शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

हवाहवासा ‘हवाई’ विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:32 IST

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे.

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे. नागपूरसह विदर्भात विमान प्रवासाची आवश्यकता सर्वसामान्यांदेखील वाटत असून २०१७ या वर्षभरात नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थोड्याथोडक्या नव्हे तर १० लाख प्रवाशांनी उड्डाण केले. मोठ्या शहरांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी ही ‘मिलियन’भरारी भविष्यातील संधी आणि बदलांचे संकेत देणारी आहे. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या नागपूरचा महामार्ग व रेल्वेच्या तुलनेत क्षमता असूनदेखील ‘हवाई’ क्षेत्रात हवा तसा विकास झाला नाही. विमानतळाचा विस्तारदेखील विविध तांत्रिक बाबींमध्ये अडकला व राजकीय इच्छाशक्तीचीदेखील साथ मिळाली नाही. मात्र गेल्या दशकापासून हे चित्र पालटताना दिसून येत आहे. मध्य भारतातील एक महत्त्वाचे विमानतळ अशी नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. येथील विमानांची वर्दळ वाढली असून खासगी विमानांची वाढती संख्या ही शहराचे वाढते महत्त्व स्पष्ट करणारी आहे. विमानप्रवास हे केवळ ‘व्हीआयपी’ व धनाढ्यांच्या प्रवासाचे साधन राहिलेले नाही. मुंबई, पुणे किंवा इतर शहरात जाण्यासाठी रेल्वेलाच प्राधान्य देणारी मंडळी आता बिनदिक्कतपणे विमानप्रवासाकडे वळत आहेत. नागपूरप्रमाणेच विदर्भात गोंदिया, अकोला, अमरावती येथे विमानतळ आहेत. गोंदिया येथील बिरसी विमानतळाची धावपट्टी तर बरीच जुनी आहे. या विमानतळांसाठीदेखील येणारा काळ चांगला राहू शकतो. २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी लहान विमानतळांच्या विकासासाठी घोषणाच केली. ‘हवाई चप्पल’ वापरणाºया सर्वसामान्य मनुष्यालादेखील विमानप्रवास करता यावा, यासाठी केंद्राकडून ‘उडान’ योजनेला बळकटी देण्यात येणार आहे. फारशी वापरात नसलेली ५६ विमानतळे एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी जर योग्य पद्धतीने झाली तर विदर्भातील ‘हवाई’ क्षेत्राला नक्कीच ‘अच्छे दिन’ येतील. येथील विमानतळांचा विकास करण्यासाठी राजकीय पुढाकारदेखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरबाबत तशी पावले उचलण्यात येत आहेत. इतर विमानतळांनादेखील प्राधान्य दिले गेले तर विदर्भात उद्योग स्थापनेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीकडे ते एक मोठे पाऊल ठरेल. असा ‘हवाई’ विकास उद्योगक्षेत्रापासून ते सर्वसामान्यांना हवाहवासाच वाटेल यात शंका नाही.