शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तापमानाच्या वाढीमुळे आले गारपीट संकट!

By admin | Updated: December 21, 2014 00:19 IST

गतवर्षीचा उन्हाळा हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला. सप्टेंबर २०१३ सालापासून दक्षिण गोलार्ध भाजून निघाला.

गतवर्षीचा उन्हाळा हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला. सप्टेंबर २०१३ सालापासून दक्षिण गोलार्ध भाजून निघाला. अर्जेंटिना आणि आॅस्टे्रलियात काही ठिकाणी तापमान ५५ अंशावर पोहोचले. वर्षभरात वादळ, हिमवृष्टी, अवर्षण, अतिवृष्टी, हिमनग कोसळणे, हिमनद्या वितळणे इत्यादी घटना घडल्या. यामुळे वर्षभरात पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ झाली. गेल्या काही दिवसांत राज्यात झालेली गारपीट हा अतिरिक्त बाष्पीभवनाचा म्हणजेच तापमानवाढीचा स्पष्ट परिणाम आहे.हासागरातील प्रवाहाची दिशा बदलल्याने धुव्रावरील बर्फाला गरम पाणी अधिक वेगाने वितळवत आहे. त्यामुळे सागर पातळीत होणाऱ्या वाढीने अधिक वेग घेतला आहे. अंटार्क्टिकावरील बर्फाची तसेच महासागरातील पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफ झाली. ही प्रचंड प्रमाणात झालेली वाफ पृथ्वीच्या वातावरणात अति उंचीपर्यंत साठत गेली. त्यामुळे पृथ्वीच्या अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी झाली. युरोपात अनेक ठिकाणी गारा पडल्या. गेल्या काही दिवसांत राज्यात झालेली गारपीट हा अतिरिक्त बाष्पीभवनाचा म्हणजेच तापमानवाढीचा स्पष्ट परिणाम आहे.२०१३ रोजी पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनने ४०० पीपीएम (दर दशलक्ष भागातील प्रमाण) ही धोक्याची पातळी गाठली. त्यानंतरच्या वर्षभरात वादळ, हिमवृष्टी, अवर्षण, अतिवृष्टी, हिमनग कोसळणे, हिमनद्या वितळणे इत्यादी घटना घडल्या. ३० मार्च २०१४ रोजी आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाचा पाचवा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला. जगातील सर्व देशांना धोरणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या या अहवालात तापमानवाढ अनियंत्रित होण्याच्या प्रक्रियेतून आपण जात असल्याची जाणीव करून देऊन, मानव जातीच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली गेली. यापूर्वी नोव्हेंबर २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या नासाचे संचालक डॉ. जेम्स हॅनसेन यांच्या ‘स्टॉर्म्स आॅफ माय ग्रँडचिल्ड्रन’ या ग्रंथात कार्बन वाढीची सध्याची गती वर्षाला दोन पीपीएम (एक पीपीएम म्हणजे तीनशे कोटी टन) अशी महाविस्फोटक असून, ४२० पीपीएम ही पातळी गाठण्याच्या काळात तापमानवाढ अनियंत्रित होऊ शकते, असा धोक्याचा इशारा दिला. येती ९ ते १० वर्षे ही मानवजातीला वाचविण्याची शेवटची संधी असल्याचे आणि या शतकात पृथ्वीवरील सर्व जीवन नष्ट होण्याची शक्यता असल्याचे डॉ. हॅनसेन नमूद करतात. महाराष्ट्रात गेल्यावर्षी गारपीट झाली, तशी या वर्षीही झाली. यावर काही तज्ज्ञांनी हिमयुग येत असल्याचे हटले. हे चुकीचे आहे. गतवर्षीचा उन्हाळा हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला. सप्टेंबर २०१३ सालापासून दक्षिण गोलार्ध भाजून निघाला. अर्जेंटिना व आॅस्टे्रलियात काही ठिकाणी तापमान ५५ अंशावर पोहोचले. दक्षिण धुव्रावरील म्हणजे अंटाकर््िटावरील शेकडो घनकिलोमीटर बर्फ वितळून महासागरात गेले. इंग्लडमधील न्यू कॅसल विद्यापीठाच्या भू-गर्भविषयक विभागाच्या अभ्यासाप्रमाणे अंटाकर््िटाकाचे भूकवच वरील बर्फाचे वजन कमी होत गेल्याने गेल्या २० वर्षांत दरवर्षी १५ मि़मी़ या गतीने वर उचलले जात आहे. पृथ्वीच्या घडणीतही तापमानवाढीमुळे बदल होत असल्याचे या संस्थेने नमूद केले आहे. (लेखक पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)1 भारत सरकारचे अतिरिक्त सचिव प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय चमूने राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. या चमूशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून, २०१२ पेक्षा दुपटीने गावे बाधित झाली आहेत ही जाणीव त्यांना करून दिली.2 अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे राज्यात सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ८२ तालुके व ८९३ गावे बाधित झाली. जिरायत शेतीसाठी पूर्वी ४,५०० रुपये प्रति हेक्टर बाधितांना मदत म्हणून दिली जात होती. त्यात ५,५०० रुपयांची विशेष मदत मिळून १० हजार प्रति हेक्टर इतकी देण्यात येणार आहे.3 बागायती पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीची ९ हजार रुपये आणि आता ६ हजार रुपये विशेष मदत मिळून १५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत तर फळपिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीची १२ हजार अधिक विशेष मदत १३ हजार मिळून २५ हजार प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.4 सध्या मंडळ स्तरावर हवामान केंद्र असून, आता त्याऐवजी फळबाग क्षेत्रात मंडळपेक्षा कमी अंतरावर शक्यतो गाव किंवा ग्रामपंचायत क्षेत्रावर हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यात २ हजार हवामानदर्शक यंत्रे लावण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून, ग्रामस्तरापर्यंत असे केंद्र स्थापन करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार सुरू आहे.- गिरीश राऊत