शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

हरयाणवी राज्यनाट्य; आयाराम-गयारामांची संस्कृती इथेच झाली निर्माण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2024 07:47 IST

आत्तादेखील अशाच प्रकारचे राजकारण साध्या गोष्टीवरून घडले. 

हरयाणा राज्य छोटे असले तरी ते नवी दिल्लीच्या भोवती असल्याने अनेकवेळा राजकीय घडामोडींमध्ये खळबळ उडवून देते. एकेकाळी देवीलाल, बन्सीलाल आणि भजनलाल या तीन ‘लाल’मुळे हरयाणा नेहमी चर्चेत असायचे. आयाराम- गयारामांची संस्कृती याच हरयाणाने निर्माण केली. याविषयीदेखील हरयाणाची कुप्रसिद्धी आहे. आत्तादेखील अशाच प्रकारचे राजकारण साध्या गोष्टीवरून घडले. 

पाच वर्षांपूर्वी हरयाणा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा ९० जागांपैकी भाजपला सर्वाधिक म्हणजे ४० जागा मिळाल्या होत्या. बहुमताचा ४६ चा आकडा त्यांना गाठता आला नाही. परिणामी दुष्यंत चौटाला (देवीलाल यांचे नातू) यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पक्षाशी भाजपने युती केली. उपमुख्यमंत्रिपद दुष्यंत चौटाला यांना देण्यात आले. याशिवाय दोन कॅबिनेट मंत्रिपदेही देण्यात आली. या दोन्ही पक्षांची आघाडी गेली साडेचार वर्षे राज्य करते आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली होती. तेव्हा भाजपने हरयाणाच्या दहाच्या दहा जागा जिंकल्या होत्या. आत्ता आघाडीचे राज्य असल्यामुळे दुष्यंत चौटाला यांनी दहापैकी दोन जागा आपल्या पक्षाला सोडाव्यात, अशी मागणी केली होती. त्यामध्ये हिसार आणि भिवानी-महेंद्रगड या मतदारसंघांचा समावेश होता. हिसार हा चौटाला यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गत निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांचाच पराभव भाजपने केला होता. भाजपचे विद्यमान खासदार बृजेंद्र सिंह यांनी ही जागा चौटाला यांना सोडली जाईल, असे वाटल्याने भाजपला रामराम करून काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. अशा एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये  सहजासहजी हरयाणामध्ये उड्या  मारल्या जातात. त्यात विशेष असे काही नाही. मात्र, भाजपने गेल्या निवडणुकीत सर्व जागा जिंकल्या असल्यामुळे चौटाला यांच्या पक्षाला केवळ हिसारची एकच जागा देण्याची तयारी दर्शवली होती. 

दुष्यंत चौटाला यांची मागणी दोन जागांची होती. या एकमेव कारणामुळे दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या सरकारबद्दल तसेच केंद्र सरकारबद्दल हरयाणामध्ये असंतोष जाणवतो आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न, लष्करामध्ये अग्नीवीर भरती योजना आणणे आणि हरयाणाच्या कुस्तीपटूंना ज्या पद्धतीने भारतीय कुस्ती परिषदेने वागवले तसेच महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. 

या सर्व विषयांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नकारात्मक भूमिका घेतली होती. शेतकऱ्यांना हमीभावाची हमी देण्यासाठी कायदा हवा आहे. हरयाणामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात लष्करामध्ये भरती होतात. त्यांना अग्नीवीर ही संकल्पना मान्य नाही. कारण लष्करात भरती झाल्यानंतर केवळ चारच वर्षांनंतर निवृत्त व्हावे लागणार आहे. कुस्तीपटूंचा विषय गेले वर्षभर गाजतो आहे आणि तो गंभीरही आहे. या सर्व प्रश्नांवर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काहीही केले नाही, अशीही भावना आहे. जरी ते संघ परिवारातील असले तरीदेखील त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणुकीत तसेच आणखी चार महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवणे कठीण जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व राजकीय घडामोडीच्या आदल्या दिवशी (गेल्या सोमवारी) हरयाणाच्या दौऱ्यावर होते. सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी त्यांच्यापासून लपून राहिली नाही. त्यामुळे मनोहरलाल खट्टर यांचेच नेतृत्व बदलण्याचा निर्णय भाजपला घ्यावा लागला. त्यांच्या जागी कुरूक्षेत्रचे खासदार सैनी यांना निवडण्यात आले. ते ओबीसी समाजातून येत असल्यामुळे त्या समाजाचे पाठबळ मिळेल, असे त्यांची निवड होताच प्रसारमाध्यमांना सांगण्यात येऊ लागले. 

वास्तविक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तरुणांना हमखास नोकरीची संधी मिळणारी लष्कर भरती याविषयी असलेली नाराजी काढणे भाजपला शक्य होईल, असे दिसत नाही. या सर्व प्रश्नांवरती काँग्रेसने सतत आघाडी उघडली असल्यामुळे त्यांना वाढता पाठिंबा मिळतो आहे. हिसारचे खासदार बृजेंद्र सिंह यांनी ही हवा लक्षात घेऊन भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चौटाला यांच्यासाठी हिसारची जागा सोडली तर आपल्याला काँग्रेसमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, हे त्यांनी ओळखले. हरयाणाचे राजकारण धक्का देणारे आहे. याचा शेवट यावर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतच होईल. आजतरी भाजप बॅकफुटवर गेला आहे, पण याचा लाभ घेण्यासाठी काँग्रेस कितपत यशस्वी खेळी खेळते, यावर सर्व गणित अवलंबून आहे. 

टॅग्स :Haryanaहरयाणा