शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, चांगला भाव मिळू दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

पाऊस चांगला पडला की शेतमालाचे उत्पादन अमाप होते. पण बाजारभाव मात्र कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. उत्पन्न वाढले तर कुटुंब जगवण्यासाठीची वर्षभराची अन्नाची गरज भागते एवढेच.

बाळासाहेब बोचरे|

वैशाख वणव्यात दारोदार फिरणारे गुबुगुबु नंदीवाले असोत की गावोगावच्या यात्रांमधील भाकणूक असो, आगामी वर्षात पाऊस कसा असेल याबाबत भाबड्या बळीराजाची उत्सुकता ताणलेली असते. भारतीय हवामान खात्याचे अंदाज असोत वा भाकणूक किंवा नंदीवाले यांनी पाऊस चांगला पडेल असे भाकीत केले की त्याच आनंदात शेतकरी वैशाखाच्या झळा सहन करतो. पाऊस चांगला पडला तर शेतमालाचे उत्पादन अमाप होते. मात्र बाजारभाव कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकºयांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. यंदा मान्सून ९६ ते १०४ टक्के बरसणार आणि शेती उत्पादनात ०.९ टक्के वाढ होणार हे अनुमान देशासाठी भलेही सुखद असेल पण शेतकºयांसाठी सुखद असेलच असे म्हणता येणार नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ झाली. पण शेतकºयांच्या हाती काय पडले याचा विचार करण्याची गरज आहे. सरकारने हमी भाव जाहीर केले पण खुद्द सरकारलाच हमी भावाने शेतमाल खरेदी करणे जिकिरीचे झाले आहे. तूर खरेदी बंद केली. खरेदी केलेली तूर गोदामात पडून आहे. आता हरभरा खरेदी सुरू आहे. साखरेचे भाव कोसळत आहेत. दुधाचे भाव पाण्यापेक्षा कमी आहेत.अन्नधान्य ही वाढत्या लोकसंख्येची वाढती गरज असताना लोकसंख्येची गती अािण अन्नधान्य उत्पादनाची गती यात फार मोठी तफावत आहे. २७५ दशलक्ष टन अन्नधान्याची निर्मिती करणाºया आपल्या देशाला येत्या ३० वर्षात किमान ३० दशलक्ष टनाची वाढ करावी लागणार आहे. हे केवळ आणि केवळ आपल्या बळीराजाच्याच हातात आहे. देशाच्या गरजेच्या प्रमाणात उत्पादन कमी असले तरी अन्नधान्याच्या किमती का वाढत नाहीत आणि श्ोतकºयाला योग्य भाव का मिळत नाही हे गणित शेतकºयांना कधीच कळू शकले नाही. हवामान खात्याचे अंदाज, प्रत्यक्ष पडणारा पाऊस, अन्नधान्य उत्पानाचा अंदाज आणि प्रत्यक्ष झालेले उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव याचा सरकारला कधी मेळच बसलेला नाही. अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला की भाव गगनाला भिडतात. सर्वसामान्यांची ओरड होते. म्हणून अन्नधान्याची आयात केली जाते. यात शेतकºयांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकºयाची तरुण मुले शेतीमध्ये काम करण्याऐवजी कारखान्यात नोकरी शोधत आहेत. वास्तविक शेतीमध्येच प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. शेतमजूर म्हणून जगण्याऐवजी शेतकरी म्हणून जगण्यासाठी तरुण वर्ग तयार आहे. पण वर्षभर राबल्यानंतर हातात काहीच शिल्लक राहणार नसेल तर अशा तरुण शेतकºयांच्या पदरी वैफल्याशिवाय काहीच पडत नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने २७५ दशलक्ष टन शेतमालाचे उत्पादन होईल असा अंदाज होता. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन २७७ दशलक्ष टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. तेव्हा आजच सरकारने या उत्पादनाचे काय करायचे याची तजवीज केली पाहिजे. वाढत्या उत्पादनाचा वरचेवर आढावा घेऊन पाऊस आणि वाढलेल्या उत्पादनाचा शेतकºयांना कसा फायदा होईल ते पहावे. शिवाय सलग दोन वर्षे चांगला झालेला पाऊस साठवून ठेवला तर पुढची काही वर्षे दुष्काळाच्या झळा कमी होण्यास मतदगार होतात हेही लक्षात घेऊन पाणी जिरवण्याची व साठवण्याची मोहीम गतिमान केली पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरी