शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

हाँगकाँगच्या मदतीला..

By admin | Updated: October 2, 2014 13:22 IST

जगभरातील २00 देशांपैकी फक्त ४२ देशांत आज हुकूमशाही शिल्लक आहे आणि येत्या २५ वर्षांत ती पूर्णपणे नाहीशी होईल, असा जाणकारांचा कयास आहे.

जगभरातील २00 देशांपैकी फक्त ४२ देशांत आज हुकूमशाही शिल्लक आहे आणि येत्या २५ वर्षांत ती पूर्णपणे नाहीशी होईल, असा जाणकारांचा कयास आहे. या हुकूमशाही देशांत चीन हा सर्वांत मोठा देश आहे आणि सगळ्या सत्ताकांक्षी राजवटींसारखी त्याचीही सत्तेविषयीची ओढ मोठी आहे. १९८९ मध्ये लोकशाहीची मागणी करायला बीजिंगच्या तियानान मेन चौकात हजारोंच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर रणगाडे घालून त्यांना चिरडून टाकण्याचा डेंग या तेव्हाच्या चिनी राज्यकर्त्याने दिलेला आदेश आजही अंगावर शहारे यावेत असा आहे. त्याच पद्धतीने अध्यक्ष शी जिनपिंग यांनी हाँगकाँग या बेटाभोवती आपला हुकूमशाही पाश आवळण्याची तयारी चालविलेली आहे. ब्रिटिशांच्या ताब्यात असलेले हे बेट १९९७ मध्ये त्या देशाने चीनच्या स्वाधीन केले, तेव्हा तेथील बहुपक्षीय लोकशाही पद्धती आपण कायम राखू, असे आश्‍वासन चीनने तेथील जनतेला व जगाला दिले होते. त्यावर विसंबून राहूनच हाँगकाँगच्या जनतेने चीनचे वर्चस्व मान्य केले होते. मात्र आता १७ वर्षांनंतर चीनला हाँगकाँगची लोकशाही व बहुपक्षीय निवडणूक पद्धती खुपू लागली आहे. २0१७ मध्ये हाँगकाँगची नवी राजवट निवडली जाणार आहे. त्या निवडणुकीच्या तयारीत तेथील नेते आणि पक्ष आतापासूनच गुंतले आहेत. नेमक्या अशा वेळी चीनने त्या निवडणुकीत चिनी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार उभा राहील व त्यालाच मत देण्याची सक्ती सार्‍यांवर केली जाईल, असा अफलातून आदेश काढला आहे. चीन ही एकपक्षीय हुकूमशाही आहे आणि तीत निवडणूक ही नियुक्तीच्या पद्धतीनेच होत असते. एकेकाळी रशियात अशा निवडणुका होत. प्रत्येक मतदारसंघात कम्युनिस्ट पक्षाचा एकच उमेदवार उभा असे आणि मतदारांनी त्यालाच मतदान करायचे असे. मतदान सक्तीचे असल्यामुळे हे उमेदवार ९५ ते ९९ टक्के मते मिळवून निवडून येत आणि त्या बळावर रशियाचा कम्युनिस्ट पक्ष आपल्या लोकप्रियतेची जाहिरात जगात करीत असे. हाँगकाँगच्या जनतेने चीनचा हा  फतवा नाकारला आहे. त्याविरुद्ध त्या बेटावर मोठे आंदोलन उभे झाले आहे. ते दडपून टाकण्यासाठी चीनने जबर पोलीस बंदोबस्त केला असून, आंदोलकांवर पाण्याचा व रबरी गोळ्यांचा मारा करण्याची तयारी केली आहे. चीनचे सरकार एवढय़ावरच थांबेल असे मात्र नाही. शस्त्रबळाचा वापर आपल्याच जनतेविरुद्ध करण्याची त्याची सवय जुनी आहे आणि ‘लोक’ हा तसाही त्याच्या दृष्टीने क:पदार्थ असा विषय आहे. हाँगकाँग हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व प्रगत शहरांपैकी एक असल्यामुळे त्याच्या संपत्तीवर आपला हक्क असावा आणि त्यातील लोक हे आपले पूर्ण नागरिक बनावे, ही चिनी राज्यकर्त्यांची फार दिवसांची इच्छा आहे. मात्र, जागतिक लोकमत आणि हाँगकाँगच्या जनतेची स्वातंत्र्य व स्वायत्ततेविषयीची जबर आकांक्षा यामुळे त्या शहराला नमविणे चीनला आजवर शक्य झाले नाही. मात्र, हुकूमशाहीच्या मनात केव्हा काय येईल आणि त्यासाठी ती कोणता क्रूर खेळ करील याचा नेम नसतो. नेमकी तीच गोष्ट आता हाँंगकाँगबाबत घडत आहे. हाँगकाँग हे बेट चीनच्या मुख्य भूमीपासून काही किलोमीटर अंतरावर पॅसिफिक महासागरात असले तरी ते सेन्झेन या चिनी शहराशी समुद्राच्या पाण्याखालून जाणार्‍या पुलाने, रस्ता व रेल्वेने जोडले गेले आहे. शिवाय तेथे चीनचे लष्कर तैनात आहे. त्या बेटाला चिनी आरमाराचा मोठा वेढाही आहे. अशा वेळी जगभरची लोकशाहीवादी जनता हाँगकाँगच्या बाजूने उभी होणे व त्याच्या स्वायत्ततेसाठी तिची एकजूट तयार होणे गरजेचे आहे. कारण हुकूमशहा स्वदेशी जनतेचे ऐकत नसले तरी ते जागतिक लोकमतापुढे दबतात, असा आजवरचा अनुभव आहे. चीनचे हुकूमशहा केवळ क्रौर्यातच पुढे नाहीत; ते लबाडीतही कोणाच्या मागे नाहीत. अध्यक्ष शी जिनपिंग नुकतेच भारताच्या भेटीला आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते मैत्रीच्या गप्पा करीत असतानाच व त्यांच्यासोबत गुजराती ढोकळा खात असताना त्यांचे सैनिक लडाखची सीमा पार करून भारतात उतरले होते. काही ठिकाणी त्यांनी आपली ठाणीही कायम करण्याचा प्रयत्न करून पाहिला. चीनचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान मैत्रीच्या वाटाघाटी करीत असताना  दोन्ही देशांचे सैनिक मात्र परस्परांवर शस्त्रे उगारून एकमेकांना थोपविण्याचा प्रयत्न करतात, हे दृश्यच कमालीचे उद्वेगजनक आणि फसवे आहे. भारत हा स्वतंत्र व सार्वभौम देश आहे. त्याविरुद्ध प्रत्यक्ष कारवाई करणे हे आताच्या चीनला न जमणारे आहे. मात्र, हाँगकाँग हे त्यांच्या मालकीचे बेट आहे. तेथील जनता  त्यांना शरण गेली आहे आणि चीनच्या राज्यकर्त्यांनी तिबेटमध्ये काय केले हे जगाला ठाऊक आहे.