शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

कचऱ्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 05:11 IST

वारंवार सूचना देऊनही कचºयाचे व्यवस्थापन करण्याचे टाळणा-या १७ गृहनिर्माण संस्था आणि अन्य आस्थापनांविरोधात अखेर पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्याचे पाऊल मुंबई महापालिकेला उचलावे लागले.

वारंवार सूचना देऊनही कचºयाचे व्यवस्थापन करण्याचे टाळणा-या १७ गृहनिर्माण संस्था आणि अन्य आस्थापनांविरोधात अखेर पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्याचे पाऊल मुंबई महापालिकेला उचलावे लागले. गेली अनेक वर्षे महापालिका गृहनिर्माण संस्थांना ओला आणि सुका कचरा अशी वर्गवारी करण्याबाबत पत्रके पाठवित आहे. मात्र त्या पत्रकांना फारसे कुणी जुमानत असल्याचे दिसत नाही. कचºयाचे व्यवस्थापन केले नाही तर आपल्याविरुद्ध कोण आणि काय कारवाई करणार, अशी नागरिकांची मानसिकता असल्याचे दिसून येते. म्हणूनच महापालिकेला एफआयआर दाखल करण्याचे पाऊल नाइलाजाने उचलावे लागले आहे. गृहनिर्माण संस्थांमधून बाहेर पडणाºया कचºयाचे पहिल्या पातळीवरच ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण झाल्यास नंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून होणारे व्यवस्थापन सोपे होईल. मात्र याबाबत मिळणारा अत्यल्प प्रतिसाद ही महापालिकेसाठी चिंतेची बाब ठरत आहे. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, कचराकुंड्या तसेच शहरातील नद्या, नाल्यांमध्ये कचरा साचणे, पावसाळ्यात पाणी तुंबणे यासाठी महापालिकेला जबाबदार धरत नागरिक कायमच तोंडसुख घेत असतात. अर्थात महापालिकेची ती जबाबदारी आहेच. पण म्हणून नागरिक आपली प्राथमिक जबाबदारी झटकू शकत नाहीत. शहरातून दररोज महापालिका साडेसहा हजार मेट्रीक टन कचरा गोळा करून तो कांजूर आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर टाकते. डम्पिंग ग्राउंडवर या कचºयाचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावणे हे काम आव्हानात्मक आहे. हे काम सोपे व्हावे, यासाठी त्याचे वर्गीकरण आधी नागरिकांकडून व्हावे, ही महापालिकेची अपेक्षाही रास्तच आहे. मात्र सतत महापालिकेवर टीका करणाºया नागरिकांची ही जबाबदारी स्वीकारायची तयारी नसते. महापालिकेला एफआयआरचा बडगा का, उगारावा लागला याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. याचवेळी नागरिकांनी कचरा वेगवेगळा केला तरी तो वाहून नेण्यासाठी आवश्यक वाहनव्यवस्था महापालिकेकडे नसल्याचा आरोप केला जातो. महापालिकेने अशी व्यवस्था तयार करून या आक्षेपाला जागा ठेवता कामा नये. कचºयापासून वीज आणि खतनिर्मितीची स्वप्ने महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून दाखवित आहे. ती सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली तर नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव होऊन कचरा व्यवस्थापनात तेही सहभागी होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.