शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

आम्ही तरुण होतो याच्या बरेच आधी

By admin | Updated: February 12, 2017 23:51 IST

इश्क ने गालिब को निकम्मा कर दिया वरना हम भी आदमी थे काम के ...

इश्क ने गालिब को निकम्मा कर दियावरना हम भी आदमी थे काम के ...मिर्झा गालिबनं कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला हा शेर गळी उतरता उतरता या जित्या जागत्या शहरातील दोन पिढ्या कधी सरल्या हे कळलंच नाही. अहोरात्र जागं राहण्याची सवय जडलेली ही महानगरी म्हणजे सांस्कृतिक बदलाच्या मोजमापाची अचूक पट्टीच म्हणा, ना! काळानुरूप बदलणं हा बहुसंख्य मुंबईकरांचा स्वभाव आहे. म्हणूनही असेल, कदाचित.....नव्या पिढीनं गालिबची प्रेम भावना स्वीकारली पण त्याचा इजहार बदलला. आपण व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करायचा, की वसंत पंचमीची कास सोडायची नाही, या संभ्रमात काही पिढ्या सरल्या. प्रेमाचा इजहार हा चार हात लांब राहून अर्थात सुरक्षित अंतर ठेवून केवळ नजरेनं करायचा, या खोलवर रूजलेल्या पाळामुळांना फुटलेल्या पारंब्या सर्वस्वी वेगळ्या आहेत. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे... या सारखा फक्त भावगर्भ आशयातून व्यक्त होण्याचा काळ गडप झाला आहे. लांब काडीचं गुलाबाचं फूल नाकासमोर धरून माझी होशील का, असं धिटाईनं विचारणारी आधीची पिढीसुद्धा आता पुढ्यातल्या मोबाइलमध्ये नाक खुपसून बसू लागली आहे. इतकंच कशाला, १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेण्टाइन्स डे च्या आसपास दादरच्या फुलबाजारात जितक्या गुलाब कळ्यांचा उठाव होतो, त्यापेक्षा कैकपटीनं जास्त गुलाब कळ्या सोशल मीडियाच्या कुंडीतून या मोबाइलमधून त्या मोबाइलमध्ये जात असतात. मायानगरी मुंबई हीच या स्थित्यंतराची जननी आहे. त्यातूनच ‘व्हॅलेण्टाइन्स डे’चं आपल्याकडे आलेलं लोण गेल्या दोन दशकांच्या प्रवासानंतर बऱ्यापैकी स्थिरावलंय. मध्यंतरीच्या काळात व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करण्याला विरोध करणं हा संस्कृतिरक्षकांना मिळालेला कार्यक्रम बनला होता. काही राजकीय पक्षांनीही प्रेमाच्या अशा प्रकटीकरणाला मोडता घालण्यासाठी आंदोलनंही छेडली. पण आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, काटेच टोचतील या भीतीनं कुणाचं आंदोलन या गुलाबाला हात घालायला धजावलेलं नाही. त्याचं मुख्य इंगित सामाजिक स्थित्यंतरातच दडलेलं आहे. प्यार किया तो डरना क्या, असं दबक्या आवाजात गुणगुणणारी पिढी चाळिशीत पोहोचली तोवर त्यानंतरची पिढी तू तू तू तूतू तारा...म्हणू लागली होती. अगदी बॉलिवूडमध्येदेखील प्रेमाच्या आराधनेसाठी माडा-पोफळींच्या बगिच्यांची गरज संपली होती.‘मेरे जीवन साथी, प्यार किए जा...चे सूर आळवायला सिनेमात लिफ्टमधली जागासुद्धा पुरायला लागली होती. आताची डिजिटल पिढी त्याहूनही वेगळी आहे. ती एका अर्थानं व्हर्च्युअल आहे. या पिढीनं मुंबईला प्रेमाच्या विश्वामित्री जगाचं दर्शन घडवलंय. यांना गुडघ्यावर बसून गुलाबाचं फूल वगैरे देत प्रेमाचा इजहार करावा लागत नाही. कोणे एके काळी प्रेमात पडल्याची शाब्दिक अभिव्यक्ती चपलेच्या माराला निमंत्रण देण्याची क्षमता ठेवायची. आताच्या पिढीनं ही शक्यता डिलीटच करून टाकली आहे. कारण सोशल मीडियावर स्माइली आणि इमोजीच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवत प्रेमभावनेला वाट करून देण्याचा व्हर्च्युअल मार्ग या पिढीनं अनुसरला आहे. प्रेम ही काही और चीज आहे. व्हर्च्युअल अवतारातून जे काही साकारतं ते बव्हंशी डेटिंग वा कोर्टिंगच्या अंगानं जातं, याचं भानही या पिढीला असल्याचं जाणवतं. म्हणूनच तर यांच्या व्हॅलेण्टाइन्सचा व्हर्च्युअल अवतार भिन्न जातकुळीतला आहे. यांचं गुंतणं जसं साजरं होतं तसंच ब्रेकअपही ! अभिव्यक्ती एव्हाना धीट झाली आहे. आता प्रेम व्यक्त करताना ना अंगाला हात लावायचा असतो, ना डोळा मारायचा असतो. प्रपोज करायला एक व्हॉट््सअ‍ॅप पुरतो आणि ब्रेकअप सेलिब्रेट करायला कोल्ड कॉफी पुरते. सारं काही विशिष्ट दिवशीच करायला हवं असा त्यांचा हट्ट नाही. ही पिढी परिपक्व असल्याचा अनुभव मुंबई पदोपदी घेत आहे. तूर्तास आधीच्या पिढीनं नाकं मुरडण्यापेक्षा...गालिबला करी ही बेकाम प्रेमव्याधीआम्ही तरुण होतो याच्या बरेच आधी...या कुसुमाग्रजांच्या शब्दांत व्यक्त होऊन मोकळं व्हावं की!- चंद्रशेखर कुलकर्णी