शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

गेटवे आॅफ वेस्ट

By admin | Updated: April 20, 2016 02:55 IST

‘स्ट्रिंग आॅफ पर्ल’ सारख्या योजनांच्या माध्यमातून भारताला घेरण्याच्या रणनीतीवर चीन वेगाने काम करीत असताना, इराणमधील चाबहार बंदरासंदर्भातील महत्त्वपूर्ण करार

‘स्ट्रिंग आॅफ पर्ल’ सारख्या योजनांच्या माध्यमातून भारताला घेरण्याच्या रणनीतीवर चीन वेगाने काम करीत असताना, इराणमधील चाबहार बंदरासंदर्भातील महत्त्वपूर्ण करार त्वरेने पूर्णत्वास नेण्यावर, इराण व अफगाणिस्तानसोबत सहमती घडवून, भारतानेही पाकिस्तान-चीन जोडगोळीला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या पराराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या तेहरान दौऱ्यादरम्यान, इराण व अफगाणिस्तानने चाबहार बंदर करार वेगाने पूर्णत्वास नेण्यास मान्यता दिली. पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या विकासाच्या माध्यमातून अरबी समुद्र व हिंदी महासागरात थेट प्रवेश मिळविण्याच्या चीनच्या मनसुब्यांना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारताला हा करार करणे अत्यावश्यक होते. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मध्य आशिया व युरोपातील देशांशी भारताचा खुश्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. भारताला स्वातंत्र्य मिळतानाच जगाच्या नकाशावर पाकिस्तानचा उदय झाला आणि त्या देशाने जन्मापासूनच भारताशी उभा दावा मांडला. परिणामी भारताचा पश्चिमेकडील देशांसोबतचा भूमार्गाने होणारा संपर्कच संपुष्टात आला. त्यामुळेच अफगाणिस्तानसारखा मित्रही भारतापासून दुरावला. आग्नेय इराणमधील चाबहार बंदराच्या विकासामुळे भारताचा पश्चिमेकडील देशांसोबतचा संपर्क पुन्हा घनिष्ट होण्यास भरीव मदत होणार आहे. विशेषत: भारताचा अफगाणिस्तानसोबतचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढून, चारही बाजूंनी जमिनीने वेढलेल्या त्या देशाचे पाकिस्तानवरील परावलंबित्व बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरलाही चालना मिळणार आहे. भारत, रशिया, इराण, युरोप आणि मध्य आशिया दरम्यान रस्ते, रेल्वे आणि समुद्र मार्गे मालवाहतूक करण्यासाठी या कॉरिडॉरची कल्पना मांडण्यात आली आहे. चाबहार बंदराच्या विकासामुळे भारतातून इराणला होणारी लोह खनिज, साखर व तांदळाची निर्यात वाढणार आहे. त्यामुळे एका अर्थाने चाबहार बंदर हे भारतासाठी ‘गेटवे आॅफ वेस्ट’ ठरणार आहे. त्याशिवाय भारताच्या खनिज तेलाच्या वाहतूक खर्चातही मोठी बचत होणार आहे. भारताला युरिया व सुका मेवाही बराच स्वस्त दरात मिळू शकणार आहे. या व्यापारी लाभांशिवाय चाबहारचे राजकीय महत्त्वही मोठे आहे. अफगाणिस्तानचे पाकिस्तानवरील परावलंबित्व कमी झाल्यामुळे त्या देशातील कट्टरपंथी विचारधारेच्या प्रसारास अटकाव होण्यासही मदत होईल. भारतासाठी ती मोठी उपलब्धी असेल. ग्वादार बंदराच्या माध्यमातून अरबी समुद्र व हिंद महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या मनसुब्यावर पाणी फिरण्यास तर चाबहारचा मोठा हातभार लागेलच; पण त्यामुळे भारताला पश्चिमी अरबी समुद्रात पाय रोवता येतील. अशा रितीने चाबहारचा विकास भारतासाठी अनेक मार्गांनी मोठाच उपयुक्त ठरणार आहे.