शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गल्लोगल्लीचे दहशतवादी

By admin | Updated: June 22, 2016 23:37 IST

कुत्रा हा इमानी प्राणी मानला जातो. त्याच्या इमानदारीच्या कथा अनेकजण सांगत असतात. त्याच्यावर अनेक चित्रपटही निघाले आहेत. हे झाले पाळीव कुत्र्यांच्या बाबतीत

कुत्रा हा इमानी प्राणी मानला जातो. त्याच्या इमानदारीच्या कथा अनेकजण सांगत असतात. त्याच्यावर अनेक चित्रपटही निघाले आहेत. हे झाले पाळीव कुत्र्यांच्या बाबतीत; पण मोकाट कुत्र्यांबाबत बोलायचे झाले तर ते गल्लोगल्लीचे दहशतवादीच म्हणावे लागतील. कारण मोकाट कुत्री कधी कुणावर हल्ला करतील याचा नेम नसतो. त्यामुळे शहरांबरोबरच कोणत्याही गावात रात्रीचा प्रवास करताना जीव मुठीत धरूनच जावे लागते. हे सर्व आता सांगायचे कारण म्हणजे गेल्या महिनाभरात सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यातील पिसाळलेल्या कुत्र्यांनी सव्वाशेहून अधिक लोकांचे लचके तोडले आहेत. गेल्या महिन्यात सांगलीतील विश्रामबाग येथील उद्योग भवनच्यामागे प्रातर्विधीसाठी गेलेल्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला ठार मारले. रविवारी तर सांगलीतीलच संजयनगरमध्ये एका घरात घुसून तीन महिन्याच्या बालकाचे लचके तोडले, त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावरून ही मोकाट कुत्री किती बेताल झाली आहेत याची कल्पना यावी. मोकाट कुत्र्यांची ही समस्या केवळ काही शहरांतच नव्हे, तर महाराष्ट्राबरोबरच देशभरात आहे. देशभरात सुमारे तीन कोटी मोकाट कुत्री आहेत. देशात दरवर्षी २० हजारांहून अधिक लोकांचा पिसाळलेले कुत्रे चावल्याने रेबीजची लागण होऊन मृत्यू होतो. जगातल्या अन्य कोणत्याही देशापेक्षा रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ३५ टक्क्यांहून अधिक आहे, असल्याचे ‘ग्लोबल अलायन्स फॉर रेबिज कंट्रोल’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. मोकाट कुत्र्यांची हत्त्या करण्याला देशात बंदी आहे. त्यामुळे या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी त्यांचे निर्बिजीकरण करणे, हा उपाय योजला जातो. केंद्र सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना यासाठी सुमारे ५० टक्के अनुदानही देते. स्थानिक स्वराज्य संस्थांना यासाठी होणाऱ्या खर्चातील उर्वरित भार उचलावा लागतो. मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम नियमित राबविणाऱ्यांमध्ये मुंबई, पुण्यासह राज्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच महापालिका किंवा नगरपालिका आहेत. अद्याप तेथेही मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही. मुंबईजवळच्याच ठाणे जिल्ह्यात तर ५० हजारांवर मोकाट कुत्री असल्याचे सांगण्यात येते. ही कुत्री कचराकोंडाळ्यातील अन्न खात असतात. झुंडाने ती फिरत असतात. अस्वच्छतेत राहाणे आणि अस्वच्छ खाणे यामुळे यातीलच एखाद्याला रेबीजची लागण होते आणि तो पिसाळतो, बेभान होतो. दिसेल त्याचा चावत सुटतो. माणसांबरोबरच जनावरेही त्याच्या तावडीतून सुटत नाहीत. कुत्रा चावल्यानंतर अँटीरेबिजची लस दिली जाते. शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ती उपलब्ध असते. प्रत्यक्षात या लसींचा बहुतांश वेळा तुटवडाच असतो. रुग्णांना त्यासाठी खासगी रुग्णालयांचाच आधार घ्यावा लागतो. सारेच सर्प जसे विषारी नसतात तसेच कुत्र्यांच्या बाबतीतही असते. पाळीव कुत्रा चावल्यानंतर त्याच्या लाळेत रेबिजचे विषाणू असतातच असे नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अँटीरेबिजची लस घ्यावी लागते. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या लाळेत मात्र रेबीजचे विषाणू हमखास असतात. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारणे हाच या रोगाचा फैलाव रोखण्याचा एकमेव उपाय आहे. अँटीरेबिजच्या लसीवर शासनाचा प्रचंड खर्च होतो.कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला औषधासाठी मिळणाऱ्या रकमेतील १८ टक्क्यांहून अधिक रक्कम अँटीरेबिजच्या लसीवर खर्च होते. हा खर्च टाळायचा असेल, मोकाट कुत्र्यांची ही दहशत संपवायची असेल, तर त्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम प्रत्येक शहरात राबवायला हवी. त्यासाठी कायमस्वरूपी केंद्रे स्थापन करायला हवीत. राजस्थानमधील जयपूरसारख्या शहराने हे साध्य केले आहे.- चंद्रकांत कित्तुरे