शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

संप फोडण्याचा सरकारचा डाव

By admin | Updated: June 3, 2017 03:34 IST

अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकरी संपावर गेला आहे. आता या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऐक्य टिकवून आंदोलन कायम ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. संपावर गेलेल्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. मात्र, रस्त्यावर दूध ओतून, भाजीपाला व फळे टाकून निषेध करण्याऐवजी अन्य प्रकारे आंदोलन पुढे चालवावे. शेतमालाची नासाडी न करता गावातील गरीब घटकांना त्याचे वाटप करावे आणि गावातील सामान्य लोकांशी आपली नाळ भक्कम करावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसणे हे देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व, पण सरकारच्या दृष्टीने नामुष्कीची घटना आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने कर्जमाफी दिली; परंतु महाराष्ट्रातील भाजपा सरकार हाच न्याय येथील शेतकऱ्यांना लागू करत नाही. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.शेतकऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची वाट न पाहता, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे...शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना, मुख्यमंत्री मात्र, विरोधकांवर बेछूट आरोप करत आहेत. शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी लगावला. शेतकऱ्याला जगवायचे असेल, तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही, असेही खा. चव्हाण म्हणाले.