शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, चांगला भाव मिळू दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

पाऊस चांगला पडला की शेतमालाचे उत्पादन अमाप होते. पण बाजारभाव मात्र कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. उत्पन्न वाढले तर कुटुंब जगवण्यासाठीची वर्षभराची अन्नाची गरज भागते एवढेच.

बाळासाहेब बोचरे|

वैशाख वणव्यात दारोदार फिरणारे गुबुगुबु नंदीवाले असोत की गावोगावच्या यात्रांमधील भाकणूक असो, आगामी वर्षात पाऊस कसा असेल याबाबत भाबड्या बळीराजाची उत्सुकता ताणलेली असते. भारतीय हवामान खात्याचे अंदाज असोत वा भाकणूक किंवा नंदीवाले यांनी पाऊस चांगला पडेल असे भाकीत केले की त्याच आनंदात शेतकरी वैशाखाच्या झळा सहन करतो. पाऊस चांगला पडला तर शेतमालाचे उत्पादन अमाप होते. मात्र बाजारभाव कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकºयांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. यंदा मान्सून ९६ ते १०४ टक्के बरसणार आणि शेती उत्पादनात ०.९ टक्के वाढ होणार हे अनुमान देशासाठी भलेही सुखद असेल पण शेतकºयांसाठी सुखद असेलच असे म्हणता येणार नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ झाली. पण शेतकºयांच्या हाती काय पडले याचा विचार करण्याची गरज आहे. सरकारने हमी भाव जाहीर केले पण खुद्द सरकारलाच हमी भावाने शेतमाल खरेदी करणे जिकिरीचे झाले आहे. तूर खरेदी बंद केली. खरेदी केलेली तूर गोदामात पडून आहे. आता हरभरा खरेदी सुरू आहे. साखरेचे भाव कोसळत आहेत. दुधाचे भाव पाण्यापेक्षा कमी आहेत.अन्नधान्य ही वाढत्या लोकसंख्येची वाढती गरज असताना लोकसंख्येची गती अािण अन्नधान्य उत्पादनाची गती यात फार मोठी तफावत आहे. २७५ दशलक्ष टन अन्नधान्याची निर्मिती करणाºया आपल्या देशाला येत्या ३० वर्षात किमान ३० दशलक्ष टनाची वाढ करावी लागणार आहे. हे केवळ आणि केवळ आपल्या बळीराजाच्याच हातात आहे. देशाच्या गरजेच्या प्रमाणात उत्पादन कमी असले तरी अन्नधान्याच्या किमती का वाढत नाहीत आणि श्ोतकºयाला योग्य भाव का मिळत नाही हे गणित शेतकºयांना कधीच कळू शकले नाही. हवामान खात्याचे अंदाज, प्रत्यक्ष पडणारा पाऊस, अन्नधान्य उत्पानाचा अंदाज आणि प्रत्यक्ष झालेले उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव याचा सरकारला कधी मेळच बसलेला नाही. अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला की भाव गगनाला भिडतात. सर्वसामान्यांची ओरड होते. म्हणून अन्नधान्याची आयात केली जाते. यात शेतकºयांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकºयाची तरुण मुले शेतीमध्ये काम करण्याऐवजी कारखान्यात नोकरी शोधत आहेत. वास्तविक शेतीमध्येच प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. शेतमजूर म्हणून जगण्याऐवजी शेतकरी म्हणून जगण्यासाठी तरुण वर्ग तयार आहे. पण वर्षभर राबल्यानंतर हातात काहीच शिल्लक राहणार नसेल तर अशा तरुण शेतकºयांच्या पदरी वैफल्याशिवाय काहीच पडत नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने २७५ दशलक्ष टन शेतमालाचे उत्पादन होईल असा अंदाज होता. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन २७७ दशलक्ष टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. तेव्हा आजच सरकारने या उत्पादनाचे काय करायचे याची तजवीज केली पाहिजे. वाढत्या उत्पादनाचा वरचेवर आढावा घेऊन पाऊस आणि वाढलेल्या उत्पादनाचा शेतकºयांना कसा फायदा होईल ते पहावे. शिवाय सलग दोन वर्षे चांगला झालेला पाऊस साठवून ठेवला तर पुढची काही वर्षे दुष्काळाच्या झळा कमी होण्यास मतदगार होतात हेही लक्षात घेऊन पाणी जिरवण्याची व साठवण्याची मोहीम गतिमान केली पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरी