शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

गेटवे आॅफ वेस्ट

By admin | Updated: April 20, 2016 02:55 IST

‘स्ट्रिंग आॅफ पर्ल’ सारख्या योजनांच्या माध्यमातून भारताला घेरण्याच्या रणनीतीवर चीन वेगाने काम करीत असताना, इराणमधील चाबहार बंदरासंदर्भातील महत्त्वपूर्ण करार

‘स्ट्रिंग आॅफ पर्ल’ सारख्या योजनांच्या माध्यमातून भारताला घेरण्याच्या रणनीतीवर चीन वेगाने काम करीत असताना, इराणमधील चाबहार बंदरासंदर्भातील महत्त्वपूर्ण करार त्वरेने पूर्णत्वास नेण्यावर, इराण व अफगाणिस्तानसोबत सहमती घडवून, भारतानेही पाकिस्तान-चीन जोडगोळीला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या पराराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या तेहरान दौऱ्यादरम्यान, इराण व अफगाणिस्तानने चाबहार बंदर करार वेगाने पूर्णत्वास नेण्यास मान्यता दिली. पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या विकासाच्या माध्यमातून अरबी समुद्र व हिंदी महासागरात थेट प्रवेश मिळविण्याच्या चीनच्या मनसुब्यांना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारताला हा करार करणे अत्यावश्यक होते. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मध्य आशिया व युरोपातील देशांशी भारताचा खुश्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. भारताला स्वातंत्र्य मिळतानाच जगाच्या नकाशावर पाकिस्तानचा उदय झाला आणि त्या देशाने जन्मापासूनच भारताशी उभा दावा मांडला. परिणामी भारताचा पश्चिमेकडील देशांसोबतचा भूमार्गाने होणारा संपर्कच संपुष्टात आला. त्यामुळेच अफगाणिस्तानसारखा मित्रही भारतापासून दुरावला. आग्नेय इराणमधील चाबहार बंदराच्या विकासामुळे भारताचा पश्चिमेकडील देशांसोबतचा संपर्क पुन्हा घनिष्ट होण्यास भरीव मदत होणार आहे. विशेषत: भारताचा अफगाणिस्तानसोबतचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढून, चारही बाजूंनी जमिनीने वेढलेल्या त्या देशाचे पाकिस्तानवरील परावलंबित्व बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरलाही चालना मिळणार आहे. भारत, रशिया, इराण, युरोप आणि मध्य आशिया दरम्यान रस्ते, रेल्वे आणि समुद्र मार्गे मालवाहतूक करण्यासाठी या कॉरिडॉरची कल्पना मांडण्यात आली आहे. चाबहार बंदराच्या विकासामुळे भारतातून इराणला होणारी लोह खनिज, साखर व तांदळाची निर्यात वाढणार आहे. त्यामुळे एका अर्थाने चाबहार बंदर हे भारतासाठी ‘गेटवे आॅफ वेस्ट’ ठरणार आहे. त्याशिवाय भारताच्या खनिज तेलाच्या वाहतूक खर्चातही मोठी बचत होणार आहे. भारताला युरिया व सुका मेवाही बराच स्वस्त दरात मिळू शकणार आहे. या व्यापारी लाभांशिवाय चाबहारचे राजकीय महत्त्वही मोठे आहे. अफगाणिस्तानचे पाकिस्तानवरील परावलंबित्व कमी झाल्यामुळे त्या देशातील कट्टरपंथी विचारधारेच्या प्रसारास अटकाव होण्यासही मदत होईल. भारतासाठी ती मोठी उपलब्धी असेल. ग्वादार बंदराच्या माध्यमातून अरबी समुद्र व हिंद महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या मनसुब्यावर पाणी फिरण्यास तर चाबहारचा मोठा हातभार लागेलच; पण त्यामुळे भारताला पश्चिमी अरबी समुद्रात पाय रोवता येतील. अशा रितीने चाबहारचा विकास भारतासाठी अनेक मार्गांनी मोठाच उपयुक्त ठरणार आहे.