शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ लटकणार

By admin | Updated: May 10, 2016 02:34 IST

मोदी सरकार जसे केंद्रात सत्तेवर आले तसे संसदेचे कामकाज सुरळीतणे सुरू नाही. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी आणि त्यातून मार्ग निघावा

मोदी सरकार जसे केंद्रात सत्तेवर आले तसे संसदेचे कामकाज सुरळीतणे सुरू नाही. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी आणि त्यातून मार्ग निघावा, यासाठीच संसद नावाच्या सभागृहात लोकप्रतिनिधी एकत्र येतात की, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदे करण्यासाठी असलेले हे लोकशाहीचे पवित्र मंदिर व्यवस्थितपणे चालविणे, ही देशातील प्रमुख पक्षांची विशेषत: भाजपा आणि काँग्रेसची जबाबदारी आहे; पण ही जबाबदारी दोन्ही पक्ष पार पाडताना दिसून येत नाहीत. देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यासाठीचे घटना दुरुस्ती विधेयकाने लटकायचे तरी किती दिवस? जनतेने या बहुचर्चित कराची आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची? हे सवाल संसदेचे प्रत्येक अधिवेशन संपताना सातत्याने उपस्थित होत आहेत. भारत देश इतका विस्तीर्ण आहे की, त्याच्या कोणत्या कोणत्या प्रांतामध्ये दुर्दैवी घटना घडत असतात. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संघटनांची आंदोलने होतात त्यांना कधी हिंसक स्वरूप प्राप्त होत असते. भ्रष्टाचाराची प्रकरणे उपस्थित होत असतात. या साऱ्यांसंदर्भात कृती, कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशात आहेत; पण तरीही त्या कधी लोकसभेत, तर कधी राज्यसभेत उपस्थित करून गोंधळ घातला जातो अन् संसदेच्या अधिवेशनावर पाणी फेरले जाते. यामुळेच लोकसभेत पारीत झालेले ‘जीएसटी’ विधेयक राज्यसभेत लटकले जात आहे. राज्यसभेत सरकार बहुमतात नसल्यामुळेही हे घडत आहे; पण या स्थितीत केवळ जनतेच्या हिताचा विचार करून विरोधी पक्षाने अशी महत्त्वपूर्ण विधेयके पारीत होण्याला सरकारला मदत करणे अपेक्षित असते; पण कुरघोडीच्या राजकारणामुळे तसे होत नाही. गत अधिवेशनांमध्ये असहिष्णुता, रोहित वेमुला आत्महत्त्या प्रकरण, ‘जेएनयू’मधील घडामोडी आणि जाट आरक्षण आंदोलनामुळे विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही. आता आॅगस्ट वेस्टलॅण्डच्या प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात रणकंदन सुरू आहे. त्यामुळे याही अधिवेशनात ‘जीएसटी’ लटकणार हे निश्चित आहे. खरं म्हणजे देशातील ग्राहक आणि व्यापाऱ्यांना राज्य आणि केंद्राच्या विविध करांच्या किचकटपणातून सुटका करणारे आणि उत्पादन, विक्री, वापर आणि सेवा या टप्प्यांवर देशव्यापी एकाच करप्रणालीचा मार्ग प्रशस्त करणारे हे विधेयक लवकरात लवकर पारीत होण्यासाठी राजकीय पक्षांनी व सरकारने गंभीर झाले पाहिजे कारण जनतेच्या संयमालाही मर्यादा असतात.