शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी आनंद गडे!

By admin | Updated: June 8, 2017 00:01 IST

महाराष्ट्रातील लोकांचे वाईट दिवस आता लवकरच संपणार असून, सर्वत्र आनंदी आनंद पसरणार आहे.

महाराष्ट्रातील लोकांचे वाईट दिवस आता लवकरच संपणार असून, सर्वत्र आनंदी आनंद पसरणार आहे. आनंदाच्या डोहावर आनंदाचे तरंग उमटणार आहेत. आणि आजची रात्र सरल्यावर उद्याचा दिवस तरी चांगला उगवेल या आशेने झोपी जाणाऱ्यांना यापुढे आनंदाच्या डोहात मनसोक्त डुंबता येणार आहे. एकूण काय तर राज्यातील नागरिकांची आनंदाची प्रतीक्षा संपणार आहे. हे ऐकल्यानंतर अचानक हा आनंद कुठून येणार, असा प्रश्न तुम्हाला स्वाभाविकपणे पडला असणारच ! तर याचे सारे श्रेय राज्य शासनाला जाते. आपल्या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याकरिता स्वतंत्र आनंद विभागाच स्थापन करण्याचा निर्णय येथील सहृदयी शासनाने घेतला आहे. आता बोला! हे ऐकून झाला ना अत्यानंद? अर्थात या आनंद विभागातर्फे नेमक्या कुठल्या प्रकारे लोकांना आनंदी केले जाणार, या आनंदाची परिभाषा काय असणार? याची खुलासेवार माहिती यथावकाश आपल्याला कळेलच. परंतु आनंदाचे परिमाण निश्चित करताना दरडोई उत्पन्न, रोजगाराच्या संधी, जीवनस्तर, व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समरसता, उदारता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण याचा विचार करावा लागणार तसाच तो राज्यातील इतर ज्वलंत प्रश्नांचाही व्हावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाने सध्या सारे राज्य ढवळून निघाले आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर आला आहे. दुसरीकडे शाळाबाह्य मुलांच्या समस्येवरही अद्याप आम्ही तोडगा काढू शकलेलो नाही. राज्यभरात चार लाखावर मुले शाळाबाह्य असून, या मुलांचा शोध घेऊन त्यांना पटलावर कसे आणता येईल, हे शिक्षण विभागापुढील मोठे आव्हान आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कुपोषणावर आळा घालणारे ठोस उपायही आपल्याला सापडलेले नाहीत. आदिवासी बालकांसाठी राबविल्या जाणाऱ्या पौष्टिक आहार योजनेनंतरही गेल्या वर्षभरात १७ हजारावर बालमृत्यू झाले हे वास्तव आम्हाला स्वीकारावेच लागेल. गरिबांना माफक दरात अन्नधान्य मिळावे यासाठी केंद्राच्या अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत अन्न आयोग स्थापनेकडे अजूनही आम्ही गांभीर्याने बघिलेले नाही. स्वत:ला पुरोगामी आणि प्रगत म्हणून घेणाऱ्या या राज्यात गेल्या २८ वर्षांपासून लिंगनिदान कायदा अस्तित्वात असताना मुलींचा जन्मदर वाढण्याऐवजी कमीच झाला आहे. स्त्रियांवरील अत्याचारात फारशी कमतरता जाणवत नाही. पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीने वृक्षलागवडीसारखे पर्याय अवलंबले जात असले तर लक्ष्य अद्याप कोसो दूर आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये राज्यातील १७ शहरांचा समावेश डोळ्यात अंजन घालणारा आहे. याशिवाय तरुणांना आपल्याच राज्यात रोजगाराच्या उत्तम संधी, गरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा हे सर्व प्रश्न आम्हाला प्रामाणिकपणे सोडवावे लागतील. तरच या आनंद विभागाला अर्थ राहील अन्यथा सर्वत्र आनंदी आनंदच असेल !