शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

तापमानाच्या वाढीमुळे आले गारपीट संकट!

By admin | Updated: December 21, 2014 00:19 IST

गतवर्षीचा उन्हाळा हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला. सप्टेंबर २०१३ सालापासून दक्षिण गोलार्ध भाजून निघाला.

गतवर्षीचा उन्हाळा हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला. सप्टेंबर २०१३ सालापासून दक्षिण गोलार्ध भाजून निघाला. अर्जेंटिना आणि आॅस्टे्रलियात काही ठिकाणी तापमान ५५ अंशावर पोहोचले. वर्षभरात वादळ, हिमवृष्टी, अवर्षण, अतिवृष्टी, हिमनग कोसळणे, हिमनद्या वितळणे इत्यादी घटना घडल्या. यामुळे वर्षभरात पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ झाली. गेल्या काही दिवसांत राज्यात झालेली गारपीट हा अतिरिक्त बाष्पीभवनाचा म्हणजेच तापमानवाढीचा स्पष्ट परिणाम आहे.हासागरातील प्रवाहाची दिशा बदलल्याने धुव्रावरील बर्फाला गरम पाणी अधिक वेगाने वितळवत आहे. त्यामुळे सागर पातळीत होणाऱ्या वाढीने अधिक वेग घेतला आहे. अंटार्क्टिकावरील बर्फाची तसेच महासागरातील पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफ झाली. ही प्रचंड प्रमाणात झालेली वाफ पृथ्वीच्या वातावरणात अति उंचीपर्यंत साठत गेली. त्यामुळे पृथ्वीच्या अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी झाली. युरोपात अनेक ठिकाणी गारा पडल्या. गेल्या काही दिवसांत राज्यात झालेली गारपीट हा अतिरिक्त बाष्पीभवनाचा म्हणजेच तापमानवाढीचा स्पष्ट परिणाम आहे.२०१३ रोजी पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनने ४०० पीपीएम (दर दशलक्ष भागातील प्रमाण) ही धोक्याची पातळी गाठली. त्यानंतरच्या वर्षभरात वादळ, हिमवृष्टी, अवर्षण, अतिवृष्टी, हिमनग कोसळणे, हिमनद्या वितळणे इत्यादी घटना घडल्या. ३० मार्च २०१४ रोजी आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाचा पाचवा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला. जगातील सर्व देशांना धोरणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या या अहवालात तापमानवाढ अनियंत्रित होण्याच्या प्रक्रियेतून आपण जात असल्याची जाणीव करून देऊन, मानव जातीच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली गेली. यापूर्वी नोव्हेंबर २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या नासाचे संचालक डॉ. जेम्स हॅनसेन यांच्या ‘स्टॉर्म्स आॅफ माय ग्रँडचिल्ड्रन’ या ग्रंथात कार्बन वाढीची सध्याची गती वर्षाला दोन पीपीएम (एक पीपीएम म्हणजे तीनशे कोटी टन) अशी महाविस्फोटक असून, ४२० पीपीएम ही पातळी गाठण्याच्या काळात तापमानवाढ अनियंत्रित होऊ शकते, असा धोक्याचा इशारा दिला. येती ९ ते १० वर्षे ही मानवजातीला वाचविण्याची शेवटची संधी असल्याचे आणि या शतकात पृथ्वीवरील सर्व जीवन नष्ट होण्याची शक्यता असल्याचे डॉ. हॅनसेन नमूद करतात. महाराष्ट्रात गेल्यावर्षी गारपीट झाली, तशी या वर्षीही झाली. यावर काही तज्ज्ञांनी हिमयुग येत असल्याचे हटले. हे चुकीचे आहे. गतवर्षीचा उन्हाळा हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला. सप्टेंबर २०१३ सालापासून दक्षिण गोलार्ध भाजून निघाला. अर्जेंटिना व आॅस्टे्रलियात काही ठिकाणी तापमान ५५ अंशावर पोहोचले. दक्षिण धुव्रावरील म्हणजे अंटाकर््िटावरील शेकडो घनकिलोमीटर बर्फ वितळून महासागरात गेले. इंग्लडमधील न्यू कॅसल विद्यापीठाच्या भू-गर्भविषयक विभागाच्या अभ्यासाप्रमाणे अंटाकर््िटाकाचे भूकवच वरील बर्फाचे वजन कमी होत गेल्याने गेल्या २० वर्षांत दरवर्षी १५ मि़मी़ या गतीने वर उचलले जात आहे. पृथ्वीच्या घडणीतही तापमानवाढीमुळे बदल होत असल्याचे या संस्थेने नमूद केले आहे. (लेखक पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)1 भारत सरकारचे अतिरिक्त सचिव प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय चमूने राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. या चमूशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून, २०१२ पेक्षा दुपटीने गावे बाधित झाली आहेत ही जाणीव त्यांना करून दिली.2 अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे राज्यात सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ८२ तालुके व ८९३ गावे बाधित झाली. जिरायत शेतीसाठी पूर्वी ४,५०० रुपये प्रति हेक्टर बाधितांना मदत म्हणून दिली जात होती. त्यात ५,५०० रुपयांची विशेष मदत मिळून १० हजार प्रति हेक्टर इतकी देण्यात येणार आहे.3 बागायती पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीची ९ हजार रुपये आणि आता ६ हजार रुपये विशेष मदत मिळून १५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत तर फळपिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीची १२ हजार अधिक विशेष मदत १३ हजार मिळून २५ हजार प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.4 सध्या मंडळ स्तरावर हवामान केंद्र असून, आता त्याऐवजी फळबाग क्षेत्रात मंडळपेक्षा कमी अंतरावर शक्यतो गाव किंवा ग्रामपंचायत क्षेत्रावर हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यात २ हजार हवामानदर्शक यंत्रे लावण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून, ग्रामस्तरापर्यंत असे केंद्र स्थापन करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार सुरू आहे.- गिरीश राऊत