शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ येणार!

By admin | Updated: July 28, 2016 04:22 IST

देशातील नानाविध अप्रत्यक्ष करांचे समांगीकरण करुन एकच एक ‘जीएसटी’ (गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) म्हणजे वस्तू आणि सेवाकर देशभरात सर्वत्र लागू करण्याच्या मार्गातील महत्वाची

देशातील नानाविध अप्रत्यक्ष करांचे समांगीकरण करुन एकच एक ‘जीएसटी’ (गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) म्हणजे वस्तू आणि सेवाकर देशभरात सर्वत्र लागू करण्याच्या मार्गातील महत्वाची अडचण दूर झाल्याने लवकरच हा कर अंमलात आणण्याचा मार्ग प्रशस्त होईल अशी चिन्हे आहेत. ‘जीएसटी’ लागू करण्यासाठी आधी राज्यघटनेत सुधारणा करावी लागेल आणि त्यानंतर या कराचा कायदा संमत करावा लागेल. त्यानुसार लोकसभेने घटना दुरुस्ती मंजूर केली होती पण राज्यसभेने ती मंजूर केली नव्हती. लोकसभेत भाजपा-रालोआ यांचे बहुमत आहे तर राज्यसभेत ते अल्पमतात असून तिथे काँग्रेसच्या मर्जीला महत्व आहे. जीएसटी लागू करताना कराचा दर कमाल १८ टक्क््यांवर नक्की कराव आणि थेट राज्यघटनेतच तसे नमूद करुन ठेवावे हा काँग्रेसचा आग्रह होता. त्याशिवायही काँग्रेसचे आणखी काही मुद्दे होते पण त्यातील काहींवर चर्चेअंती एकवाक्यता निर्माण झाली होती. पण १८ टक्क््यांच्या कमाल मर्यादेवर काँग्रेस अडून बसली होती. परंतु कालांतराने कर आकारणीचा दर १८ टक्क््यांपेक्षा अधिक करण्याची गरज सरकारला जाणवली तर प्रत्येक वेळी घटना दुरुस्तीचा मार्ग चोखाळावा लागेल आणि कोणतीही घटना दुरुस्ती दोन तृतीयांश बहुमत पाठीशी असेल तरच मंजूर होत असल्याने ही बाब अडचणीची ठरु शकते. सबब घटना दुरुस्तीद्वारे थेट घटनेमध्येच कर आकारणीची कमाल मर्यादा निश्चित करुन ठेवण्याऐवजी या नव्या करासाठी जो कायदा संसदेला संमत करावा लागणार आहे त्यात ती तरतूद करावी म्हणजे पुढे मागे गरज भासली तर साध्या बहुमताने कायद्यात बदल करता येऊ शकतील असा भाजपाचा आग्रह होता. दोन टोकाच्या भिन्न मतांमुळे जवळजवळ दोन वर्षे संबंधित घटना दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. दोन्ही बाजू आपला आग्रह सोडण्यास राजी नव्हत्या. दरम्यानच्या काळात दोन महत्वाचे बदल झाले. राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीनंतर राज्यसभेतील काँग्रेसचे मताधिक्य घटून भाजपाचे वाढले. पण त्याहूनही महत्वाची अशी आणखी एक बाब घडून आली. जी राज्ये राजकीयदृष्ट्या भाजपाच्या विरोधातली आहेत अशा राज्यांनाही जीएसटी लागू करण्याची ओढ आणि घाई लागल्याचे प्रगट होऊ लागले. परिणामी राज्यसभेतील काँग्रेसचा विरोध निरंक ठरण्याची लक्षणे दिसू लागली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत किमान १८ टक्क््यांच्या कमाल मर्यादेबाबतचा सरकारचा दृष्टीकोन स्वीकारण्यास काँग्रेस राजी झाली. यात म्हटले तर दोन्ही पक्षांची सरशी झाली. कमाल मर्यादा नक्की करण्याचा काँग्रेसचा आग्रह सरकारने मान्य केला आणि ही मर्यादा घटनेत नव्हे तर कायद्यात समाविष्ट करण्याचा सरकारचा तोडगा काँग्रेसने स्वीकारला. याशिवाय नवा कर लागू झाल्यापासून पाच वर्षेपर्यंत केन्द्र सरकारने राज्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई करावी हा राज्यांचा आग्रह केन्द्र सरकारने स्वीकारला. शिवाय ज्या उद्योगांची वार्षिक उलाढाल दीड कोटींच्या आत आहे त्यांच्यावर राज्य सरकारांचे पूर्ण तर त्यापेक्षा मोठ्या उद्योगांवर केन्द्र आणि राज्य या दोहोंचे नियंत्रण राहील ही मागणीदेखील मान्य केली गेली. हे ज्या सहजतेने घडून आले ते पाहू जाता उभय बाजू अकारण अडून बसल्या होत्या असा निष्कर्ष काढल्यास तो चुकीचा ठरु नये.