शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

पाठबळ मिळेल?

By admin | Updated: May 18, 2017 04:06 IST

आजपासून दोन दशकांआधी कुणी कल्पनाही करू शकले नसते, असे अघटित घडले आहे. कधीकाळचा जीवलग साथीदार असलेल्या रशियाला भारताने निर्वाणीचा इशारा

आजपासून दोन दशकांआधी कुणी कल्पनाही करू शकले नसते, असे अघटित घडले आहे. कधीकाळचा जीवलग साथीदार असलेल्या रशियाला भारताने निर्वाणीचा इशारा दिला आहे. आण्विक पुरवठादार देशांच्या गटात, म्हणजेच एनएसजीमध्ये भारताला प्रवेश मिळत नसेल तर आपल्या आण्विक ऊर्जा कार्यक्रमाच्या विकासात विदेशांचे सहकार्य घेणे थांबवू, असे भारताने रशियाला बजावले आहे. तामिळनाडूतील कुडनकुलम आण्विक प्रकल्पातील पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या भट्टीसाठीच्या सामंजस्य कराराचे घोंगडे अनेक दिवसांपासून भिजत पडलेले आहे. भारत काही तरी कारण पुढे करून या करारावर स्वाक्षरी करणे टाळत होता. आता तर भारताने रशियाला स्पष्ट शब्दात बजावले आहे, की आम्हाला एनएसजीमध्ये प्रवेश मिळवून द्या; अन्यथा कुडनकुलम विसरा ! गत काही काळापासून रशियाची चीनसोबतची घसट चांगलीच वाढली आहे. दुसरीकडे भारताचा एनएसजीमधील प्रवेश केवळ चीनच्या विरोधामुळे अडकून पडला आहे. त्यामुळे रशियाने चीनवर दबाव निर्माण करून आपला एनएसजीमधील प्रवेश सुकर करावा, अशी भारताची अपेक्षा आहे. त्यासाठी भारत कुडनकुलम सामंजस्य कराराचा वापर करू बघत आहे. भारताच्या या डावपेचास यश लाभेल, की त्यामुळे आंतरराष्ट्रीय मंचावर भारत एकटा पडण्याच्या प्रक्रियेस चालना मिळेल हे आगामी काळच सांगेल; पण जर भारताला एनएसजीत प्रवेश मिळालाच नाही आणि भारताने आपला इशारा खरा केला, तर पुढे काय? भारताची ऊर्जेची भूक प्रचंड आहे आणि ती उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. ती भागवायची तर आण्विक ऊर्जेला पर्यायच नाही ! त्यामुळे विदेशी तंत्रज्ञान व इंधनाच्या मदतीने किंवा संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान व इंधनाचा वापर करून, भारताला आण्विक ऊर्जा निर्माण करावीच लागेल. प्रश्न हा आहे, की संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान व इंधनाचा वापर करून आण्विक ऊर्जानिर्मिती भारताला शक्य आहे का? भारतीय आण्विक तंत्रज्ञानाचे जनक डॉ. होमी भाभा यांनी देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी १९५० मध्येच तीन टप्प्यातील धोरण आखले होते. भारतात युरेनियमचे साठे अत्यंत मर्यादित आहेत, तर थोरियमच्या जगातील एकूण साठ्यांपैकी २५ टक्के साठा एकट्या भारतात आहे. त्यामुळे भारताने थोरियम या इंधनाचा वापर करून ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, असे स्वप्न डॉ. भाभांनी बघितले होते. दुर्दैवाने दृढ राजकीय इच्छाशक्तीच्या पाठबळाअभावी, डॉ. भाभांच्या धोरणातील दुसरा टप्पाही भारत अजून पूर्णपणे गाठू शकलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील थोरियमवर आधारित भट्ट्या हे अद्याप स्वप्नच आहे. भारताला खरोखरच विदेशी मदत न घेता आण्विक ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे असेल, तर डॉ. भाभांच्या स्वप्नातील तिसरा टप्पा लवकरात लवकर गाठणे, हाच एकमेव पर्याय आहे. भारतीय शास्त्रज्ञ त्यासाठी नक्कीच सक्षम आहेत. प्रश्न हा आहे, की त्यासाठी आवश्यक ते आर्थिक व राजकीय पाठबळ त्यांना मिळणार आहे का?