शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

‘जीएसटी’ लटकणार

By admin | Updated: May 10, 2016 02:34 IST

मोदी सरकार जसे केंद्रात सत्तेवर आले तसे संसदेचे कामकाज सुरळीतणे सुरू नाही. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी आणि त्यातून मार्ग निघावा

मोदी सरकार जसे केंद्रात सत्तेवर आले तसे संसदेचे कामकाज सुरळीतणे सुरू नाही. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी आणि त्यातून मार्ग निघावा, यासाठीच संसद नावाच्या सभागृहात लोकप्रतिनिधी एकत्र येतात की, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदे करण्यासाठी असलेले हे लोकशाहीचे पवित्र मंदिर व्यवस्थितपणे चालविणे, ही देशातील प्रमुख पक्षांची विशेषत: भाजपा आणि काँग्रेसची जबाबदारी आहे; पण ही जबाबदारी दोन्ही पक्ष पार पाडताना दिसून येत नाहीत. देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यासाठीचे घटना दुरुस्ती विधेयकाने लटकायचे तरी किती दिवस? जनतेने या बहुचर्चित कराची आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची? हे सवाल संसदेचे प्रत्येक अधिवेशन संपताना सातत्याने उपस्थित होत आहेत. भारत देश इतका विस्तीर्ण आहे की, त्याच्या कोणत्या कोणत्या प्रांतामध्ये दुर्दैवी घटना घडत असतात. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संघटनांची आंदोलने होतात त्यांना कधी हिंसक स्वरूप प्राप्त होत असते. भ्रष्टाचाराची प्रकरणे उपस्थित होत असतात. या साऱ्यांसंदर्भात कृती, कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशात आहेत; पण तरीही त्या कधी लोकसभेत, तर कधी राज्यसभेत उपस्थित करून गोंधळ घातला जातो अन् संसदेच्या अधिवेशनावर पाणी फेरले जाते. यामुळेच लोकसभेत पारीत झालेले ‘जीएसटी’ विधेयक राज्यसभेत लटकले जात आहे. राज्यसभेत सरकार बहुमतात नसल्यामुळेही हे घडत आहे; पण या स्थितीत केवळ जनतेच्या हिताचा विचार करून विरोधी पक्षाने अशी महत्त्वपूर्ण विधेयके पारीत होण्याला सरकारला मदत करणे अपेक्षित असते; पण कुरघोडीच्या राजकारणामुळे तसे होत नाही. गत अधिवेशनांमध्ये असहिष्णुता, रोहित वेमुला आत्महत्त्या प्रकरण, ‘जेएनयू’मधील घडामोडी आणि जाट आरक्षण आंदोलनामुळे विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही. आता आॅगस्ट वेस्टलॅण्डच्या प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात रणकंदन सुरू आहे. त्यामुळे याही अधिवेशनात ‘जीएसटी’ लटकणार हे निश्चित आहे. खरं म्हणजे देशातील ग्राहक आणि व्यापाऱ्यांना राज्य आणि केंद्राच्या विविध करांच्या किचकटपणातून सुटका करणारे आणि उत्पादन, विक्री, वापर आणि सेवा या टप्प्यांवर देशव्यापी एकाच करप्रणालीचा मार्ग प्रशस्त करणारे हे विधेयक लवकरात लवकर पारीत होण्यासाठी राजकीय पक्षांनी व सरकारने गंभीर झाले पाहिजे कारण जनतेच्या संयमालाही मर्यादा असतात.