शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सज्ज व्हा, पण...

By admin | Updated: May 9, 2016 02:52 IST

कोणाचे काहीही होऊ द्या त्याच्याशी आपले काहीही देणे-घेणे नाही याच अविर्भावात बहुतांशी राजकीय पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी वागत असतात. परिस्थितीनुरूप निर्णय घेणे

कोणाचे काहीही होऊ द्या त्याच्याशी आपले काहीही देणे-घेणे नाही याच अविर्भावात बहुतांशी राजकीय पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी वागत असतात. परिस्थितीनुरूप निर्णय घेणे वा तसे पाऊल उचलणे हे सगळ्यांनाच जमते असेही नाही, पण जो काळासोबत चालतो तोच यशस्वी होत असतो आणि जनतेच्या मनातही त्याच्याविषयीच जागा तयार होत असते. राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे, त्यासोबतच पाणीटंचाईचा प्रश्न गहन झालेला आहे. दुष्काळाच्या वेदना सहन न झाल्याने एक-दोन दिवसाआड शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे सत्र सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी माणसा-माणसांत वैर निर्माण होत आहे. अशा मन सुन्न करणाऱ्या वातावरणात केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे; तर सर्वसामान्य माणसांना धीर देण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी काही सकारात्मक योजना राबविण्याची गरज आहे. पाणी नसलेल्या भागातील नागरिकांची तहान कशी भागेल याचा विचार होणे गरजेचे आहे. अपवाद वगळता ज्या तुलनेत हे प्रयत्न व्हायला हवेत तसे न होता राजकारणी मंडळी आपली सिंहासने कशी शाबूत राहतील याचीच चिंता बाळगताना दिसत आहे. लोणावळा येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडली. ‘अनेक विकासयोजना राबविल्याने भाजपाबद्दल लोकांचे चांगले मत आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूकांसाठी सज्ज व्हा’ असे आवाहन दानवे यांनी केले. हा झाला त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक भाग, पण अशाप्रकारचे आवाहन करतानाच राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी आणि पाणीटंचाई असलेल्या भागासाठी त्या-त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी तातडीने काही योजना राबवाव्यात असे फर्मानही सोडले असते, तर दानवे आणि त्यांच्या पक्षाविषयी एक आस्थेचा संदेश जनतेपर्यंत पोहचला असता. पण तसे न करता केवळ निवडणूक सज्जतेचा संदेश देणे म्हणजे रोम जळत असताना फिडल वाजविण्यासारखा प्रकार म्हणायला हवा.