शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

अंगाशी येणारा खेळ

By admin | Updated: July 29, 2016 03:28 IST

मुंबई शहरात म्हणे रिक्षा चालक संघटनेचे सुमारे एक लाख आणि टॅक्सी चालक संघटनेचे तीस हजार सभासद आहेत. या दोन्ही घटकांमध्ये मिळून म्हणे अंदाजे पाच लाख मतदार आहेत.

मुंबई शहरात म्हणे रिक्षा चालक संघटनेचे सुमारे एक लाख आणि टॅक्सी चालक संघटनेचे तीस हजार सभासद आहेत. या दोन्ही घटकांमध्ये मिळून म्हणे अंदाजे पाच लाख मतदार आहेत. हे मतदार मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदान करणार आहेत असे गृहीत धरुन त्यांची मते युती झाली तर युतीला आणि न झाली तर भाजपाला मिळावीत या एकमात्र उद्देशाने राज्य सरकारने त्यांच्यापुढे मान तुकवून इंटरनेटच्या माध्यमातून सुरु झालेल्या रिक्षा आणि टॅक्सी सेवेचा गळा घोटण्याचा वा आवळण्याचा विचार म्हणे सुरु केला आहे. राजकारणातही अनेकदा कसा आंधळेपणाने विचार केला जातो याचेच हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या पाच लाख मतांच्या आशेपोटी त्याहून कितीतरी पटींनी अधिक संख्येत असलेल्या मतांवर मग सरकारी पक्षाला पाणी सोडावे लागणार आहे याची कल्पना त्यास नसावी असे दिसते. इंटरनेटच्या माध्यमातून सुरु झालेली रिक्षा-टॅक्सी सेवा केवळ मुंबई शहरातच लोकानी स्वीकारली असे नाही. तर अन्य अनेक शहरांनीही या सेवेला आपलेसे केले आहे. त्यामुळेच परंपरागतरीत्या या व्यवसायात असलेल्या आणि संघटना करुन बसलेल्या लोकांच्या पोटावर पाय (?) येत असल्याचा त्यांचा कांगावा आहे आणि म्हणूनच सरकार त्यांच्यासमोर वाकायला सिद्ध झाले आहे. मुळात इंटरनेटद्वारे अशी प्रवासी सेवा उपलब्ध करुन देणारे म्हणजे रस्त्यावर वाहतूक करणारे लोक कोणी परग्रहावरुन आलेले नाहीत. जे अगोदरपासून प्रवासी वाहतूक क्षेत्रात होते त्यांनाच हाताशी धरुन या सेवा सुरु झाल्या आहेत. त्यांच्या यशस्वीतेचे सर्वात मोठे गमक म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता. मीटरप्रमाणे जे भाडे होईल ते भरले जाते म्हणजे त्यात वादावादीचा वा भांडणाचा प्रश्न येत नाही. परंतु त्याहून महत्वाचे म्हणजे प्रवास संपल्यावर संबंधित प्रवाशाला आलेल्या अनुभवाची विचारणा केली जाते. त्याला काही विपरीत अनुभव आला तर संबंधित चालकाच्या विरोधात कारवाईदेखील केली जाते. महत्वाचे म्हणजे जेथून मागेल तेथे सेवा उपलब्ध केली जाते आणि जिथे कुठे जायचे असेल तिथपर्यंत ती पुरविली जाते. हा सारा अनुभव वेगळा आणि प्रवाशांच्या दृष्टीने सुखकर आहे. एरवी संघटित रिक्षा किंवा टॅक्सी चालक यांची मग्रुरी, उद्दामपणा, मवालेगिरी आणि हुज्जत घालण्याची वृत्ती यांचा अनुभव न घेतलेला प्रवासी शोधूनही सापडणार नाही. रिक्षा-टॅक्सी संघटनांकडे तक्रार केली तर संघटनेतही त्यांचेच भाऊबंद असतात. अधूनमधून राज्याच्या परिवहन विभागालाही एक झटका येत असतो. हा विभागही लोकाना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंबंधी तक्रारी करायचे आवाहन करीत असतो पण अत्यंत अचूक तपशीलाह केलेल्या तक्रारींचीदेखील दखल घेतली जात नाही. घेणारही कशी? मुजोर रिक्षा-टॅक्सीचालक अंगावर वर्दी असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसालाच भर चौकात फोडून काढतात पण कोणीच काही करु शकत नाही. विशेष म्हणजे मुक्ततेच्या धोरणाची पंचविशी साजरी करताना मुक्ततेच्या व्यवहाराचा गळा घोटणे हा निश्चितच अंगाशी येणारा खेळ ठरु शकतो.