शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

आता कामाला लागा!

By admin | Updated: November 1, 2014 00:11 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून देशात निर्माण झालेले उत्सवी वातावरण ओसरण्याची चिन्हे दिसत नाहीत.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून देशात निर्माण झालेले उत्सवी वातावरण ओसरण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता तर महाराष्ट्रातही भाजपाचेच सरकार स्थापन झाल्यामुळे या उत्साहात भरच पडली असून, आणखी काही काळ वातावरण असेच उत्साही राहण्याची चिन्हे आहेत. एखाद्या गोष्टीचा आनंद झाला, की उत्सव साजरा करणो यात काही गैर नाही. त्यात भाजपा दीर्घकाळ सत्तेपासून दूर राहिलेला पक्ष असल्यामुळे त्याला सत्तारोहणाचा उत्सव साजरा करण्याचा हक्कही आहे; पण आता या उत्सवाला आवर घालून निवडणूक काळात दिलेली आश्वासने व वचने पूर्ण करण्याची वेळ आली आहे. संपुआचे सरकार निष्क्रिय ठरल्याच्या पाश्र्वभूमीवर जनतेने मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ केले आहे. महाराष्ट्रातही तशीच स्थिती आहे. राज्यातील मागच्या सरकारातील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जनतेने हा नवा कौल दिला आहे. त्यामुळे केंद्रातील; तसेच राज्यातील भाजपाच्या सरकारकडून जनतेच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यामुळे भाजपाला मिळालेला हा कौल देशविकासाच्या कामासाठी आहे, भाजपा व त्याची पितृसंघटना रा. स्व. संघाचा हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्यासाठी नाही, हे लक्षात घेणो आवश्यक आहे. केंद्रातील भाजपा सरकारनेच अजून धडपणो कामकाजाला सुरुवात केली नाही, तेव्हा महाराष्ट्रातल्या सरकारकडून इतक्यात तशी अपेक्षा करता येणार नाही; पण या दोन्ही सरकारांच्या कामाला सुरुवात झाली नसली, तरी रा. स्व. संघाने, संघपरिवारातील संघटनांनी आणि भाजपातील हिंदुत्ववादय़ांनी आपले काम सुरू केले आहे. रा. स्व. संघाच्या काही मंडळीनी नुकतीच मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊ न देशातील शिक्षणात रा. स्व. संघाच्या तत्त्वज्ञानाला अनुकूल ठरतील असे बदल करण्याची मागणी केली आहे. संघपरिवारातील संघटना आणि इराणी यांच्यात या विषयावर चर्चा करण्यासाठी गेल्या मे महिन्यापासून अशा सहा बैठका झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाच्या संघीकरणाला सरकारच्या कामकाजाआधीच सुरुवात झाल्याचे दिसते. दुसरीकडे याच संघवादी संघटनांनी राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याची मागणी सुरू केली आहे. अशाच प्रकारच्या आणखी काही मागण्या येत्या काळात पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास समाजात दुहीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वेळी जनतेने जातीपातीच्यापलीकडे, एवढेच नाही तर कोणत्याही राजकीय तत्त्वज्ञानाच्या पलीकडे जाऊ न मतदान केले आहे. मतदारांत नव्या विचारांच्या तरुणांचा अधिक समावेश आहे. त्यांना देशाची आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान यात अधिक रस आहे. राम मंदिर ही त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब नाही; तसेच शिक्षणात हिंदुत्व आहे की नाही यापेक्षा ते ज्ञान व रोजगार देण्यास सक्षम आहे की नाही, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर राज्यातील जनतेला देशातील प्रगत राज्याचा दर्जा कायम राखण्यात रस आहे. राज्यात मोठय़ा प्रमाणात परकी गुंतवणूक यावी, राज्याने केवळ मुंबई-पुणो एक्स्प्रेसवेवर समाधान न मानता, अधिकाधिक शहरे वाहतूक योग्य रस्त्यांनी जोडली जावीत, शेतक:यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढून नव्या पद्धतीची फायदेशीर शेती करता यावी, बडय़ा शहरांचे बकालपण दूर व्हावे, घरे स्वस्त मिळावित आणि सर्व क्षेत्रत दररोज चाललेला उघडा नागडा भ्रष्टाचार दूर व्हावा; तसेच औद्योगिकीकरणाची लाट विदर्भ, मराठवाडय़ाच्या मागास जिल्हय़ांर्पयत पोहोचावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतातले आहे. हे सरकार शिवसेनेशी ज्या प्रकारे वागत आहे, त्यातच या सरकारच्या अस्थिरतेची बीजे रुतलेली आहेत. त्यामुळे एकीकडे सत्ता सांभाळायची आणि दुसरीकडे जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी कामे करायची, अशी तारेवरची कसरत फडणवीस यांना करावी लागणार आहे. शिवाय, त्यांच्या पक्षात अंतर्गत धुसफूस चालू असेल ती वेगळीच. केवळ पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा येथे काम करणार नाही. त्यापलीकडे जाऊ न फडणवीस यांच्या सरकारला काम करावे लागणार आहे. फडणवीस हे तरुण व धडाडीचे नेते आहेत. त्यांच्या नव्या कारकिर्दीला शुभेच्छा आहेत; पण त्यांच्यावर ही जबाबदारीही आहे, ती त्यांनी पार पाडवी, अशी अपेक्षाही आहे.