शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

अंगाशी येणारा खेळ

By admin | Updated: July 29, 2016 03:28 IST

मुंबई शहरात म्हणे रिक्षा चालक संघटनेचे सुमारे एक लाख आणि टॅक्सी चालक संघटनेचे तीस हजार सभासद आहेत. या दोन्ही घटकांमध्ये मिळून म्हणे अंदाजे पाच लाख मतदार आहेत.

मुंबई शहरात म्हणे रिक्षा चालक संघटनेचे सुमारे एक लाख आणि टॅक्सी चालक संघटनेचे तीस हजार सभासद आहेत. या दोन्ही घटकांमध्ये मिळून म्हणे अंदाजे पाच लाख मतदार आहेत. हे मतदार मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदान करणार आहेत असे गृहीत धरुन त्यांची मते युती झाली तर युतीला आणि न झाली तर भाजपाला मिळावीत या एकमात्र उद्देशाने राज्य सरकारने त्यांच्यापुढे मान तुकवून इंटरनेटच्या माध्यमातून सुरु झालेल्या रिक्षा आणि टॅक्सी सेवेचा गळा घोटण्याचा वा आवळण्याचा विचार म्हणे सुरु केला आहे. राजकारणातही अनेकदा कसा आंधळेपणाने विचार केला जातो याचेच हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या पाच लाख मतांच्या आशेपोटी त्याहून कितीतरी पटींनी अधिक संख्येत असलेल्या मतांवर मग सरकारी पक्षाला पाणी सोडावे लागणार आहे याची कल्पना त्यास नसावी असे दिसते. इंटरनेटच्या माध्यमातून सुरु झालेली रिक्षा-टॅक्सी सेवा केवळ मुंबई शहरातच लोकानी स्वीकारली असे नाही. तर अन्य अनेक शहरांनीही या सेवेला आपलेसे केले आहे. त्यामुळेच परंपरागतरीत्या या व्यवसायात असलेल्या आणि संघटना करुन बसलेल्या लोकांच्या पोटावर पाय (?) येत असल्याचा त्यांचा कांगावा आहे आणि म्हणूनच सरकार त्यांच्यासमोर वाकायला सिद्ध झाले आहे. मुळात इंटरनेटद्वारे अशी प्रवासी सेवा उपलब्ध करुन देणारे म्हणजे रस्त्यावर वाहतूक करणारे लोक कोणी परग्रहावरुन आलेले नाहीत. जे अगोदरपासून प्रवासी वाहतूक क्षेत्रात होते त्यांनाच हाताशी धरुन या सेवा सुरु झाल्या आहेत. त्यांच्या यशस्वीतेचे सर्वात मोठे गमक म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता. मीटरप्रमाणे जे भाडे होईल ते भरले जाते म्हणजे त्यात वादावादीचा वा भांडणाचा प्रश्न येत नाही. परंतु त्याहून महत्वाचे म्हणजे प्रवास संपल्यावर संबंधित प्रवाशाला आलेल्या अनुभवाची विचारणा केली जाते. त्याला काही विपरीत अनुभव आला तर संबंधित चालकाच्या विरोधात कारवाईदेखील केली जाते. महत्वाचे म्हणजे जेथून मागेल तेथे सेवा उपलब्ध केली जाते आणि जिथे कुठे जायचे असेल तिथपर्यंत ती पुरविली जाते. हा सारा अनुभव वेगळा आणि प्रवाशांच्या दृष्टीने सुखकर आहे. एरवी संघटित रिक्षा किंवा टॅक्सी चालक यांची मग्रुरी, उद्दामपणा, मवालेगिरी आणि हुज्जत घालण्याची वृत्ती यांचा अनुभव न घेतलेला प्रवासी शोधूनही सापडणार नाही. रिक्षा-टॅक्सी संघटनांकडे तक्रार केली तर संघटनेतही त्यांचेच भाऊबंद असतात. अधूनमधून राज्याच्या परिवहन विभागालाही एक झटका येत असतो. हा विभागही लोकाना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंबंधी तक्रारी करायचे आवाहन करीत असतो पण अत्यंत अचूक तपशीलाह केलेल्या तक्रारींचीदेखील दखल घेतली जात नाही. घेणारही कशी? मुजोर रिक्षा-टॅक्सीचालक अंगावर वर्दी असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसालाच भर चौकात फोडून काढतात पण कोणीच काही करु शकत नाही. विशेष म्हणजे मुक्ततेच्या धोरणाची पंचविशी साजरी करताना मुक्ततेच्या व्यवहाराचा गळा घोटणे हा निश्चितच अंगाशी येणारा खेळ ठरु शकतो.