शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

हवाहवासा ‘हवाई’ विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:32 IST

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे.

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे. नागपूरसह विदर्भात विमान प्रवासाची आवश्यकता सर्वसामान्यांदेखील वाटत असून २०१७ या वर्षभरात नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थोड्याथोडक्या नव्हे तर १० लाख प्रवाशांनी उड्डाण केले. मोठ्या शहरांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी ही ‘मिलियन’भरारी भविष्यातील संधी आणि बदलांचे संकेत देणारी आहे. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या नागपूरचा महामार्ग व रेल्वेच्या तुलनेत क्षमता असूनदेखील ‘हवाई’ क्षेत्रात हवा तसा विकास झाला नाही. विमानतळाचा विस्तारदेखील विविध तांत्रिक बाबींमध्ये अडकला व राजकीय इच्छाशक्तीचीदेखील साथ मिळाली नाही. मात्र गेल्या दशकापासून हे चित्र पालटताना दिसून येत आहे. मध्य भारतातील एक महत्त्वाचे विमानतळ अशी नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. येथील विमानांची वर्दळ वाढली असून खासगी विमानांची वाढती संख्या ही शहराचे वाढते महत्त्व स्पष्ट करणारी आहे. विमानप्रवास हे केवळ ‘व्हीआयपी’ व धनाढ्यांच्या प्रवासाचे साधन राहिलेले नाही. मुंबई, पुणे किंवा इतर शहरात जाण्यासाठी रेल्वेलाच प्राधान्य देणारी मंडळी आता बिनदिक्कतपणे विमानप्रवासाकडे वळत आहेत. नागपूरप्रमाणेच विदर्भात गोंदिया, अकोला, अमरावती येथे विमानतळ आहेत. गोंदिया येथील बिरसी विमानतळाची धावपट्टी तर बरीच जुनी आहे. या विमानतळांसाठीदेखील येणारा काळ चांगला राहू शकतो. २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी लहान विमानतळांच्या विकासासाठी घोषणाच केली. ‘हवाई चप्पल’ वापरणाºया सर्वसामान्य मनुष्यालादेखील विमानप्रवास करता यावा, यासाठी केंद्राकडून ‘उडान’ योजनेला बळकटी देण्यात येणार आहे. फारशी वापरात नसलेली ५६ विमानतळे एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी जर योग्य पद्धतीने झाली तर विदर्भातील ‘हवाई’ क्षेत्राला नक्कीच ‘अच्छे दिन’ येतील. येथील विमानतळांचा विकास करण्यासाठी राजकीय पुढाकारदेखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरबाबत तशी पावले उचलण्यात येत आहेत. इतर विमानतळांनादेखील प्राधान्य दिले गेले तर विदर्भात उद्योग स्थापनेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीकडे ते एक मोठे पाऊल ठरेल. असा ‘हवाई’ विकास उद्योगक्षेत्रापासून ते सर्वसामान्यांना हवाहवासाच वाटेल यात शंका नाही.