शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डोकेदुखी कायम

By admin | Updated: January 25, 2017 01:06 IST

नोटाबंदीच्या अंमलबजावणीला दीड महिना उलटला आणि आता सारे काही म्हणजे पैशासाठी रांगेत उभे राहणे, खिशात कमी पैसे ठेवणे

नोटाबंदीच्या अंमलबजावणीला दीड महिना उलटला आणि आता सारे काही म्हणजे पैशासाठी रांगेत उभे राहणे, खिशात कमी पैसे ठेवणे, खर्च कमी करणे, अनाठायी खर्च टाळणे अशा काही चांगल्या गोष्टी अंगवळणी पडल्या. लोकांची सरकारबाबत जी काही थोडीफार कुरकुर होती तीसुद्धा हवेत विरली. सारे काही आलबेल झाले. अतिरेक्यांच्या बनावट नोटांचा कचरा झाला, त्यांच्या कारवाया थंडावल्या असे दावे कानावर पडू लागले. तिकडे काश्मिरात मात्र धुमश्चक्री चालू असावी. तरी त्याकडे सर्वांनीच काणाडोळा केला. उगाचाच मिठाचा खडा टाकायला नको असा साळसूद भाव सर्वांनी बाळगला. एकूण म्हणजे नोटाबंदीने काळा पैसा खणून बाहेर काढला असा भ्रम तयार करण्यात यश आले. अतिरेक्यांच्या कारवाया मंदावल्या असे भासवले जाऊ लागले. एका अर्थाने बनावट नोटा नावाची जी एक समांतर अर्थव्यवस्था होती तिला तडाखा बसला. नव्या नोटांचे डिझाईन अवघड आहे त्याच्या सारख्या बनावट नोटा चलनात येणे शक्य नाही असे ठामपणे सांगण्यात येत होते; पण रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या या दाव्यात ताबडतोब सुरुंग लागला. बनावट नोटांची प्रकरणे उघडकीस आली. परवा औरंगाबादेतही अशी टोळी पकडली. यायरून नोटा बनविण्याचे तंत्रज्ञान फार अवघड नाही. हेच सिद्ध होते. रिझर्व्ह बँकेकडे एवढे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच तज्ज्ञ आणि यंत्रणा आहे; पण छोट्याशा खोलीत लॅपटॉप, प्रिंटर अशा सहज उपलब्ध साधनांनी बनावट नोटा तयार होतात आणि चलनातही येतात ही गोष्टच धक्कादायक आहे. आपल्या जवळची नोट बनावट तर नाही ना अशी शंका सामान्य माणसाला येणेही रास्त आहे. औरंगाबादेत वीस बनावट नोटा आजवर हस्तगत झाल्या आणि दोन जणांना अटक झाली आहे. या बनावट नोटांचे रॅके ट हे औरंगाबाद किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती व्यापक आहे. फिरोज आणि इर्शाद या दोन आरोपीच्या चौकशीतून पुढे आलेली माहिती सावध करणारी आहे. देशातील दहशतवाद्यांकडे बाहेरून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा येत असल्याची धक्कादायक माहिती या दोघांकडून समजली, म्हणजे काळा पैसा आणि बनावट चलनाची समांतर अर्थव्यवस्था जिच्यावर दहशतवाद पोसला जातो या दोन्ही उद्ध्वस्त करणे हा नोटाबंदीचा उद्देश होता तो पूर्ण झाला नाही. हे दीड महिन्यातच सिद्ध झाले. बनावट चलनामुळे दहशतवादी कारवायांना बळ मिळतेच शिवाय अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या अहवालानुसार चलनात बनावट नोटा असलेल्या देशांमध्ये भारताचा नववा क्रमांक लागतो. बनावट भारतीय चलन पाकिस्तानात तयार होते आणि नेपाळ, बांगलादेश मार्गे ते देशात आणले जाते. याशिवाय दुबई, थायलंड, श्रीलंका, मलेशिया आणि आता चीनमार्गेही चोरट्या पद्धतीने अशा नोटा भारतात येतात. याचा परिणाम महागाई वाढण्यावर होतो. दीड महिन्यातच नव्या स्वरूपात बनावट नोटा उघड झाल्याने ही चिंता वाढली आहे. म्हणजे नोटा रद्द करण्याचा उपाय प्रभावी नव्हता हे सिद्ध झाले.