शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाठबळ मिळेल?

By admin | Updated: May 18, 2017 04:06 IST

आजपासून दोन दशकांआधी कुणी कल्पनाही करू शकले नसते, असे अघटित घडले आहे. कधीकाळचा जीवलग साथीदार असलेल्या रशियाला भारताने निर्वाणीचा इशारा

आजपासून दोन दशकांआधी कुणी कल्पनाही करू शकले नसते, असे अघटित घडले आहे. कधीकाळचा जीवलग साथीदार असलेल्या रशियाला भारताने निर्वाणीचा इशारा दिला आहे. आण्विक पुरवठादार देशांच्या गटात, म्हणजेच एनएसजीमध्ये भारताला प्रवेश मिळत नसेल तर आपल्या आण्विक ऊर्जा कार्यक्रमाच्या विकासात विदेशांचे सहकार्य घेणे थांबवू, असे भारताने रशियाला बजावले आहे. तामिळनाडूतील कुडनकुलम आण्विक प्रकल्पातील पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या भट्टीसाठीच्या सामंजस्य कराराचे घोंगडे अनेक दिवसांपासून भिजत पडलेले आहे. भारत काही तरी कारण पुढे करून या करारावर स्वाक्षरी करणे टाळत होता. आता तर भारताने रशियाला स्पष्ट शब्दात बजावले आहे, की आम्हाला एनएसजीमध्ये प्रवेश मिळवून द्या; अन्यथा कुडनकुलम विसरा ! गत काही काळापासून रशियाची चीनसोबतची घसट चांगलीच वाढली आहे. दुसरीकडे भारताचा एनएसजीमधील प्रवेश केवळ चीनच्या विरोधामुळे अडकून पडला आहे. त्यामुळे रशियाने चीनवर दबाव निर्माण करून आपला एनएसजीमधील प्रवेश सुकर करावा, अशी भारताची अपेक्षा आहे. त्यासाठी भारत कुडनकुलम सामंजस्य कराराचा वापर करू बघत आहे. भारताच्या या डावपेचास यश लाभेल, की त्यामुळे आंतरराष्ट्रीय मंचावर भारत एकटा पडण्याच्या प्रक्रियेस चालना मिळेल हे आगामी काळच सांगेल; पण जर भारताला एनएसजीत प्रवेश मिळालाच नाही आणि भारताने आपला इशारा खरा केला, तर पुढे काय? भारताची ऊर्जेची भूक प्रचंड आहे आणि ती उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. ती भागवायची तर आण्विक ऊर्जेला पर्यायच नाही ! त्यामुळे विदेशी तंत्रज्ञान व इंधनाच्या मदतीने किंवा संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान व इंधनाचा वापर करून, भारताला आण्विक ऊर्जा निर्माण करावीच लागेल. प्रश्न हा आहे, की संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान व इंधनाचा वापर करून आण्विक ऊर्जानिर्मिती भारताला शक्य आहे का? भारतीय आण्विक तंत्रज्ञानाचे जनक डॉ. होमी भाभा यांनी देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी १९५० मध्येच तीन टप्प्यातील धोरण आखले होते. भारतात युरेनियमचे साठे अत्यंत मर्यादित आहेत, तर थोरियमच्या जगातील एकूण साठ्यांपैकी २५ टक्के साठा एकट्या भारतात आहे. त्यामुळे भारताने थोरियम या इंधनाचा वापर करून ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, असे स्वप्न डॉ. भाभांनी बघितले होते. दुर्दैवाने दृढ राजकीय इच्छाशक्तीच्या पाठबळाअभावी, डॉ. भाभांच्या धोरणातील दुसरा टप्पाही भारत अजून पूर्णपणे गाठू शकलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील थोरियमवर आधारित भट्ट्या हे अद्याप स्वप्नच आहे. भारताला खरोखरच विदेशी मदत न घेता आण्विक ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे असेल, तर डॉ. भाभांच्या स्वप्नातील तिसरा टप्पा लवकरात लवकर गाठणे, हाच एकमेव पर्याय आहे. भारतीय शास्त्रज्ञ त्यासाठी नक्कीच सक्षम आहेत. प्रश्न हा आहे, की त्यासाठी आवश्यक ते आर्थिक व राजकीय पाठबळ त्यांना मिळणार आहे का?