शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

देवच रक्षणकर्ता!

By admin | Updated: August 18, 2016 06:24 IST

कोलंबसाला अमेरिकेचा किंवा वास्को-द-गामाला भारताचा शोध लागल्यानंतरही जितका उत्साह आणि आनंद आसमंतात पसरला नसेल त्याहून अंमळ अधिकच उत्साह आणि आनंद महाराष्ट्राचे

कोलंबसाला अमेरिकेचा किंवा वास्को-द-गामाला भारताचा शोध लागल्यानंतरही जितका उत्साह आणि आनंद आसमंतात पसरला नसेल त्याहून अंमळ अधिकच उत्साह आणि आनंद महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांना मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी म्हणजे राजभवनात लागलेल्या भुयाराच्या शोधाने पसरला असावा असे दिसते. हे भुयार तब्बल पाच हजार चौरस फुटांचे असून सुमारे पाचशे फूट लांब असलेल्या या भुयारात एक-दोन नव्हे तेरा खोल्या आहेत आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची आणि वायूविजन होण्याचीही चोख व्यवस्था आहे. हे भुयार नेमके पोर्तुगीजांनी बांधले की ब्रिटिशांनी हे कोणालाही ठाऊक नाही. पण या भुयारावरील इमारतीत म्हणजे राजभवनात गेल्या कित्येक वर्षांपासून बड्या सरकारी अंमलदारांचा वास आहे. आज इतक्या वर्षानंतर या भुयाराचा शोध कसा लागला याची कथाही तशी मजेशीरच. राजभवनात काम करणाऱ्या एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकडून विद्यमान राज्यपालांना या भुयाराविषयी व त्याचे तोंड एका कच्च्या भिंतीने बंद करण्यात आल्याविषयी समजले. या कर्मचाऱ्याचे वडिलदेखील तिथेच कर्मचारी होते. त्याने दाखवलेली सदरहू भिंत ढासळविण्यात आली आणि भुयार समोर आले. याचा अर्थ आजवर तिथे राहून गेलेल्या एकाही राज्यपालास या कर्मचाऱ्याने जे सांगितले ते सांगितले नाही वा त्यांनीही कर्मचाऱ्यांना कधी विश्वासात घेतले नाही. पण प्रश्न तो नाहीच. राजभवनापासून सर्व सरकारी इमारतींची देखभाल सार्वजनिक बांधकाम खाते करते. राजभवन पोर्तुगीजांनी बांधलेले असो वा ब्रिटिशांनी, बांधकामाचे नकाशे नक्कीच उपलब्ध असणार. सत्तर वर्षांपूर्वीच ब्रिटीश भारत सोडून गेले पण आजही त्यांच्याकडे भारतात त्यांनी निर्माण केलेले पूल आणि इमारती यांचे नकाशे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या आयुर्मानाविषयी तेच अजूनही भारताला कळवीत असतात. मग एकाही भारतीय अभियंत्यास वा वास्तुकारास राजभवनाचे नकाशे पाहाण्याची वा वास्तुकलेसंबंधी जाणून घेण्याची इच्छा झाली नाही असा याचा अर्थ होतो. एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास जे ज्ञात असते, ते अन्य कोणालाही ठाऊक नसते ही बाब एकूणच सरकारी अनास्थेवर पुरेसा प्रकाश टाकते. तथापि जी बाब एका कर्मचाऱ्याला ठाऊक असते ती बाब चुकून का होईना कुणा परक्याला ज्ञात झाली असती तर काय झाले असते? इतक्या मोठ्या भुयारात छुपेपणाने कुणी अतिरेकी घुसून बसले असते तर त्यातून कोणते अरिष्ट ओढवू शकले असते याचा साधा विचारच कापरे भरविणारा आहे. त्यामुळेच म्हणायचे, देवच रक्षणकर्ता आहे म्हणून बरे, एरवी काही खरे नाही!