शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

तुला देतो पैसा

By admin | Updated: November 16, 2016 07:49 IST

‘अर्थस्य पुरुषो दास:’ हे महाभारतातील वचन कळायला आयुष्याची काही वर्षे तरी घालवावी लागतात़ पैसा देऊनच सर्व कामे सिद्धीस जातात

‘अर्थस्य पुरुषो दास:’ हे महाभारतातील वचन कळायला आयुष्याची काही वर्षे तरी घालवावी लागतात़ पैसा देऊनच सर्व कामे सिद्धीस जातात हे व्यवहारज्ञान न कळताही ‘तुला देतो पैसा’ हे गाणे गात-गात पावसाला निमंत्रण देत अनेकांचे बालपण गेले़ आपल्या वैदिक ऋषींनी पर्जन्यसूक्त, वरुणसूक्त रचून पावसाची आराधना केली़ पर्जन्ययाग करून त्याला मोठ्या सन्मानाने निमंत्रित केले़ पैसा व्यवहारात बलवान झाला आणि पैशाने सारे विकत घेता येते ही भावना दृढमूल होऊन बसली़ त्याला बालमन तरी कसे अपवाद असणार?‘येरे येरे पावसातुला देतो पैसा’ही लालूच दाखवायची कला माणसाने बालवयातच आत्मसात केली़ पैसा सुद्धा खोटा द्यायचा आणि पाऊस मात्र मोठा पड म्हणायचे़ कालमानाप्रमाणे आजकाल पावसाचे गाणेही बदलले आहे़ ९० टक्के मुले इंग्रजी केजीत जाणारी़ त्यांचे गाणे पावसाला बोलवत नाही़ ‘रेन रेन गो अवे’़पाऊस कशाला येणार? शेते कशी भिजणार? ‘तुला देतो पैसा’ हे खोटे आश्वासन उपयोगी तरी पडत होते़ माणूस सगळेच बदलायला बघतो आहे़ त्याला वाटते विज्ञानाच्या जोरावर काहीही शक्य आहे़ ईश्वराने कृपा केली असे मानायला माणूस तयार नाही़ देवाजीने कृपा केल्यावरच शेती पिकून हिरवी होते़ माणसाने कलात्मबुद्धीच्या जोरावर तयार केलेला सुंदर गालिचा खूप महागडा असतो़ तो बनवायला कालावधी खूप लागतो़ त्याला फार तर एका मोठ्या हॉलची मर्यादा. देवाजीचा गालिचा अमर्याद़ उघड्यावरच तो अंथरला जातो़ ‘हिरवे हिरवे गार गालिचेहरित तृणाच्या मखमालीचे’ हे हरिततृण म्हणजे जिवंतपणाचे लक्षण़ परमेश्वराने अंथरलेल्या या गालिच्याची किंमत कशी करणार?‘स्व’ पुढे ज्याला पाहाता येत नाही तो सृष्टीचे भले कसे ओळखणार? विज्ञान नियमानुसार काम करणाऱ बरे-वाईट त्याला थोडेच कळते़ ते कळते माणसाला़ माणसाने बऱ्याचा नादच सोडून दिला आहे़ त्याची सर्वांवर कुरघोडी, मी म्हणेन तेच खरे! अशाने जगाचे हित कसे बरे होईल? आपले पूर्वज काय वेडे होते़ त्यांनी रचलेली आणि केलेल्या प्रार्थना एकट्या दुकट्यासाठी नव्हत्या़ त्यांच्या मागण्यांत विश्वकल्याण होते़ काले वर्षतु पर्जन्य : पृथ्वी सस्यशालिनी। देशोऽयं क्षोभरहितो सर्वेसन्तु निर्भया:।। पाऊस वेळेवर पडो, धरा धनधान्याने समृद्ध होओ़ देश क्षोभरहित होऊन सर्वांना निर्भयपणे जगता येओ़ प्रार्थना गेली तशी तिच्याबरोबर वेळेवर पडणारा पाऊस गेला़ क्षोभ उत्तरोत्तर वाढीस लागला आणि जनता भयभीत झाली़ आता तरी म्हणा - ‘येरे येरे पावसा’ -डॉ. गोविंद काळे