शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अन्न हे पूर्णब्रह्म!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:18 IST

पुरेसे अन्न न मिळाल्याने रोज ८६१ बालकांचा मृत्यू होतो. स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या पाचपटीने व धान्याचे उत्पादन सहापटीने वाढले. पण शेतात पिकलेल्या १२.६४ कोटी टन धान्याची गोदामात पोहोचण्याआधीच नासाडी होते.

अगदी दोन पिढ्यांपूर्वीपर्यंत दुपार आणि रात्रीची जेवणे झाली की, ‘शिळंपाकं द्या हो माई’ किंवा ‘भाकरतुकडा वाढा हो माई’, अशा आर्त आरोळ्या ऐकू यायच्या. हल्ली त्या येत नाहीत. याचे कारण भारत शतप्रतिशत भूकमुक्त झाला आहे, हे नाही. खरं तर आज भारतात पूर्वीहून जास्त भुकेले व अर्धपोटी लोक आहेत. फक्त अन्नाची भीक मागणे बंद झाले आहे. भिकेचे आणि भुकेचेही ‘मॉनेटायजेशन’ झाल्याने भीक देणे आणि घेणे रोखीच्या स्वरूपात चालते, एवढाच फरक आहे.

मंगळवारी १६ आॅक्टोबरला जागतिक अन्न दिन होता. संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) स्थापन झाली तो हा दिवस. भारतातही हा दिवस साजरा झाला. पण हा दिवस गेली ५० वर्षे साजरा करूनही भारतातील किंवा एकूण जगातीलही भुकेची समस्या काही दूर झालेली नाही. जागतिक भूक निर्देशांकात भारत ११९ देशांमध्ये १०० व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच नागरिकांचे बऱ्यापैकी उदरभरण होणारे भारताच्या वर ९९ देश आहेत. बरं हे सर्वच देश विकसित आणि श्रीमंत आहेत, असेही नाही. जगातील तिसऱया क्रमांकाची व सर्वात वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था अशी आत्मस्तुती करणाºया भारताने शरमेने मान खाली घालावी, अशी ही बाब आहे. पण याची कोणाला लाज वाटत नाही व शासनकर्त्यांना याचा कोणी जाब विचारत नाही. यंदाच्या जागतिक अन्न दिनाचे बोधवाक्य होते, ‘आपली कृती, हेच आपले भविष्य’. पण भारतात कृतीही दिसत नाही व भविष्याचीही काळजी नाही, हे भयावह चित्र आहे. याच अन्न दिनाच्या अंकात ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेली माहिती हेच अधोरेखित करते. अन्नधान्याची कोठारे तुडुंब भरलेली असूनही, १२५ कोटींच्या भारतात दररोज २० कोटी नागरिक एक तर भुकेले राहतात किंवा त्यांना अर्धपोटी झोपावे लागते. पुरेसे अन्न न मिळाल्याने रोज ८६१ बालकांचा मृत्यू होतो. स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या पाचपटीने व अन्नधान्याचे उत्पादन सहापटीने वाढले. पण शेतात पिकलेल्या १२.६४ कोटी टन धान्याची गोदामात पोहोचण्याआधीच नासाडी होते. शिवाय गोदामात साठवलेले आणखी लाखो टन धान्य सडून, वाळवी लागून व उंदीर-घुशींनी खाऊन वाया जाते. याचा अर्थ पुरेशा अन्नाअभावी लोक उपाशी राहतात, असे नाही.

भारताच्या अन्नसमस्येचे नष्टचक्र एवढ्यानेच संपत नाही. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारा शेतकरीही विपन्नावस्थेत आहे. दुसरीकडे, नको तेवढे व नको ते खाल्ल्याने देशातील एक मोठा वर्ग आरोग्य गमावून बसला आहे. अशा लोकांची संख्या भुकेल्या व अर्धपोटी लोकांहून अधिक आहे. म्हणजे निम्मा देश एक तर भूक व कुपोषणाने तसेच अतिसेवनाने ग्रासला आहे. अन्न आयात करून कोणताही देश जगू-वाचू शकत नाही. अन्नसुरक्षा याचा अर्थ देशातील प्रत्येक नागरिकास दोन वेळेस जेवायला मिळेल, एवढ्यापुरता मर्यादित नाही. तसे असते तर गावोगाव सरकारी अन्नछत्र चालवून हा प्रश्न सोडविता आला असता. अन्नसुरक्षेमध्ये प्रत्येकाला सकस व पुरेसे अन्न उपलब्ध होण्याखेरीज ते मिळविण्यासाठी प्रत्येकास आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हेही अभिप्रेत आहे. अन्नसुरक्षा म्हणजे सरकारने जनतेचे पोट भरणे नव्हे, तर प्रत्येक जण आपले पोट भरण्यासाठी सक्षम होईल, यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे. केंद्र सरकारने अन्नसुरक्षा कायदा केला आहे, पण त्याची व्याप्ती एवढी मोठी नाही. गरजूंना अन्न उपलब्ध करून देणे हाच मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवून तो कायदा केलेला आहे. हा कायदा करून पाच वर्षे झाल्यावर महाराष्ट्र सरकारने त्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय व्यवस्था उभी केली. यावरून भुकेल्या जनतेचे पोट भरण्यास सरकारला किती उत्साह आहे हे दिसते.

तुटपुंज्या पगारात संसाराचा गाडा हाकणारी गृहकृत्यदक्ष गृहिणीही कुटुंबातील सर्वांच्या ताटात दोन वेळचे जेवण कसे वाढता येईल, याची आधी काळजी करते. हे करणारी गृहिणी आॅक्सफर्ड किंवा हार्वर्डमधून अर्थशास्त्राची डॉक्टरेट घेऊन आलेली नसते. मातृहृदयी ममत्व आणि कणव हेच तिच्या यशाचे सूत्र असते. आपल्या राज्यकर्त्यांमध्ये नेमका त्याचाच अभाव आहे. या अभावाची जाणीव होण्याइतकीही त्यांची कुवत नाही, हीच देशाची शोकांतिका आहे.

टॅग्स :foodअन्न