शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

सद्बुद्धी दे गणनायका !

By admin | Updated: September 5, 2016 05:19 IST

‘कार्यारंभी श्रीगणेश’ अशी ख्याती असलेल्या श्रीगणेशाचे आगमन आज साऱ्या महाराष्ट्रातच नव्हे तर मराठी माणूस जेथे जेथे आहे

‘कार्यारंभी श्रीगणेश’ अशी ख्याती असलेल्या श्रीगणेशाचे आगमन आज साऱ्या महाराष्ट्रातच नव्हे तर मराठी माणूस जेथे जेथे आहे त्या प्रत्येक गावात आणि तेथील मराठी घरात अत्यंत धूमधडाक्यात होत आहे. प्रत्येक राज्याची विशेष अशी ओळख असते. महाराष्ट्राची ओळख गणेशोत्सव ही आहे. एके काळी व्यक्तिगत असलेली ही ओळख लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केली. त्यामागे सामाजिक जागृती हे उद्दिष्ट होते. धार्मिक कार्यक्रमात इंग्रज सरकार हस्तक्षेप करू शकणार नाही हे ओळखून त्यांनी या उत्सवाचा उपयोग सामाजिक जागृतीसाठी करण्यास सुरुवात केली. अशा कार्यक्रमातून होणाऱ्या वैचारिक प्रबोधनातून समाजात स्वातंत्र्याविषयीची ओढ वाढीस लागली आणि परकीय सत्तेविरुद्धचा तिटकारा पराकोटीस पोहचला, हा इतिहास आहे. श्री गणेशाचे एकदंत, चतुर्हस्त हे स्वरूप अनादीकाळापासून चालत आलेले आहे आणि ते त्यांच्या भक्तांना भुरळ घालीत आले आहे. चित्रकारांनाही या रूपाने वेड लावले असून मकबुल फिदा हुसेन यांनाही गणेशाच्या प्रतिमेला आपल्या चित्रकल्पनेतून साकारण्याचा मोह आवरता आला नव्हता. ही गणेश प्रतिमा दूरदूरच्या राष्ट्रातही कशी पोचली हा संशोधकांसाठी कायम संशोधनाचा विषय ठरला आहे. भारतातही आसेतू हिमाचल श्रीगणेशाचे मूर्तरूप सर्व मंदिरात ठळकपणे पाहावयास मिळते. श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी गणेशवंदना केली. कारण त्या दैवताचे पूजन कार्य सिद्धीस नेण्यासाठी उपकारक ठरत असते अशी धारणा भारतीयांच्या मनात फार पूर्वीपासून कायम अंकित झालेली आहे. ‘देवा तूचि गणेशु, सकलमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो’ या तऱ्हेचे आवाहन श्री ज्ञानेश्वरांनी करण्यामागे हीच भूमिका असल्याचे दिसून येते. आज सार्वजनिक गणेशोत्सवाला जे उत्सवी रूप प्राप्त झाले आहे, तशा रूपाची अपेक्षा लोकमान्य टिळकांनीही केली नसेल. प्रबोधनाच्या जागी मनोरंजनाचे आगमन झाल्यापासून गणेशमूर्तीची स्थापना केल्यानंतर कोणताही विधिनिषेध न बाळगता डीजेच्या तालावर जे संगीत सादर करण्यात येते त्यामुळे गणेश पूजनामागील पावित्र्य लोपले आहे. दिव्यांची रोषणाई, देखाव्यांची भव्यता यालाच जे अधिक महत्त्व आले आहे ते गणेशोत्सव साजरा करण्याच्या संकल्पनेला तडा देणारे ठरले आहे. श्रीगणेशाची स्थापना हा इव्हेन्ट झाल्यामुळे, त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा उपयोग आत्मप्रसिद्धीसाठी करून घेण्याचा मोह राजकीय नेत्यांना व्हावा हे स्वाभाविकच होते. त्या मोहापायी स्वत:चा प्रचार करण्यासाठी गणेशोत्सवाचा उपयोग राजकीय नेत्यांकडून होऊ लागला आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमांसाठी पैशाची होणारी बेलगाम उधळण ही स्वत:ची व्होट बँक मजबूत करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून होऊ लागली आहे. ते गणेशोत्सवाचे प्रायोजकत्व पत्करू लागल्यामुळे प्रायोजकांकडून अधिकाधिक रक्कम मिळविण्याचा प्रयत्न गणेशोत्सव मंडळांकडून होऊ लागला आहे. या राजकीय नेत्यांना आवरा असे म्हणण्याची वेळ श्रीगणेशावर आली आहे. श्रीगणेश ही बुद्धिदात्री देवता आहे. श्री व्यासांनी महाभारताचे जे लेखन केले ते श्रीगणेशाकरवी केले अशी आख्यायिका आहे. ‘बुद्धीचा साक्षी ईश्वर, तेथे कर्माचा प्रसार’, या संकल्पनेतून श्रीगणेशाकडे महाभारताचे लेखकत्व सोपविले असावे. त्यामुळेच चांगली बुद्धी दे असे श्रीगणेशाला साकडे घालण्यात येते. आजची समाजाची सैराट अवस्था बघता साऱ्या सामाजाला सद्बुद्धी दे असे गणेशाला साकडे घालण्याची वेळ आली आहे. सत्ताधीशांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांचीच बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय असे वाटू लागले आहे. लहान मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर त्यांच्या होणाऱ्या हत्या, आॅनर किलिंगच्या नावाने समाजाचा आणि कुटुंबाचा मानसन्मान राखण्यासाठी केले जाणारे खून, समाजापुढे ज्यांचे आदर्श असतात अशा सत्ताधीशांकडून सत्तेचा होणारा दुरुपयोग, जनहिताच्या नावाखाली लहान लहान गोष्टीत होणारा न्यायालयीन हस्तक्षेप आणि न्यायाधीशांकडून लोकप्रतिनिधींवर ओढले जाणारे कोरडे, नोकरशहांकडून केला जाणारा न्यायालयीन निर्णयांचा उपमर्द, सत्ताधीशांकडून विरोधकांची केली जाणारी गळचेपी, अशी बुद्धिभ्रष्टतेची अनेक उदाहरणे सांगता येतील. निकोप समाजव्यवस्थेसाठी हे सर्व प्रकार घातक आहेत. या सर्वांना चांगली बुद्धी दे असे गणरायाला आवाहन करण्याची वेळ आली आहे. वास्तविक लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची जी फलश्रुती सांगितली आहे त्यात ‘ज्या योगाने आपले परस्पर संबंध निकटतर होत जातील त्या त्या गोष्टी करणे हे आपले कर्तव्य ठरते. त्यादृष्टीने गणेशोत्सवाकडे बघितले तर समाजमन अधिक सुसंस्कृत होण्यासाठी, विकृतीपासून दूर होत सत्कृतीकडे जाण्यासाठी बुद्धिदात्या श्रीगणेशाने सर्वांना सद्बुद्धी द्यावी. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सारा समाज एकजूट झाला तर बलशाली भारताचे स्वप्न प्रत्यक्ष उतरण्यास वेळ लागणार नाही.