शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

डोकेदुखी कायम

By admin | Updated: January 25, 2017 01:06 IST

नोटाबंदीच्या अंमलबजावणीला दीड महिना उलटला आणि आता सारे काही म्हणजे पैशासाठी रांगेत उभे राहणे, खिशात कमी पैसे ठेवणे

नोटाबंदीच्या अंमलबजावणीला दीड महिना उलटला आणि आता सारे काही म्हणजे पैशासाठी रांगेत उभे राहणे, खिशात कमी पैसे ठेवणे, खर्च कमी करणे, अनाठायी खर्च टाळणे अशा काही चांगल्या गोष्टी अंगवळणी पडल्या. लोकांची सरकारबाबत जी काही थोडीफार कुरकुर होती तीसुद्धा हवेत विरली. सारे काही आलबेल झाले. अतिरेक्यांच्या बनावट नोटांचा कचरा झाला, त्यांच्या कारवाया थंडावल्या असे दावे कानावर पडू लागले. तिकडे काश्मिरात मात्र धुमश्चक्री चालू असावी. तरी त्याकडे सर्वांनीच काणाडोळा केला. उगाचाच मिठाचा खडा टाकायला नको असा साळसूद भाव सर्वांनी बाळगला. एकूण म्हणजे नोटाबंदीने काळा पैसा खणून बाहेर काढला असा भ्रम तयार करण्यात यश आले. अतिरेक्यांच्या कारवाया मंदावल्या असे भासवले जाऊ लागले. एका अर्थाने बनावट नोटा नावाची जी एक समांतर अर्थव्यवस्था होती तिला तडाखा बसला. नव्या नोटांचे डिझाईन अवघड आहे त्याच्या सारख्या बनावट नोटा चलनात येणे शक्य नाही असे ठामपणे सांगण्यात येत होते; पण रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या या दाव्यात ताबडतोब सुरुंग लागला. बनावट नोटांची प्रकरणे उघडकीस आली. परवा औरंगाबादेतही अशी टोळी पकडली. यायरून नोटा बनविण्याचे तंत्रज्ञान फार अवघड नाही. हेच सिद्ध होते. रिझर्व्ह बँकेकडे एवढे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच तज्ज्ञ आणि यंत्रणा आहे; पण छोट्याशा खोलीत लॅपटॉप, प्रिंटर अशा सहज उपलब्ध साधनांनी बनावट नोटा तयार होतात आणि चलनातही येतात ही गोष्टच धक्कादायक आहे. आपल्या जवळची नोट बनावट तर नाही ना अशी शंका सामान्य माणसाला येणेही रास्त आहे. औरंगाबादेत वीस बनावट नोटा आजवर हस्तगत झाल्या आणि दोन जणांना अटक झाली आहे. या बनावट नोटांचे रॅके ट हे औरंगाबाद किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती व्यापक आहे. फिरोज आणि इर्शाद या दोन आरोपीच्या चौकशीतून पुढे आलेली माहिती सावध करणारी आहे. देशातील दहशतवाद्यांकडे बाहेरून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा येत असल्याची धक्कादायक माहिती या दोघांकडून समजली, म्हणजे काळा पैसा आणि बनावट चलनाची समांतर अर्थव्यवस्था जिच्यावर दहशतवाद पोसला जातो या दोन्ही उद्ध्वस्त करणे हा नोटाबंदीचा उद्देश होता तो पूर्ण झाला नाही. हे दीड महिन्यातच सिद्ध झाले. बनावट चलनामुळे दहशतवादी कारवायांना बळ मिळतेच शिवाय अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या अहवालानुसार चलनात बनावट नोटा असलेल्या देशांमध्ये भारताचा नववा क्रमांक लागतो. बनावट भारतीय चलन पाकिस्तानात तयार होते आणि नेपाळ, बांगलादेश मार्गे ते देशात आणले जाते. याशिवाय दुबई, थायलंड, श्रीलंका, मलेशिया आणि आता चीनमार्गेही चोरट्या पद्धतीने अशा नोटा भारतात येतात. याचा परिणाम महागाई वाढण्यावर होतो. दीड महिन्यातच नव्या स्वरूपात बनावट नोटा उघड झाल्याने ही चिंता वाढली आहे. म्हणजे नोटा रद्द करण्याचा उपाय प्रभावी नव्हता हे सिद्ध झाले.