शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

हवाहवासा ‘हवाई’ विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:32 IST

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे.

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे. नागपूरसह विदर्भात विमान प्रवासाची आवश्यकता सर्वसामान्यांदेखील वाटत असून २०१७ या वर्षभरात नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थोड्याथोडक्या नव्हे तर १० लाख प्रवाशांनी उड्डाण केले. मोठ्या शहरांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी ही ‘मिलियन’भरारी भविष्यातील संधी आणि बदलांचे संकेत देणारी आहे. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या नागपूरचा महामार्ग व रेल्वेच्या तुलनेत क्षमता असूनदेखील ‘हवाई’ क्षेत्रात हवा तसा विकास झाला नाही. विमानतळाचा विस्तारदेखील विविध तांत्रिक बाबींमध्ये अडकला व राजकीय इच्छाशक्तीचीदेखील साथ मिळाली नाही. मात्र गेल्या दशकापासून हे चित्र पालटताना दिसून येत आहे. मध्य भारतातील एक महत्त्वाचे विमानतळ अशी नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. येथील विमानांची वर्दळ वाढली असून खासगी विमानांची वाढती संख्या ही शहराचे वाढते महत्त्व स्पष्ट करणारी आहे. विमानप्रवास हे केवळ ‘व्हीआयपी’ व धनाढ्यांच्या प्रवासाचे साधन राहिलेले नाही. मुंबई, पुणे किंवा इतर शहरात जाण्यासाठी रेल्वेलाच प्राधान्य देणारी मंडळी आता बिनदिक्कतपणे विमानप्रवासाकडे वळत आहेत. नागपूरप्रमाणेच विदर्भात गोंदिया, अकोला, अमरावती येथे विमानतळ आहेत. गोंदिया येथील बिरसी विमानतळाची धावपट्टी तर बरीच जुनी आहे. या विमानतळांसाठीदेखील येणारा काळ चांगला राहू शकतो. २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी लहान विमानतळांच्या विकासासाठी घोषणाच केली. ‘हवाई चप्पल’ वापरणाºया सर्वसामान्य मनुष्यालादेखील विमानप्रवास करता यावा, यासाठी केंद्राकडून ‘उडान’ योजनेला बळकटी देण्यात येणार आहे. फारशी वापरात नसलेली ५६ विमानतळे एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी जर योग्य पद्धतीने झाली तर विदर्भातील ‘हवाई’ क्षेत्राला नक्कीच ‘अच्छे दिन’ येतील. येथील विमानतळांचा विकास करण्यासाठी राजकीय पुढाकारदेखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरबाबत तशी पावले उचलण्यात येत आहेत. इतर विमानतळांनादेखील प्राधान्य दिले गेले तर विदर्भात उद्योग स्थापनेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीकडे ते एक मोठे पाऊल ठरेल. असा ‘हवाई’ विकास उद्योगक्षेत्रापासून ते सर्वसामान्यांना हवाहवासाच वाटेल यात शंका नाही.