शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी ‘अकादमी’

By admin | Updated: December 19, 2015 03:46 IST

अत्यंत निर्ममतेने, कोरडेपणाने, तटस्थतेने आणि भावनाशून्यतेने जो कारभार चालविला जातो, त्यालाच सरकारी कारभार म्हणत असतील तर या सर्व अवगुणांच्या विरोधात ज्यांचे

अत्यंत निर्ममतेने, कोरडेपणाने, तटस्थतेने आणि भावनाशून्यतेने जो कारभार चालविला जातो, त्यालाच सरकारी कारभार म्हणत असतील तर या सर्व अवगुणांच्या विरोधात ज्यांचे विचार आणि वर्तन असते, त्या साहित्यिकांची ओळखली जाणारी साहित्य अकादमी ही संस्थादेखील यापुढे सरकारी अकादमी म्हणूनच ओळखली जायला हवी. देशातील वाढत्या असहिष्णुतेचा प्रतिकात्मक निषेध म्हणून देशभरातील सुमारे चाळीस साहित्यिकांनी गेल्या दोन महिन्यात त्यांना पूर्वी प्राप्त झालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले होते. विवेकवादाचा पुरस्कार करणाऱ्या साहित्यिकांच्या हत्त्या होत असताना अकादमी मूक राहिल्याचा खरा तर तो निषेध होता. हा निषेध व्यक्त केला गेला तेव्हां कोणत्याही कृती वा उक्तीद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त न करता आता अकादमीने तिच्याकडे परत आलेले पुरस्कार न स्वीकारण्याचा आणि धनादेश न वटविता पुन्हा संबंधितांकडे पाठविण्याचा निर्णय आपल्या बैठकीत घेतला आहे. परत करण्याच्या या कृतीसोबत अकादमीने संबंधिताना वेगळे पत्र लिहून त्यांच्या भावनांची कदर करण्याचे सौजन्य दाखविण्याचा निर्णयही खरे तर घ्यावयास हवा होता. तसा काही तो झालेला दिसत नाही. पण तरीही इथपर्यंत सारे ठीकच झाले म्हणायचे. परंतु अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी त्यानंतर केलेले वक्तव्य मात्र साहित्यिकांच्या या संस्थेला सरकारी संस्थेची अवकळा प्राप्त करुन देणारे आहे. ते म्हणतात एकदा दिलेले पुरस्कार माघारी घेण्याची काही तरतूदच अकादमीच्या घटनेत नाही आणि ती करायची तर घटना दुरुस्ती करावी लागेल व ते किचकट काम आहे. जिथे केवळ साहित्यिकांचाच राबता असतो असे सांगितले जाते आणि जी संस्था राजकीय हस्तक्षेपापासून सुरक्षित असल्याचाही दावा केला जातो, अशा संस्थेच्या अध्यक्षांची ही भाषा केवळ सरकारी हडेलहप्पी याच सदरात मोडू शकते. त्यांच्या या विधानाचा एक अर्थ असाही निघू शकतो की सहिष्णुताभंगाचे असे प्रकार आता होतच राहणार तेव्हां ज्यांना हा भंग मानवणार नाही त्यांनी पुरस्कार न घेतलेलेच बरे! तिवारी यांचे पुढील विधान तसेच सुचवून जाते. ते म्हणतात, साहित्य अकादमी ही संस्था साहित्यिकांची आहे आणि तेच तिचे संचालन करीत असतात. पण तरीही या संस्थेने बहाल केलेला पुरस्कार ज्यांना परत करावासा वाटतो त्यांनी एक तर आपल्या निर्णयाच पुनर्विचार करावा अन्यथा स्वत:ला अकादमीपासून कायमचे वेगळे करुन टाकावे! हे सर्व बघितल्यानंतर ज्या साहित्यिकांनी अकादमीच्या बोटचेपपणावर आपली निषेधात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली, ती किती योग्य आणि तंतोतंत होती याची प्रचितीच अकादमीच्या अध्यक्षांनी आणून दिली आहे.