शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गेटवे आॅफ वेस्ट

By admin | Updated: April 20, 2016 02:55 IST

‘स्ट्रिंग आॅफ पर्ल’ सारख्या योजनांच्या माध्यमातून भारताला घेरण्याच्या रणनीतीवर चीन वेगाने काम करीत असताना, इराणमधील चाबहार बंदरासंदर्भातील महत्त्वपूर्ण करार

‘स्ट्रिंग आॅफ पर्ल’ सारख्या योजनांच्या माध्यमातून भारताला घेरण्याच्या रणनीतीवर चीन वेगाने काम करीत असताना, इराणमधील चाबहार बंदरासंदर्भातील महत्त्वपूर्ण करार त्वरेने पूर्णत्वास नेण्यावर, इराण व अफगाणिस्तानसोबत सहमती घडवून, भारतानेही पाकिस्तान-चीन जोडगोळीला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या पराराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या तेहरान दौऱ्यादरम्यान, इराण व अफगाणिस्तानने चाबहार बंदर करार वेगाने पूर्णत्वास नेण्यास मान्यता दिली. पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या विकासाच्या माध्यमातून अरबी समुद्र व हिंदी महासागरात थेट प्रवेश मिळविण्याच्या चीनच्या मनसुब्यांना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारताला हा करार करणे अत्यावश्यक होते. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मध्य आशिया व युरोपातील देशांशी भारताचा खुश्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. भारताला स्वातंत्र्य मिळतानाच जगाच्या नकाशावर पाकिस्तानचा उदय झाला आणि त्या देशाने जन्मापासूनच भारताशी उभा दावा मांडला. परिणामी भारताचा पश्चिमेकडील देशांसोबतचा भूमार्गाने होणारा संपर्कच संपुष्टात आला. त्यामुळेच अफगाणिस्तानसारखा मित्रही भारतापासून दुरावला. आग्नेय इराणमधील चाबहार बंदराच्या विकासामुळे भारताचा पश्चिमेकडील देशांसोबतचा संपर्क पुन्हा घनिष्ट होण्यास भरीव मदत होणार आहे. विशेषत: भारताचा अफगाणिस्तानसोबतचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढून, चारही बाजूंनी जमिनीने वेढलेल्या त्या देशाचे पाकिस्तानवरील परावलंबित्व बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरलाही चालना मिळणार आहे. भारत, रशिया, इराण, युरोप आणि मध्य आशिया दरम्यान रस्ते, रेल्वे आणि समुद्र मार्गे मालवाहतूक करण्यासाठी या कॉरिडॉरची कल्पना मांडण्यात आली आहे. चाबहार बंदराच्या विकासामुळे भारतातून इराणला होणारी लोह खनिज, साखर व तांदळाची निर्यात वाढणार आहे. त्यामुळे एका अर्थाने चाबहार बंदर हे भारतासाठी ‘गेटवे आॅफ वेस्ट’ ठरणार आहे. त्याशिवाय भारताच्या खनिज तेलाच्या वाहतूक खर्चातही मोठी बचत होणार आहे. भारताला युरिया व सुका मेवाही बराच स्वस्त दरात मिळू शकणार आहे. या व्यापारी लाभांशिवाय चाबहारचे राजकीय महत्त्वही मोठे आहे. अफगाणिस्तानचे पाकिस्तानवरील परावलंबित्व कमी झाल्यामुळे त्या देशातील कट्टरपंथी विचारधारेच्या प्रसारास अटकाव होण्यासही मदत होईल. भारतासाठी ती मोठी उपलब्धी असेल. ग्वादार बंदराच्या माध्यमातून अरबी समुद्र व हिंद महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या मनसुब्यावर पाणी फिरण्यास तर चाबहारचा मोठा हातभार लागेलच; पण त्यामुळे भारताला पश्चिमी अरबी समुद्रात पाय रोवता येतील. अशा रितीने चाबहारचा विकास भारतासाठी अनेक मार्गांनी मोठाच उपयुक्त ठरणार आहे.