शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कायद्याचा राजरोस चालतो गोरखधंदा

By admin | Updated: January 23, 2017 01:24 IST

देशाने ‘कायद्याचे राज्य’ (रुल आॅफ लॉ) ही मूलभूत संकल्पना स्वीकारली असली, तरी एखाद्या सुजाण नागरिकाने सर्व कायदे जाणून

देशाने ‘कायद्याचे राज्य’ (रुल आॅफ लॉ) ही मूलभूत संकल्पना स्वीकारली असली, तरी एखाद्या सुजाण नागरिकाने सर्व कायदे जाणून आपले आयुष्य कायद्याच्या काटेकोर चौकटीत जगण्याचे ठरविले तर त्याला ते कधीच शक्य होणार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे ज्यांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे ते कायदेच सहजी उपलब्ध नाहीत. खरे तर ही जबाबदारी सरकारची. सरकार अशी पुस्तके छापते व त्यांची किंमतही माफक असते. पण ती एवढ्या कमी संख्येने छापली जातात की ती मिळविणे हे एक दिव्य होऊन बसते. हीच अवस्था न्यायालयांची. सरकारप्रमाणेच, आपले निकाल नागरिकांना उपलब्ध करून देणे ही खास करून सर्वोच्च व उच्च न्यायालयांची जबाबदारी ठरते. गेली काही वर्षे न्यायालयांच्या वेबसाइटवर ही निकालपत्रे उपलब्ध होऊ लागली आहेत. परंतु त्या वेबसाइटवरही तेथील निकालपत्रे अधिकृत मानली जाऊ नयेत, अशी तळटीप असते. राज्यात ३०० हून अधिक तालुका न्यायालये, ३६ जिल्हा न्यायालये, मुंबई- नागपूर व औरंगाबाद येथे उच्च न्यायालये व डझनावारी कनिष्ठ न्यायालये व न्यायाधिकरणे आहेत. पण तेथील वकील व न्यायाधीश यांना संबंधित कायद्यांची पुस्तके व संदर्भासाठी जुने निकाल गरजेचे असले तरी ग्रंथालयात ते उपलब्ध नसतात. परिणामी खासगी प्रकाशकांचा धंदा तेजीत चालतो. हे प्रकाशक कायद्यांच्या मूळ संहिता (बेअर अ‍ॅक्ट््स) आणि जुने न्यायनिर्णय छापून बख्खळ पैसा कमावतात. त्यांना संबंधित मजकूर अत्यल्प मोबदल्यात किंवा अजिबात पैसा खर्च न करता मिळत असतो. हजारो वकील त्यांचे हमखास ग्राहक असतात. कायद्याच्या मूळ संहितेचा ‘कॉपीराइट’ विधिमंडळ किंवा संसदेकडे असतो. त्यामुळे खासगी प्रकाशकांना तो जसाच्या तसा पुस्तक म्हणून छापता येत नाही. मग ते दहा-वीस रुपयांना मिळणारे मूळ संहितेचे सरकारी पुस्तक घेतात. त्यावर कोणाकडून तरी टीपा व भाष्य लिहून घेतात व असे जाडजूड पुस्तक तयार करून ते शेकडो रुपयांना विकतात. निकालांचा संदर्भ तर त्यांना फुकटात मिळतो. आपली निकालपत्रे आपण जनतेला उपलब्ध करून देऊ शकत नाही याची कृतीने कबुली देऊन सर्वोच्च व उच्च न्यायालयांनी काही निवडक प्रकाशकांच्या संदर्भ पुस्तकांना अधिकृत मान्यता दिली आहे. प्रत्येक न्यायाधीश निकालपत्रावर स्वाक्षरी करताना तो निकाल ‘रिपोर्ट’ करायचा की नाही, याविषयीचा शेरा लिहितो. ज्यांचे निकाल ‘लॉ रिपोर्ट्स’मध्ये जास्त प्रसिद्ध होतात, ते थोर न्यायाधीश मानले जातात. त्यामुळे कायद्याच्या नव्या मुद्द्याची उकल केलेली असो वा नसो, न्यायाधीश आपले निकाल सरधोपटपणे ‘रिपोर्ट’ करत असतात. अशा ‘रिपोर्ट’ करायच्या निकालपत्रांची एक प्रत न्यायालयांकडून या खासगी प्रकाशकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. अशा निकालपत्रांवर ‘हेडनोट्स’ टाकून त्यांची पुस्तके मासिक किंवा विषयवार संकलन करून प्रसिद्ध केली जातात. न्यायालये आपल्याच निकालपत्रांची अशी खासगी संकलित पुस्तके विकत घेतात!आपण न्यायालयाचे कोणतेही निकालपत्र वाचले तर त्यात प्रत्येक मुद्द्याच्या व कायदेशीर प्रतिपादनाच्या पुष्टीसाठी जुन्या निकालांचे संदर्भ दिलेले असतात. हे संदर्भ न्यायालये आपल्याच मूळ जुन्या निकालपत्राचा तारीख व पक्षकारनिहाय उल्लेख करून देत नाहीत, तर अमुक ‘लॉ रिपोर्ट’च्या अमुक खंडाचे पृष्ठ क्रमांक अमुक असे देतात. म्हणजे न्यायालयांचा व पर्यायाने कायद्याचा संपूर्ण डोलारा खासगी प्रकाशनांच्या गोरखधंद्यावर उभारलेला आहे. मध्यंतरी शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली गेली. राज्य सरकारनेच केलेल्या एका जुन्या कायद्याच्या आधारे ती केली गेली होती. याचिकेत त्या कायद्याचे संदर्भ देऊन त्यातील कलमे उद््धृत केलेली होती. पण त्या कायद्याची मूळ संहिता शोधाशोध करूनही सरकार दरबारी किंवा न्यायालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध झाली नाही. शेवटी याचिकाकर्त्यांच्या वकिलानेच न्यायालयाला व सरकारी वकिलांनाही ती कायद्याची पुस्तके (अर्थात खासगी प्रकाशने) उपलब्ध करून दिली होती! - अजित गोगटे