शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही तरुण होतो याच्या बरेच आधी

By admin | Updated: February 12, 2017 23:51 IST

इश्क ने गालिब को निकम्मा कर दिया वरना हम भी आदमी थे काम के ...

इश्क ने गालिब को निकम्मा कर दियावरना हम भी आदमी थे काम के ...मिर्झा गालिबनं कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला हा शेर गळी उतरता उतरता या जित्या जागत्या शहरातील दोन पिढ्या कधी सरल्या हे कळलंच नाही. अहोरात्र जागं राहण्याची सवय जडलेली ही महानगरी म्हणजे सांस्कृतिक बदलाच्या मोजमापाची अचूक पट्टीच म्हणा, ना! काळानुरूप बदलणं हा बहुसंख्य मुंबईकरांचा स्वभाव आहे. म्हणूनही असेल, कदाचित.....नव्या पिढीनं गालिबची प्रेम भावना स्वीकारली पण त्याचा इजहार बदलला. आपण व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करायचा, की वसंत पंचमीची कास सोडायची नाही, या संभ्रमात काही पिढ्या सरल्या. प्रेमाचा इजहार हा चार हात लांब राहून अर्थात सुरक्षित अंतर ठेवून केवळ नजरेनं करायचा, या खोलवर रूजलेल्या पाळामुळांना फुटलेल्या पारंब्या सर्वस्वी वेगळ्या आहेत. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे... या सारखा फक्त भावगर्भ आशयातून व्यक्त होण्याचा काळ गडप झाला आहे. लांब काडीचं गुलाबाचं फूल नाकासमोर धरून माझी होशील का, असं धिटाईनं विचारणारी आधीची पिढीसुद्धा आता पुढ्यातल्या मोबाइलमध्ये नाक खुपसून बसू लागली आहे. इतकंच कशाला, १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेण्टाइन्स डे च्या आसपास दादरच्या फुलबाजारात जितक्या गुलाब कळ्यांचा उठाव होतो, त्यापेक्षा कैकपटीनं जास्त गुलाब कळ्या सोशल मीडियाच्या कुंडीतून या मोबाइलमधून त्या मोबाइलमध्ये जात असतात. मायानगरी मुंबई हीच या स्थित्यंतराची जननी आहे. त्यातूनच ‘व्हॅलेण्टाइन्स डे’चं आपल्याकडे आलेलं लोण गेल्या दोन दशकांच्या प्रवासानंतर बऱ्यापैकी स्थिरावलंय. मध्यंतरीच्या काळात व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करण्याला विरोध करणं हा संस्कृतिरक्षकांना मिळालेला कार्यक्रम बनला होता. काही राजकीय पक्षांनीही प्रेमाच्या अशा प्रकटीकरणाला मोडता घालण्यासाठी आंदोलनंही छेडली. पण आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, काटेच टोचतील या भीतीनं कुणाचं आंदोलन या गुलाबाला हात घालायला धजावलेलं नाही. त्याचं मुख्य इंगित सामाजिक स्थित्यंतरातच दडलेलं आहे. प्यार किया तो डरना क्या, असं दबक्या आवाजात गुणगुणणारी पिढी चाळिशीत पोहोचली तोवर त्यानंतरची पिढी तू तू तू तूतू तारा...म्हणू लागली होती. अगदी बॉलिवूडमध्येदेखील प्रेमाच्या आराधनेसाठी माडा-पोफळींच्या बगिच्यांची गरज संपली होती.‘मेरे जीवन साथी, प्यार किए जा...चे सूर आळवायला सिनेमात लिफ्टमधली जागासुद्धा पुरायला लागली होती. आताची डिजिटल पिढी त्याहूनही वेगळी आहे. ती एका अर्थानं व्हर्च्युअल आहे. या पिढीनं मुंबईला प्रेमाच्या विश्वामित्री जगाचं दर्शन घडवलंय. यांना गुडघ्यावर बसून गुलाबाचं फूल वगैरे देत प्रेमाचा इजहार करावा लागत नाही. कोणे एके काळी प्रेमात पडल्याची शाब्दिक अभिव्यक्ती चपलेच्या माराला निमंत्रण देण्याची क्षमता ठेवायची. आताच्या पिढीनं ही शक्यता डिलीटच करून टाकली आहे. कारण सोशल मीडियावर स्माइली आणि इमोजीच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवत प्रेमभावनेला वाट करून देण्याचा व्हर्च्युअल मार्ग या पिढीनं अनुसरला आहे. प्रेम ही काही और चीज आहे. व्हर्च्युअल अवतारातून जे काही साकारतं ते बव्हंशी डेटिंग वा कोर्टिंगच्या अंगानं जातं, याचं भानही या पिढीला असल्याचं जाणवतं. म्हणूनच तर यांच्या व्हॅलेण्टाइन्सचा व्हर्च्युअल अवतार भिन्न जातकुळीतला आहे. यांचं गुंतणं जसं साजरं होतं तसंच ब्रेकअपही ! अभिव्यक्ती एव्हाना धीट झाली आहे. आता प्रेम व्यक्त करताना ना अंगाला हात लावायचा असतो, ना डोळा मारायचा असतो. प्रपोज करायला एक व्हॉट््सअ‍ॅप पुरतो आणि ब्रेकअप सेलिब्रेट करायला कोल्ड कॉफी पुरते. सारं काही विशिष्ट दिवशीच करायला हवं असा त्यांचा हट्ट नाही. ही पिढी परिपक्व असल्याचा अनुभव मुंबई पदोपदी घेत आहे. तूर्तास आधीच्या पिढीनं नाकं मुरडण्यापेक्षा...गालिबला करी ही बेकाम प्रेमव्याधीआम्ही तरुण होतो याच्या बरेच आधी...या कुसुमाग्रजांच्या शब्दांत व्यक्त होऊन मोकळं व्हावं की!- चंद्रशेखर कुलकर्णी