शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, चांगला भाव मिळू दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

पाऊस चांगला पडला की शेतमालाचे उत्पादन अमाप होते. पण बाजारभाव मात्र कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. उत्पन्न वाढले तर कुटुंब जगवण्यासाठीची वर्षभराची अन्नाची गरज भागते एवढेच.

बाळासाहेब बोचरे|

वैशाख वणव्यात दारोदार फिरणारे गुबुगुबु नंदीवाले असोत की गावोगावच्या यात्रांमधील भाकणूक असो, आगामी वर्षात पाऊस कसा असेल याबाबत भाबड्या बळीराजाची उत्सुकता ताणलेली असते. भारतीय हवामान खात्याचे अंदाज असोत वा भाकणूक किंवा नंदीवाले यांनी पाऊस चांगला पडेल असे भाकीत केले की त्याच आनंदात शेतकरी वैशाखाच्या झळा सहन करतो. पाऊस चांगला पडला तर शेतमालाचे उत्पादन अमाप होते. मात्र बाजारभाव कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकºयांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. यंदा मान्सून ९६ ते १०४ टक्के बरसणार आणि शेती उत्पादनात ०.९ टक्के वाढ होणार हे अनुमान देशासाठी भलेही सुखद असेल पण शेतकºयांसाठी सुखद असेलच असे म्हणता येणार नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ झाली. पण शेतकºयांच्या हाती काय पडले याचा विचार करण्याची गरज आहे. सरकारने हमी भाव जाहीर केले पण खुद्द सरकारलाच हमी भावाने शेतमाल खरेदी करणे जिकिरीचे झाले आहे. तूर खरेदी बंद केली. खरेदी केलेली तूर गोदामात पडून आहे. आता हरभरा खरेदी सुरू आहे. साखरेचे भाव कोसळत आहेत. दुधाचे भाव पाण्यापेक्षा कमी आहेत.अन्नधान्य ही वाढत्या लोकसंख्येची वाढती गरज असताना लोकसंख्येची गती अािण अन्नधान्य उत्पादनाची गती यात फार मोठी तफावत आहे. २७५ दशलक्ष टन अन्नधान्याची निर्मिती करणाºया आपल्या देशाला येत्या ३० वर्षात किमान ३० दशलक्ष टनाची वाढ करावी लागणार आहे. हे केवळ आणि केवळ आपल्या बळीराजाच्याच हातात आहे. देशाच्या गरजेच्या प्रमाणात उत्पादन कमी असले तरी अन्नधान्याच्या किमती का वाढत नाहीत आणि श्ोतकºयाला योग्य भाव का मिळत नाही हे गणित शेतकºयांना कधीच कळू शकले नाही. हवामान खात्याचे अंदाज, प्रत्यक्ष पडणारा पाऊस, अन्नधान्य उत्पानाचा अंदाज आणि प्रत्यक्ष झालेले उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव याचा सरकारला कधी मेळच बसलेला नाही. अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला की भाव गगनाला भिडतात. सर्वसामान्यांची ओरड होते. म्हणून अन्नधान्याची आयात केली जाते. यात शेतकºयांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकºयाची तरुण मुले शेतीमध्ये काम करण्याऐवजी कारखान्यात नोकरी शोधत आहेत. वास्तविक शेतीमध्येच प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. शेतमजूर म्हणून जगण्याऐवजी शेतकरी म्हणून जगण्यासाठी तरुण वर्ग तयार आहे. पण वर्षभर राबल्यानंतर हातात काहीच शिल्लक राहणार नसेल तर अशा तरुण शेतकºयांच्या पदरी वैफल्याशिवाय काहीच पडत नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने २७५ दशलक्ष टन शेतमालाचे उत्पादन होईल असा अंदाज होता. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन २७७ दशलक्ष टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. तेव्हा आजच सरकारने या उत्पादनाचे काय करायचे याची तजवीज केली पाहिजे. वाढत्या उत्पादनाचा वरचेवर आढावा घेऊन पाऊस आणि वाढलेल्या उत्पादनाचा शेतकºयांना कसा फायदा होईल ते पहावे. शिवाय सलग दोन वर्षे चांगला झालेला पाऊस साठवून ठेवला तर पुढची काही वर्षे दुष्काळाच्या झळा कमी होण्यास मतदगार होतात हेही लक्षात घेऊन पाणी जिरवण्याची व साठवण्याची मोहीम गतिमान केली पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरी