शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

राज्यपालांनी टाळले ब्रह्मसंकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 04:02 IST

वटहुकूमाचे आयुष्य सहा महिन्यांचे असते व त्याआधी त्याची जागा घेणारा कायदा केला गेला नाही तर वटहुकूम आपोआप संपुष्टात येतो.

- अजित गोगटेवटहुकूमाचे आयुष्य सहा महिन्यांचे असते व त्याआधी त्याची जागा घेणारा कायदा केला गेला नाही तर वटहुकूम आपोआप संपुष्टात येतो.एरवी परस्परांचे वैरी असल्याप्रमाणे वागणाऱ्या केरळमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकी करून तेथील राज्यपाल पी. सदाशिवम यांना ब्रह्मसंकटात टाकले. पण राज्यपालांनी राज्यघटनेने दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून या संकटातून स्वत:ची मुक्तता करून घेतली आणि त्याचबरोबर राज्य सरकारची लाजही राखली. दोन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर मेहेरनजर करण्यासाठी सरकार आणि विरोधकांनी हा सर्व खटाटोप केला होता. पी. सदाशिवम हे भारताचे निवृत्त सरन्यायाधीश आहेत. अशा पदावर राहिलेल्या व्यक्तीला राज्यपाल नेमले गेले तर विधिनिषेधशून्य राजकारण्यांमुळे त्यांच्यावर कसा अनवस्था प्रसंग ओढवू शकतो याचे हे उदाहरण आहे. कन्नूर मेडिकल कॉलेज आणि करुणा मेडिकल कॉलेज या केरळमधील दोन वैद्यकीय महाविद्यालयांनी सन २०१६-१७ मध्ये अनुक्रमे ६० व १२० विद्यार्थ्यांना तद्दन बेकायदा पद्धतीने प्रवेश दिले होते. केरळ उच्च न्यायालयाने हे सर्व प्रवेश रद्द केले. गेल्या वर्षी मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हे प्रवेश नियमित करण्यास नकार दिला. मुख्य म्हणजे सरकारच्याच प्रवेश नियंत्रण समितीने हे प्रवेश बेकायदा ठरविले होते. त्यामुळे खरे तर केरळ सरकारला या दोन कॉलेजांचा कैवार घेण्याचे काही कारण नव्हते. पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये असे साळसूद कारण देत सरकारने गेल्या आॅक्टोबरमध्ये हे सर्व प्रवेश नियमित करणारा वटहुकूम काढला. प्रत्येक विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपये शुल्क घेऊन प्रवेश नियमित करण्याची त्यात तरतूद केली गेली. वटहुकूम जेव्हा स्वाक्षरीसाठी राज्यपाल सदाशिवम यांच्याकडे आला तेव्हा त्यांच्यापुढे ब्रह्मसंकट उभे राहिले. या वटहुकूमावर स्वाक्षरी करणे म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण ज्याचे प्रमुख होतो त्या सर्वोच्च न्यायालयालाच धाब्यावर बसविणे आहे व असे करणे योग्य नाही याची सदाशिवम यांना जाणीव झाली. परंतु राज्यघटनेने हात बांधलेले असल्याने त्यांची कुचंबणा झाली. राज्यघटनेनुसार मंत्रिपरिषदेने शिफारस केल्यावर राज्यपाल वटहुकूम काढण्यास नकार देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना नाईलाजाने वटहुकूमावर स्वाक्षरी करावी लागली. यातून एका माजी सरन्यायाधीशानेच सर्वोच्च न्यायालयास न जुमानल्याचा अत्यंत वाईट संदेश गेला. वटहुकूमाचे आयुष्य सहा महिन्यांचे असते व त्याआधी त्याची जागा घेणारा कायदा केला गेला नाही तर वटहुकूम आपोआप संपुष्टात येतो. या वटहुुकूमाविरुद्ध मेडिकल कौन्सिल सर्वोच्च न्यायालयात गेली. तेथे वटहुकूमास तात्काळ स्थगिती मिळणार हे ठरलेलेच होते. परंतु बेकायदा प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना काहीही करून वाचवायचे असा चंग केरळ सरकारने बांधला होता. विरोधी पक्षांनीही त्यास साथ दिली. वटहुकूमाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येण्याआधीच केरळ विधानसभेने वटहुकूमाची जागा घेणारा कायदा एकमताने मंजूर केला. तरीही या कायद्यास राज्यपालांची संमती मिळालेली नाही हे पाहून सर्वोच्च न्यायालयाने वटहुकूमास स्थगिती दिली. यानंतर विधानसभेने मंजूर केलेला हा कायदा संमतीसाठी राज्यपालांकडे पाठविला गेला. राज्यघटनेच्या अनुच्छेद २०० अन्वये संमती देणे हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे. राज्यपाल सदाशिवम यांनी हा विशेषाधिकार वापरून या कायद्यास संमती नाकारली. सर्वोच्च न्यायालयाकडूनही चपराक बसेल याची जाणीव ठेवून केरळ सरकारनेही हा विषय पुढे न नेण्याचे ठरविले आणि बेकायदा वैद्यकीय प्रवेश रीतसर पैसे घेऊन नियमित करण्याच्या या निर्लज्ज अध्यायास मूठमाती मिळाली!