शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

जनरल रावत यांनी तरी वेगळा विचार करावा

By admin | Updated: January 18, 2017 23:55 IST

कोणत्याही संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीत चालवण्यासाठी ठरवून दिलेले नियम व कार्यपद्धती यांचे महत्त्व अनिवार्यच असते.

कोणत्याही संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीत चालवण्यासाठी ठरवून दिलेले नियम व कार्यपद्धती यांचे महत्त्व अनिवार्यच असते. मात्र भविष्याचा वेध घेऊन संस्थेची जडणघडण करण्याची क्षमता आणि त्यासाठी लागणारी दूरदृष्टी, परंपरा व बदल यांची प्रगल्भपणे सांगड घालण्याचे भान नेतृत्वाकडे असावे लागते. अन्यथा नियम व कार्यपद्धती यांना कर्मकांडाचे स्वरूप येते व हितसंबंधियांचे संस्थान असे संस्थेचे स्वरूप बनण्यास वेळ लागत नाही. भारतीय लष्कराचे नवे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी लष्करदिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात जो इशारा दिला आहे, त्यामुळे सैन्यदलाच्या भविष्यलक्षी जडणघडणीची क्षमता त्यांच्याकडे आहे काय, अशी शंका घेण्याजोगी परिस्थिती उद्भवण्याजी शक्यता आहे. गेल्या पंधरवड्यापासून सीमा सुरक्षा दल व इतर काही निमलष्करी दले आणि लष्करातील जवानांनी आपली गाऱ्हाणी ‘समाज माध्यमां’मार्फत जनतेपुढे मांडण्याची एक लाट आली आहे. एक व्हिडीओ सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने प्रथम ‘समाज माध्यमां’वर टाकला. तो सर्वदूर पसरला. मग अधिकारीवर्ग कशी हलक्या दर्जाची वागणूक देतात, यावर प्रकाशझोत टाकणारे व्हिडीओ लष्करातील दोघा जवानांनीही ‘समाज माध्यमा’वर टाकले. या प्रकाराने खळबळ माजू लागली. त्यावर कोणाचीही तक्रार असल्यास त्याने माझ्याकडे ती सरळ पाठवून द्यावी, त्याची नि:पक्षपाती चौकशी होईल, याची काळजी मी घेईन, अशी ग्वाही जनरल रावत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. तरीही आणखी एका जवानाने तसाच व्हिडीओ ‘समाज माध्यमां’वर टाकला. आता तर एका जवानाने उपोषणासही सुरूवात केली आहे. या घटना थांबत नाहीत, हे लक्षात आल्यावर, अशा प्रकारे ‘समाज माध्यमां’वर तक्रारी करणे, हे लष्करी शिस्तीला धरून नाही, तो गुन्हा ठरून शिक्षा होऊ शकते, हे लक्षात ठेवा, असा इशारा रविवारी झालेल्या ‘लष्करदिना’च्या संचलनानंतरच्या भाषणात जनरल रावत यांनी दिला आहे. आपण व्यक्तिश: ग्वाही देऊनही जवानांना विश्वास का वाटत नाही, असा विचार कारवाईचा बडगा उगारण्याआधी जनरल रावत यांनी केलेला दिसत नाही. त्यांनी तसा तो केलेला नाही, याचे कारण म्हणजे जवानांच्या तक्रारी केवळ निकृष्ट अन्नपदार्थांबाबत नाहीत, तर मुख्यत: लष्करात ‘सहाय्यका’ची (बॅटमन) जी परंपरा आहे, तिच्या विरोधात आहे. मात्र लष्कराच्या प्रमुख पदावर नेमणूक झाल्यावर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत जनरल रावत यांनी अतिशय ठामपणे या परंपराचे समर्थन केले आणि जवान व अधिकारी यांच्यातील भावनिक नाते कसे या परंपरेमुळे घट्ट होत जाते, याचे निरूपणही केले. पूर्वीप्रमाणे आता भारतीय लष्करात भरती होणारा जवान हा केवळ प्राथमिक वा माध्यमिक शिक्षण घेतलेला नसतो. बहुतेक जण चांगले शिकलेले असतात. आवड असल्यामुळे वा इतरत्र नोकरी मिळत नसल्याने ते लष्करात दाखल होतात. ‘सहाय्यका’च्या परंपरेचे लष्करी प्रथा व चालीरीतीच्या चौकटीत कितीही उदात्तीकरण केले, तरी प्रत्यक्षात असे काम करणाऱ्या जवानांना ‘चपरासी’ म्हणूनच वागणूक कशी दिली जात असते याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यापायी दीड दोन वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील एका लष्करी पलटणीतील जवानांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात पवित्रा घेऊन काही जणांना डांबून ठेवले असता त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारत-चीन सीमेवरील या ठिकाणी जाऊन प्रकरण मिटवावे लागले होते. अशा परिस्थितीत बदलत्या जगातील जाणिवा व आशा-आकांक्षा यांची दखल घेत ही वसाहतिक काळापासून चालत आलेली प्रथा बंदच केली जायला हवी. ही परंपरा रद्द केल्यास जवान व अधिकारी यांच्यातील भावनिक बंध कमकुवत होतील, हा दावा बिनबुडाचा आहे व असे बंध कमकुवत झाल्याचा परिणाम संरक्षण सिद्धतेवर होऊ शकतो, हा तर निव्वळ बागुलबुवा आहे. जवान सैन्यात दाखल होतात, ते लढण्यासाठी आणि शौर्य, देशभक्ती या गोष्टी देशासंबंधी, म्हणजे समाजासंबंधी व तेथे मिळणाऱ्या वागणुकीबाबत, या जवानांची काय मनोभूमिका असते, त्यावर ठरतात. आज या संबंधी समाजातच इतकी उपलथापालथ होत आहे की, त्याचे पडसाद सैन्यदलांतच नव्हे, तर निमलष्करी दले व पोलीस दलांतही उमटणे अपरिहार्यच आहे. याचे कारण म्हणजे पोलीस दलांतील शिपाई वर्गाचीही हीच भावना असते. हे पडसाद का उमटत आहेत, याकडे दुर्लक्ष करून केवळ शिस्तीच्या बडग्याने ते दूर लोटण्याचा प्रयत्न झाल्यास काय होऊ शकते, ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एका जवानाने आपल्या चार सहकाऱ्यांना गोळ्या घालून ठार माण्याची घटना दाखवून देते. या गोष्टीवर तोडगा केवळ सैन्यदलांच्या प्रमुखांच्या स्तरावर निघणार नाही. त्यासाठी राजकीय नेतृत्वानेच पुढाकार घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.