शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पेटलेला ऊस आणि ठिबक

By admin | Updated: April 15, 2015 23:42 IST

राज्यात आजही ऊस पेटलेलाच आहे. ऊस आणि ऊसदर या चक्रातून ऊसकऱ्यांची सुटका कोण करणार? आता पीकपद्धतीत व्यवहार्य बदल आणि ठिबक सिंचन हाच पर्याय...

राज्यात आजही ऊस पेटलेलाच आहे. ऊस आणि ऊसदर या चक्रातून ऊसकऱ्यांची सुटका कोण करणार? आता पीकपद्धतीत व्यवहार्य बदल आणि ठिबक सिंचन हाच पर्याय...शासनदरबारात उसाच्या निर्धारित किमतीबद्दल चाललेला मुंबई-दिल्ली लपवाछपवीचा खेळ आणि शेतात उभा असलेला ऊस यांच्याकडे पाहत धास्तावलेला ऊसकरी आज भाव काही मिळायचा तो मिळो; पण आधी ऊसतोडणीला आपला नंबर लावण्याच्या धडपडीत दिसतो. उसाचे वाढत राहणारे क्षेत्र आणि साखरेच्या दराने टाकलेली मान, यामुळे साखर उद्योग आणि ऊसकरी शेतकरी यांचे अर्थकारण कोलमडले आहे. ही परिस्थिती पुढच्या वर्षीदेखील सुधारण्याची शक्यता दिसत नाही.साखर कारखानदारी आता सेवाभावी आणि शेतकरी कल्याणाचा विषय राहिला नाही. साखर उद्योग आता ‘प्रोफेशनल’ व्यापार बनला आहे. १९६०च्या दशकात स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी शेतकऱ्यांना उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेता-शेतांवर पायपीट केली. सिंचनाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पैसा पोहोचविला. उसाचे क्षेत्र वाढले; पण गुळाला भाव अधिक मिळतो म्हणून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उसाची गुऱ्हाळे थाटली. त्यामुळे कारखान्याला त्या हंगामात ऊस कमी पडला. त्या परिस्थितीत वसंतदादा शेतकऱ्यांवर नाराज झाले नाहीत, उलट कारखान्याला या हंगामात फटका बसला तरी हरकत नाही; पण माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे जास्तीचे मिळाले, यात मला आनंद आहे! कारखान्याचा तोटा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगला ऊसदर देतो, असे आज कोणता साखर कारखानदार म्हणणार आहे? काळ बदलला. आता ऊसकरी कारखान्यांच्या लेखी ‘रॉ मटिरियल’ पुरविणारा पुरवठादार बनला आहे. त्यामुळे नफ्या-तोट्याच्या गणितात जे उत्तर येईल तेच त्याला लागू पडणार. आता शेतकऱ्यांना आपली मनोभूमिका बदलण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. उसाचे क्षेत्र आणि उत्पादन घटले की ऊसकऱ्याचा भाव वाढतो अन् ऊस उत्पादन वाढले की त्याला ऊस वाळून जाण्याच्या धास्तीखाली रहावे लागते. हे सूत्र बदलण्याचा प्रयत्न कोण करणार? सरकार, कारखानदार, साखरेचे व्यापारी यांच्या साखर उद्योगाबद्दल बदललेल्या भूमिकांचे वास्तव स्वीकारूनच आपल्या भवितव्याची गणिते शेतकऱ्याला मांडावी लागणार आहेत. ते गणित मांडताना पाणी आणि व्यवहार याचे भान स्वत:लाच ठेवावे लागणार आहे. अवकाळी पाऊस असो वा नसो ऊसपीक प्रत्येकालाच सुरक्षित वाटते. त्या सुरक्षिततेतूनच आपण उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढविले व वाढवत आहोत. आता पीकपद्धती हा विषय केवळ व्यवहाराने हाताळण्याची वेळ आली आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी शंभर टक्के ठिबक सिंचन पद्धतीनेच वापरण्याचे बंधन घालण्याची तयारी सुरू केली आहे. पिकांसाठी मिळणाऱ्या कर्जासाठीही आता ठिबक सिंचनाचे बंधन घातले जात आहे. या सर्व बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावीच लागणार आहे. सोलापूर जिल्ह्याचेच उदाहरण घ्या, उजनी धरणासह जिल्ह्याला १५९ टीएमसी एवढे पाणी सिंचनासाठी दरवर्षी उपलब्ध होते. जिल्ह्यातील अकरा लाख हेक्टर्स क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यापैकी दोन लाख हेक्टर्स क्षेत्रावर ऊस आहे. त्यापैकी केवळ पंचवीस हजार हेक्टर्स क्षेत्रावरच ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब होतो. उजनीतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे एक आवर्तन सोळा टीएमसी पाण्याचे असते, म्हणजे जवळजवळ एखाद्या धरणाएवढेच पाणी म्हणा ना! प्रवाही पद्धतीने दिल्या जाणाऱ्या पाण्यामुळे तिप्पट पाणी वापरावे लागते. ठिबक सिंचनाचा वापर झाल्यास पाण्याचा अपव्यय टळून पीकपद्धतीतही नवे प्रयोग करता येतील. हाच कृतिशील विचार पेटलेल्या उसावर व्यावहारीक उपाय ठरू शकतो.- राजा माने