच्छाद मांडला. लढाईत जखमी होताच जमिनीवर पडणाऱ्या त्याच्या रक्ताच्या थेंबांतून नवा रक्तबीज जन्माला येत असुरांची संख्या वाढत होती. त्याच्या अत्याचारानं सर्व देव भयभीत झाले  आणि  त्यांनी देवीकडे प्रार्थना केली. देवीनं आपल्या जिभेचा आकार वाढवत रक्तबीजाशी युद्ध केलं आणि त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जिभेवर झेलला. अशा रीतीनं रक्तबीज असुराचा अंत झाला.  

तुझ्या खांद्यावर बसून आलेला कोरोना हा रक्तबीजच तर होता ! त्याच्या नाशासाठी लसीचं अस्र शोधलं आहे. त्याचा अंत जवळ आला आहे.  या पृथ्वीवरचा मानवाचा लाखो वर्षांचा इतिहास हा संघर्षाचा आहे. अशा हजारो संकटांशी दोन हात करणं हे आमच्या पेशी-पेशींमध्ये भिनलेलं आहे.  कोरोना आमच्या पेशीवर हल्ला करीत असला, तरी प्रसंगी आमची प्रत्येक पेशी सैनिक बनते, हे तुला माहीत नव्हतं!  त्याचा सामना करण्यासाठी आम्ही एकजूट केली. गावोगाव तटबंदी उभारली. दिसताक्षणी त्याला अटकाव करण्याची मोहीम उघडली.  अक्षरश: प्रत्येक जण कोरोना योद्ध्याच्या भूमिकेत शिरला.

एका अर्थानं तुझे आभारही मानायला हवेत, हे सरत्या वर्षा!  तू आमच्या अहंपणाचा फुगा फोडलास, आमच्या कुटुंबाची आम्हालाच नव्यानं ओळख करून दिलीस. कुटुंब नावाची मोठी शक्ती आपल्यामागं असते याची अनुभूती दिलीस. पैशाची किंमत कळली. त्याचवेळी पैसा सर्वस्व नाही, हेही तू पटवून दिलंस. कमी पैशात आनंद मिळतो हे शिकवलंस. आयुष्याचे सगळे रंग अनुभवले. आरोग्याची महती समजली. माणूसपण गवसलं आणि तुझ्यासारख्या राक्षसांबरोबर लढण्यासाठी हत्तीचं बळ दिलंस. आणखी काय पाहिजे? हे सरत्या वर्षा, तू निघाला आहेस आता, तर मुकाट निघ आणि काळाच्या कृष्णविवरात गडप हो! जाताना जरा काळजी घे. नवेकोरे वर्ष दारात  उभे आहे, त्याच्यावर तुझी सावली नको!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या