शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

देवच रक्षणकर्ता!

By admin | Updated: August 18, 2016 06:24 IST

कोलंबसाला अमेरिकेचा किंवा वास्को-द-गामाला भारताचा शोध लागल्यानंतरही जितका उत्साह आणि आनंद आसमंतात पसरला नसेल त्याहून अंमळ अधिकच उत्साह आणि आनंद महाराष्ट्राचे

कोलंबसाला अमेरिकेचा किंवा वास्को-द-गामाला भारताचा शोध लागल्यानंतरही जितका उत्साह आणि आनंद आसमंतात पसरला नसेल त्याहून अंमळ अधिकच उत्साह आणि आनंद महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांना मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी म्हणजे राजभवनात लागलेल्या भुयाराच्या शोधाने पसरला असावा असे दिसते. हे भुयार तब्बल पाच हजार चौरस फुटांचे असून सुमारे पाचशे फूट लांब असलेल्या या भुयारात एक-दोन नव्हे तेरा खोल्या आहेत आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची आणि वायूविजन होण्याचीही चोख व्यवस्था आहे. हे भुयार नेमके पोर्तुगीजांनी बांधले की ब्रिटिशांनी हे कोणालाही ठाऊक नाही. पण या भुयारावरील इमारतीत म्हणजे राजभवनात गेल्या कित्येक वर्षांपासून बड्या सरकारी अंमलदारांचा वास आहे. आज इतक्या वर्षानंतर या भुयाराचा शोध कसा लागला याची कथाही तशी मजेशीरच. राजभवनात काम करणाऱ्या एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकडून विद्यमान राज्यपालांना या भुयाराविषयी व त्याचे तोंड एका कच्च्या भिंतीने बंद करण्यात आल्याविषयी समजले. या कर्मचाऱ्याचे वडिलदेखील तिथेच कर्मचारी होते. त्याने दाखवलेली सदरहू भिंत ढासळविण्यात आली आणि भुयार समोर आले. याचा अर्थ आजवर तिथे राहून गेलेल्या एकाही राज्यपालास या कर्मचाऱ्याने जे सांगितले ते सांगितले नाही वा त्यांनीही कर्मचाऱ्यांना कधी विश्वासात घेतले नाही. पण प्रश्न तो नाहीच. राजभवनापासून सर्व सरकारी इमारतींची देखभाल सार्वजनिक बांधकाम खाते करते. राजभवन पोर्तुगीजांनी बांधलेले असो वा ब्रिटिशांनी, बांधकामाचे नकाशे नक्कीच उपलब्ध असणार. सत्तर वर्षांपूर्वीच ब्रिटीश भारत सोडून गेले पण आजही त्यांच्याकडे भारतात त्यांनी निर्माण केलेले पूल आणि इमारती यांचे नकाशे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या आयुर्मानाविषयी तेच अजूनही भारताला कळवीत असतात. मग एकाही भारतीय अभियंत्यास वा वास्तुकारास राजभवनाचे नकाशे पाहाण्याची वा वास्तुकलेसंबंधी जाणून घेण्याची इच्छा झाली नाही असा याचा अर्थ होतो. एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास जे ज्ञात असते, ते अन्य कोणालाही ठाऊक नसते ही बाब एकूणच सरकारी अनास्थेवर पुरेसा प्रकाश टाकते. तथापि जी बाब एका कर्मचाऱ्याला ठाऊक असते ती बाब चुकून का होईना कुणा परक्याला ज्ञात झाली असती तर काय झाले असते? इतक्या मोठ्या भुयारात छुपेपणाने कुणी अतिरेकी घुसून बसले असते तर त्यातून कोणते अरिष्ट ओढवू शकले असते याचा साधा विचारच कापरे भरविणारा आहे. त्यामुळेच म्हणायचे, देवच रक्षणकर्ता आहे म्हणून बरे, एरवी काही खरे नाही!