शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 05:11 IST

वारंवार सूचना देऊनही कचºयाचे व्यवस्थापन करण्याचे टाळणा-या १७ गृहनिर्माण संस्था आणि अन्य आस्थापनांविरोधात अखेर पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्याचे पाऊल मुंबई महापालिकेला उचलावे लागले.

वारंवार सूचना देऊनही कचºयाचे व्यवस्थापन करण्याचे टाळणा-या १७ गृहनिर्माण संस्था आणि अन्य आस्थापनांविरोधात अखेर पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्याचे पाऊल मुंबई महापालिकेला उचलावे लागले. गेली अनेक वर्षे महापालिका गृहनिर्माण संस्थांना ओला आणि सुका कचरा अशी वर्गवारी करण्याबाबत पत्रके पाठवित आहे. मात्र त्या पत्रकांना फारसे कुणी जुमानत असल्याचे दिसत नाही. कचºयाचे व्यवस्थापन केले नाही तर आपल्याविरुद्ध कोण आणि काय कारवाई करणार, अशी नागरिकांची मानसिकता असल्याचे दिसून येते. म्हणूनच महापालिकेला एफआयआर दाखल करण्याचे पाऊल नाइलाजाने उचलावे लागले आहे. गृहनिर्माण संस्थांमधून बाहेर पडणाºया कचºयाचे पहिल्या पातळीवरच ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण झाल्यास नंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून होणारे व्यवस्थापन सोपे होईल. मात्र याबाबत मिळणारा अत्यल्प प्रतिसाद ही महापालिकेसाठी चिंतेची बाब ठरत आहे. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, कचराकुंड्या तसेच शहरातील नद्या, नाल्यांमध्ये कचरा साचणे, पावसाळ्यात पाणी तुंबणे यासाठी महापालिकेला जबाबदार धरत नागरिक कायमच तोंडसुख घेत असतात. अर्थात महापालिकेची ती जबाबदारी आहेच. पण म्हणून नागरिक आपली प्राथमिक जबाबदारी झटकू शकत नाहीत. शहरातून दररोज महापालिका साडेसहा हजार मेट्रीक टन कचरा गोळा करून तो कांजूर आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर टाकते. डम्पिंग ग्राउंडवर या कचºयाचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावणे हे काम आव्हानात्मक आहे. हे काम सोपे व्हावे, यासाठी त्याचे वर्गीकरण आधी नागरिकांकडून व्हावे, ही महापालिकेची अपेक्षाही रास्तच आहे. मात्र सतत महापालिकेवर टीका करणाºया नागरिकांची ही जबाबदारी स्वीकारायची तयारी नसते. महापालिकेला एफआयआरचा बडगा का, उगारावा लागला याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. याचवेळी नागरिकांनी कचरा वेगवेगळा केला तरी तो वाहून नेण्यासाठी आवश्यक वाहनव्यवस्था महापालिकेकडे नसल्याचा आरोप केला जातो. महापालिकेने अशी व्यवस्था तयार करून या आक्षेपाला जागा ठेवता कामा नये. कचºयापासून वीज आणि खतनिर्मितीची स्वप्ने महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून दाखवित आहे. ती सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली तर नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव होऊन कचरा व्यवस्थापनात तेही सहभागी होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.