शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

भव्य पांढरी म्हातारी

By admin | Updated: February 16, 2017 23:54 IST

भारतीय रस्त्यांवरची अ‍ॅम्बी असं तिचं भारतातल्या ‘एलीट’ क्लासमधलं एकेकाळचं नाव. ती फक्त कार नव्हती तर व्हीआयपी असण्याची,

भारतीय रस्त्यांवरची अ‍ॅम्बी असं तिचं भारतातल्या ‘एलीट’ क्लासमधलं एकेकाळचं नाव. ती फक्त कार नव्हती तर व्हीआयपी असण्याची, सत्तेची, सत्ताकेंद्राजवळच्या वऱ्हांड्यातल्या लगबगीची आणि एकेकाळच्या भारतीय महत्त्वाकांक्षांची सर्वंकष ओळख होती. पंतप्रधान, मंत्री, व्हीआयपी राजकारणी ते बडे शासकीय अधिकारी या साऱ्यांच्या लाल/नारंगी दिव्याच्या आकांक्षेचं एक रूप म्हणून ती मिरवली. अनेकांनी आपल्या दारासमोर ही पांढरी कार उभी करण्याची स्वप्नंही खरी करून दाखवली. ग्रॅण्ड ओल्ड लेडी आॅफ इंडियन रोड्स म्हणून तिचा गौरव अजूनही होतोच. देशाच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९४८मध्ये अ‍ॅम्बेसेडरचं उत्पादन सुरू झालं. ब्रिटिश मोरीस आॅक्सफोर्ड थ्री वरून बेतलेलं हे मॉडेल. तिनं स्वत:च्या दारात चारचाकी उभं करण्याचं स्वप्न ज्या काळात भारतीयांना दिलं तेव्हा ते या देशात बहुसंख्यांच्या आवाक्यात नव्हतं. ६० ते ८०च्या लालफितीत करकचून गेलेल्या दशकांत अ‍ॅम्बेसेडरची मागणी मोठी होती. मात्र ऐंशीच्या दशकाच्या मध्यात मारुती सुझुकी ८०० रस्त्यावर आली आणि चारचाकीचं स्वप्न अनेकांच्या आवाक्यात आलं. ९०च्या, उदारीकरणाचं वारं शिरल्यानंतर तर चारचाक्यांच्या बाजारपेठेचं समीकरणं वेगानं बदललं. इतकं वेगानं की २००० नंतरच्या गेल्या सुमारे दीड दशकांत चारचाकी वाहनं घेणारे, त्यांचं वय, मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गाच्या हाती आलेली नवीन क्रयशक्ती हे सारं बदलत्या भारताची कहाणीच सांगू लागलं. मात्र या साऱ्यातही पांढऱ्या अ‍ॅम्बेसेडरनं आपला रुतबा कायम ठेवला होता. पण तीन वर्षांपूर्वी या गाडीचं उत्पादन बंद झालं. आणि आता तर हिंदुस्थान मोटर्सनं तो ब्रॅण्डही फक्त ८० कोटी रुपयांना ट्रेडमार्कसह फ्यूजो नावाच्या फ्रेंच कंपनीला विकून टाकला. अ‍ॅम्बेसेडरच्या आठवणीत गतकाळाचे उमाळे अनेकांना आता दाटूनही येतील. ते येण्यात गैरही काही नाही. कारण अनेकांनी आपल्या सुबत्तेचं आणि सत्तेचं प्रतीक म्हणून ही कार अनेक वर्षे मिरवली आहे. मात्र एक नक्की, देश किती वेगानं बदलला, महत्त्वाकांक्षांची प्रतीकं, तिचे रंग, आकार-उकार आणि त्या महत्त्वाकांक्षांसाठी राबणारे हात, त्या वर्गाच्या हातातला पैसा हे सारं सन ४८पासून कसं बदलत गेलं याची कहाणी कुणी सांगावी तर ती या अ‍ॅम्बेसेडरच्या प्रवासानं. त्या कहाणीत अजून एक घटक आहे, काळानुरूप बदलण्याचा. तो बदल स्वीकारला नाही तर जुन्या सत्तेच्या खुणाही कशा मोडीत निघतात, त्याची ही एक शोकात्म कथा आहे.