शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

अन्नसुरक्षेशी तडजोड नको

By admin | Updated: September 24, 2014 05:44 IST

जागतिक व्यापारी संघटनेच्या (हळड) नुकत्याच जीनिव्हा येथे झालेल्या बैैठकीत जागतिक व्यापार सुलभीकरणाचा नवीन करार अस्तित्वात येऊ शकला नाही

शांताराम वाघ - जागतिक व्यापारी संघटनेच्या (हळड) नुकत्याच जीनिव्हा येथे झालेल्या बैैठकीत जागतिक व्यापार सुलभीकरणाचा नवीन करार अस्तित्वात येऊ शकला नाही. या कराराला भारताने आपला तीव्र विरोध नोंदविला आणि स्वाक्षरी करण्यास नकार दिला. भारताच्या भूमिकेमुळे व नकाराधिकारामुळे अमेरिकेसारखे प्रगत देश आरडोओरड करणार हे उघडच होते. आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या वेळीही हा कायदा संमत करण्यासाठी अध्यक्ष ओबामा हे मोदींवर दबाव आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; पण भारतीयांची अन्नसुरक्षा ही अधिक महत्त्वाची असल्याने भारताने या दबावाला बळी न पडता आपल्या हिताचा विचार करून निर्णय घेणे योग्य ठरेल.आतापर्यंतचा इतिहास पाहाता विकसनशील देश अशा प्रकरणात भारताच्या बाजूने उभे राहात असत. या वेळी मात्र त्यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. आज या संघटनेत भारत एकाकी पडला असला, तरी या नवीन करारासंबंधी भारताची जी भूमिका आहे त्याकडे दुर्लक्ष करणे, प्रगत किंवा विकसनशील राष्ट्रांना परवडणारे नाही हे कटूसत्य आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत हा जगातील मोठी बाजारपेठ असलेला देश आहे हे तर उघडच आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. इतर राष्ट्रातील रोजगार निर्मितीला हातभार लावण्यापेक्षा स्वत:च्या देशातील जनतेच्या अन्नसुरक्षेची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे हे युनोचे मत कोणालाही पटण्यासारखे नाही. जागतिक व्यापार संघटनेकडून येऊ घातलेला नवीन करार हा प्रामुख्याने अन्नसुरक्षा आणि अनुदान देण्यासंबंधीचा आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानावर मर्यादा घालणे व एकूण अन्नधान्याच्या फक्त १० टक्के साठा करणे या दोन अव्यवहार्य व जाचक अटी या करारात आहेत. शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान कमी केले तर फक्त श्रीमंत देशच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकू शकतील व पर्यायाने भारतीय शेतकरी त्यापासून वंचित राहील हे उघड गणित आहे. दुसरी गोष्ट अन्नधान्याच्या साठ्याबाबतची. एकूण अन्नधान्याच्या फक्त १० टक्के साठाच ठेवता येईल, हा आग्रह मूलभूत मानवी जीवनावरच घाला घालणारा आहे. भारताला तर दुष्काळ, अतिवृष्टी किंवा नैैसर्गिक आपत्तींना नेहमीच तोंड द्यावे लागते. १२० कोटी लोकांना अन्न पुरविणे हे भारतापुढील मोठे आव्हान आहे. सरकार जर आपल्या जनतेला अन्न मिळण्याची ग्वाही देऊ शकत नसेल, तर ‘अच्छे दिन’ कसे येतील? शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपल्या देशात जनतेला दोन वर्षे पुरेल एवढा अन्नसाठा उपलब्ध आहे, हे मोदी सरकारचे भाग्यच म्हणावे लागेल. जागतिक व्यापार संघटनेत भारताने घेतलेली भूमिका यामुळेच रास्त ठरते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अन्नधान्याच्या बाबतीत भारताची भूमिका स्वागतार्ह असली, तरी स्वदेशात मात्र सरकारचे वर्तन अगदी उलट होताना दिसत आहे. गरिबांना माफक दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे हा सरकारचा सार्वभौम अधिकार असल्याचे वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत नुकतेच सांगितले. सोनिया गांधी यांनी महद्प्रयासाने अन्नधान्य विधेयक मंजूर करून घेतले, त्याबद्दल मात्र मोदी सरकार मूग गिळून गप्प आहे. उलट हा अन्नसुरक्षा कायदा तीन महिन्यांसाठी प्रलंबित ठेवला आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून हा निर्णय घेण्यात आला हे नि:संशय.