शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

गुरू तुमच्या दैवाला पार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:32 IST

योद्ध्याला जसं रणांगणावरच मरण यावं असं वाटतं तसंच वारकरी संप्रदायातील पायिकांना पंढरीच्या वाटेवर किंवा एकादशी दिवशी किंवा हरिनाम घेता घेता मरण यावं असंच वाटतं. तसंच भाग्य वारकरी संप्रदायातील एक ८० वर्षांचे पायिक गुरू तुकाराम बुवा काळे यांच्या नशिबी आले.

-बाळासाहेब बोचरेअंतकाळी ज्याच्या,नाम आले मुखा !तुका म्हणे सुखा पार नाही. !!गुरू तुकाराम काळे बुवा यांचे माघी एकादशीला वैकुंठगमन झाले. त्यासाठी त्यांनी हयातभर केलेली तपश्चर्या अन् त्याग वारकरी संप्रदायामध्ये निश्चितच आदरास्थानी होता. असं मरण म्हणजे वारकरी फार भाग्याचे समजतात. त्यासाठी मोठी तपश्चर्याही करावी लागते. अन् आचरणही निष्पाप असावं लागतं. शिरोळ (जि. कोल्हापूर) येथे जन्मलेले तुकाराम बुवा हे आजरेकर फडाचे गुरू होते. या फडाचे प्रमुख आणि संस्थापक बाबासाहेब आजरेकर हे माऊलींचा सोहळा सुरू झाला तेव्हाच्या प्रमुखांपैकी एक होते. आजरेकर फडांची दिंडी ही माऊलींच्या सोहळ्यात रथामागे सातव्या क्रमांकावर चालते. वर्षभर कीर्तन व हरिनाम सप्ताह अन् वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यामध्ये आघाडीवर असलेला हा फड केवळ गुरू परंपरेवर चालतो. श्रद्धा, सेवा, निष्ठा, परंपरा अािण गुरू आज्ञेचे पालन ही या फडाची वैशिष्ट्ये आहेत. फडाच्या गुरूची निवड ही लोकशाही पद्धतीने केली जाते. ३१ वर्षांपूर्वी गुरू या मानाच्या स्थानी तुकाराम बुवा यांची लोकशाही पद्धतीने निवड झाली होती. आजरेकर फड हा देशमुख घराण्यातील असला तरी या फडाचे आजवरचे गुरू हे विविध जातीचे होते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात दररोज सायंकाळी या फडाकडून माऊलींसाठी दूध आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दिला जातो. या फडावरील वारकरी कधीच कांदा, लसूण खात नाहीत. जेवणानंतर पान मात्र आवर्जून खातात. परंपरा सांभाळणे आणि नियमावर लक्ष ठेवणे हे गुरूंचे काम. आजरेकर फडामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली परिसरासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भाविक असतात. या फडाला माऊलींच्या सोहळ्यात जागर व कीर्तनाचा मान आहे. हा फड केवळ माऊलींच्या अभंगावरच कीर्तन करतो. वर्षभर तीन राज्यांतील हरिनाम सप्ताहाचे दौरे करणे, फड सांभाळणे, परंपरा जपणे आणि सर्वांना समजून घेणे हे मोठे आव्हान असते. पण गुरू तुकाराम बुवांनी ते आपल्या आचरणातून ३१ वर्षे लीलया सांभाळले. शुद्ध आचरणाचे वारकरी तयार करणे हेच काम काळेबुवांनी केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशताब्दी महोत्सवात या फडाने वर्षभर माऊलींसमोर अखंड हरिनाम जप केला. त्यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची त्रिशतकोत्तर शताब्दी आणि त्यानंतर संत नामदेव महाराजांची सप्तशताब्दी यानिमित्ताने सलग तीन वर्षे या फडाचा हरिनाम सप्ताह आळंदीमध्ये चालला. एकाच फडाने केलेली ही सेवा हा या फडाचा लौकिक वाढवणारीच आहे. आजच्या पिढीला संप्रदायाची गोडी लावणे आणि ती जपणे, अखंडित ठेवणे हे मोठे आव्हान असताना तुकाराम बुवांनी ते आव्हान पेलले. एकदा बायपास सर्जरी झाली तरी त्याचा त्यांनी आपल्या धावपळीवर कधीच परिणाम दिसू दिला नाही. धावत्या युगाला तुकाराम बुवांची महती कळण्यापलीकडची असली तरी संप्रदायामध्ये त्यांचे गुरू हे स्थान त्यांनी आदरस्थानी ठेवले. माघी एकादशीला कीर्तन सेवा संपवून महाराज बसले अन् पांडुरंगाचं बोलावणं आलं असंच झालं. आणि हा परमात्मा वैकुंठवासी झाला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र