शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

सरकारी ‘अकादमी’

By admin | Updated: December 19, 2015 03:46 IST

अत्यंत निर्ममतेने, कोरडेपणाने, तटस्थतेने आणि भावनाशून्यतेने जो कारभार चालविला जातो, त्यालाच सरकारी कारभार म्हणत असतील तर या सर्व अवगुणांच्या विरोधात ज्यांचे

अत्यंत निर्ममतेने, कोरडेपणाने, तटस्थतेने आणि भावनाशून्यतेने जो कारभार चालविला जातो, त्यालाच सरकारी कारभार म्हणत असतील तर या सर्व अवगुणांच्या विरोधात ज्यांचे विचार आणि वर्तन असते, त्या साहित्यिकांची ओळखली जाणारी साहित्य अकादमी ही संस्थादेखील यापुढे सरकारी अकादमी म्हणूनच ओळखली जायला हवी. देशातील वाढत्या असहिष्णुतेचा प्रतिकात्मक निषेध म्हणून देशभरातील सुमारे चाळीस साहित्यिकांनी गेल्या दोन महिन्यात त्यांना पूर्वी प्राप्त झालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले होते. विवेकवादाचा पुरस्कार करणाऱ्या साहित्यिकांच्या हत्त्या होत असताना अकादमी मूक राहिल्याचा खरा तर तो निषेध होता. हा निषेध व्यक्त केला गेला तेव्हां कोणत्याही कृती वा उक्तीद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त न करता आता अकादमीने तिच्याकडे परत आलेले पुरस्कार न स्वीकारण्याचा आणि धनादेश न वटविता पुन्हा संबंधितांकडे पाठविण्याचा निर्णय आपल्या बैठकीत घेतला आहे. परत करण्याच्या या कृतीसोबत अकादमीने संबंधिताना वेगळे पत्र लिहून त्यांच्या भावनांची कदर करण्याचे सौजन्य दाखविण्याचा निर्णयही खरे तर घ्यावयास हवा होता. तसा काही तो झालेला दिसत नाही. पण तरीही इथपर्यंत सारे ठीकच झाले म्हणायचे. परंतु अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी त्यानंतर केलेले वक्तव्य मात्र साहित्यिकांच्या या संस्थेला सरकारी संस्थेची अवकळा प्राप्त करुन देणारे आहे. ते म्हणतात एकदा दिलेले पुरस्कार माघारी घेण्याची काही तरतूदच अकादमीच्या घटनेत नाही आणि ती करायची तर घटना दुरुस्ती करावी लागेल व ते किचकट काम आहे. जिथे केवळ साहित्यिकांचाच राबता असतो असे सांगितले जाते आणि जी संस्था राजकीय हस्तक्षेपापासून सुरक्षित असल्याचाही दावा केला जातो, अशा संस्थेच्या अध्यक्षांची ही भाषा केवळ सरकारी हडेलहप्पी याच सदरात मोडू शकते. त्यांच्या या विधानाचा एक अर्थ असाही निघू शकतो की सहिष्णुताभंगाचे असे प्रकार आता होतच राहणार तेव्हां ज्यांना हा भंग मानवणार नाही त्यांनी पुरस्कार न घेतलेलेच बरे! तिवारी यांचे पुढील विधान तसेच सुचवून जाते. ते म्हणतात, साहित्य अकादमी ही संस्था साहित्यिकांची आहे आणि तेच तिचे संचालन करीत असतात. पण तरीही या संस्थेने बहाल केलेला पुरस्कार ज्यांना परत करावासा वाटतो त्यांनी एक तर आपल्या निर्णयाच पुनर्विचार करावा अन्यथा स्वत:ला अकादमीपासून कायमचे वेगळे करुन टाकावे! हे सर्व बघितल्यानंतर ज्या साहित्यिकांनी अकादमीच्या बोटचेपपणावर आपली निषेधात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली, ती किती योग्य आणि तंतोतंत होती याची प्रचितीच अकादमीच्या अध्यक्षांनी आणून दिली आहे.